शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

खरीपासाठी ७१३ कोटींचे कर्ज

By admin | Updated: July 1, 2016 00:59 IST

गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यावर्षी शासन पुढे सरसावले आहे.

५११ कोटींचे कर्ज वाटप : पीक कर्ज मेळाव्याने शेतकऱ्यांना लाभ ंचंद्रपूर : गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यावर्षी शासन पुढे सरसावले आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर कर्जासाठी पायपीट करण्याची वेळ येऊ नये, त्याला वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून यावर्षी प्रत्येक तहसील कार्यालयातर्फे शिबिराचे आयोजन करून कर्ज वाटप करण्यात आले. परिणामी १५ जूनपर्यंत ५११ कोटी ७८ लाख रूपयाचे पीक कर्ज वाटप झाले असून यावर्षी ७१३ कोटी ७७ लाख रूपयाच्या पीक कर्जातून खरीप पिकाची लागवड होणार आहे.गतवर्षी खरीप हंगामासाठी ६८८ कोटी रूपयाच्या पीक कर्जाची मागणी होती. तर यावर्षी ही मागणी २५ कोटी रूपयांनी वाढून ७१३ कोटी रूपयाची झाली आहे. मागच्या काही वर्षातील पीक कर्जाची स्थिती पाहता, दरवर्षी मागणी वाढत आहे. हजारो, लाखो रूपयाचे पीक कर्ज घेऊन खरीप पिकाची लागवड होत असली तरी निसर्ग साथ देत नसल्याने दरवर्षी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. खरीप पीक पेरणी अहवाल तयार करून विविध बँकामार्फत कर्ज वाटपाचे उद्दीष्ठ निश्चीत केले जाते. मात्र अनेक शेतकऱ्यांना कर्जासाठी चकरा मारावे लागत होते. याची दखल घेत शासनाने यावर्षी प्रत्येक तहसील कार्यालयात पीक कर्ज वाटप मेळावे आयोजित करून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तेथेच सोडवून त्यांना पीक कर्ज मिळवून देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आतापर्यंत विविध तहसील कार्यालयात पीक कर्ज मेळावे पार पडले व शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. १५ जूनपर्यंत जिल्ह्यात ७२ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)लक्षापेक्षा अधिक कर्ज वाटप जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी पीक कर्ज वाटपाचे नियोजन केले जाते. मात्र दरवर्षीच नियोजनापेक्षा अधिक कर्जाचे वाटप झाले आहे. २०१२-१३ मध्ये ३८० लाख ८८ हजार रूपयाचे कर्ज वाटपाचे नियोजन होते. यात ४०८ लाख ३४ हजार रूपयाचे कर्ज वाटप झाले. २०१३-१४ मध्ये ४६८ लाख ३२ हजार रूपयाचे कर्ज वाटप नियोजन होते. यात ५५९ लाख ८८ हजार रूपयांचे कर्ज वाटप झाले. तर सन २०१४-१५ मध्ये ५५९ लाख ८८ हजार रूपयांचे कर्ज वाटप नियोजन होते. यावर्षीही ५९९ लाख ४४ हजार रूपयांचे कर्ज वाटप झाले. तर गतवर्षी ६९१ कोटींचे पीक कर्ज वाटप झाले आहेजिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडीपीक कर्ज वाटपात दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी राहिली आहे. २०१२-१३ या वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेने २०६ लाख ५६ हजार रूपयाचे पीक कर्ज वाटप केले. तर २०१३-१४ मध्ये २२६ लाख ७९ हजार, २०१४-१५ मध्ये ३६१ लाख २१ हजार, २०१५-१६ मध्ये ३९७ लाख रूपयाचे कर्ज वाटप केले आहे. यावर्षी ४५१ लाख ९५ हजार रूपयाचे कर्ज वाटपाचे नियोजन असून ७८ टक्के कर्ज वाटप झाले आहे.