शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात  ७ हजार २१ जनावरे ठार

By राजेश मडावी | Updated: May 11, 2023 17:20 IST

Chandrapur News देश-विदेशातील पर्यटकांना व्याघ्र दर्शनाची हमखास संधी असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रासह राज्यभरातील जंगलांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ७ हजार २१ जनावरे ठार झाल्याची अधिकृत माहिती पुढे आली आहे.

राजेश मडावी

चंद्रपूर : देश-विदेशातील पर्यटकांना व्याघ्र दर्शनाची हमखास संधी असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रासह राज्यभरातील जंगलांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ७ हजार २१ जनावरे ठार झाल्याची अधिकृत माहिती पुढे आली. दरम्यान, गावालगतच्या वनक्षेत्रातील चराईचे क्षेत्र वर्षागणिक घटू लागल्याने पाळीव जनावरांचे बळी जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

राज्यातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि जंगलांतील नैसर्गिक गवताचे प्रमाण कमी झाल्याने वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी सुरू आहे; तर दुसरीकडे पाळीव जनावरे जंगलात जाण्याचे प्रमाण वाढल्याने वन्यप्राण्यांकडून ठार होण्याच्या घटना वाढीस लागल्या.  त्यातच मागील काही वर्षात तृणभक्षक प्राण्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. विस्तृत वनक्षेत्र आता मर्यादित होऊ लागले. पाळीव जनावरांची संख्या वाढून वनांवरील अवलंबनात देखील वाढ झाली. परिणामी, वनक्षेत्र घटल्याने तृणभक्षक प्राणी पिकांना लक्ष्य करीत आहेत.

पीक नुकसानीची ३७ हजार ६२३ प्रकरणे

२०२२-२३ वर्षात वन्य प्राण्यांकडून पिकांच्या नुकसानीची ३७ हजार ६२३ प्रकरणे घडली. ५२२ जनावरे जखमी तर ७ हजार २१ जनावरे ठार झाली. २०२०-२१ मध्ये पीक नुकसानीची ९७ हजार ७४२ प्रकरणे घडली. २०२१-२२ मध्ये पीक नुकसानीच्या ८७ हजार ६७५ घटना घडल्या. ८१५ जनावरे जखमी तर १२ हजार १४५ जनावरांचा मृत्यू झाला, अशी नोंद महाराष्ट्र वन विकास विभागाच्या संकेतस्थळावरील टिपणीत नमुद आहे.

वन विभाग म्हणतो, 

वन्यप्राणी व मानव संघर्ष टाळण्यासाठी गावागावांतजागृती सुरू असून शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई दिली जात आहे. वनांवरील अवलंबन कमी करून पुनर्वसन व जंगलालगतच्या शेताला कुंपण करणे, शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानातून सौर उर्जा कुंपण-चेन लिक कुंपण दिले जात आहे. वनक्षेत्रात गुरे चरू नयेत, यासाठी मनरेगा व डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतून गावागावांत स्टॉल फीडिंगला चालना देणे सुरू आहे. नुकसान कमी करण्यासाठी पर्यायी पिकांबद्दल माहिती व प्रोत्साहन दिले जात आहे, असा दावा वन विभागाने केला.

टॅग्स :Tigerवाघ