शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी लागणार ६८ हजार क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:35 IST

खरीप हंगाम तोंडावर असून मशागतपूर्व कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लगबग : सद्यस्थितीत ४ हजार ४६९ क्विंटल बियाणे उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगाम तोंडावर असून मशागतपूर्व कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे. यावर्षीच्या खरिप हंगामासाठी सार्वजनिक व खासगी अशी ६८ हजार ८०५.३० क्विंटल बियाण्यांची मागणी असून सध्यास्थितीत जिल्ह्यात ४ हजार ४६९ क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. उर्वरित बियाण्यांचा साठा लवकर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर खत व बियाणे मिळतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकºयांची बियाणे व खतासाठी धावपळ सुरू होते. याच संधीचा फायदा घेत अनेक कृषी केंद्र संचालक बियाणे व खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करीत असतात. त्यामुळे शेतकºयांची लूट होत असल्याचा प्रकार दरवर्षी बघायला मिळते. यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत यावर्षी बियाणे व खताची टंचाई निर्माण होवू नये, यासाठी नियोजन केले आहे.यावर्षीच्या खरिप हंगामासाठी सार्वजनिक स्वरूपात १९ हजार ९२३ क्ंिवटल बियाण्यांची मागणी आहे. तर खासगी स्वरूपात ४८ हजार ८८२ क्विंटल अशी ६८ हजार ८०५.३० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. यापैकी सार्वजनिक मागणीनुसार १५९९ क्विंटल तर खासगी मागणीनुसार २८७० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यामध्ये भात, ज्वारी, तूर, कापूस, मुंग, उडीद, सोयाबीन, तीळ, कापूस, कापूस बीटी व इतर बियाण्यांचा समावेश असला तरी सध्या भात व सोयाबीन बियाणेच उपलब्ध झाले आहेत. लवकरच सर्व बियाणे उपलब्ध होतील, असे कृषी विभागाने म्हटले आहे.बियाण्यांची उगवण क्षमता तपासावीशेतकरी उसनवारी किंवा कर्ज काढून बियाण्यांची खरेदी करतात. मात्र अनेकांचे बियाणे पेरणी केल्यानंतर उगवत नाही. यात पूर्ण खर्च पाण्यात जातो. अशा वेळी काही शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करतात. मात्र निकृष्ठ दर्जाचे बियाणे विकणाऱ्यावर कारवाई होत नाही. शेतकºयाला मात्र नाईलाजास्तव दुसºयांदा बियाणे खरेदी करून पेरणी करावी लागत असते. त्यामुळे कृषी विभागाने विक्रीस असलेल्या बियाण्यांची आधीच चौकशी करून त्या बियाण्यांची उगवण क्षमता आहे किंवा नाही, हे तपासूनच विक्रीचे आदेश द्यावे, अशी मागणी आहे.