शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

खरिपासाठी लागणार ६८ हजार क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:35 IST

खरीप हंगाम तोंडावर असून मशागतपूर्व कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लगबग : सद्यस्थितीत ४ हजार ४६९ क्विंटल बियाणे उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगाम तोंडावर असून मशागतपूर्व कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे. यावर्षीच्या खरिप हंगामासाठी सार्वजनिक व खासगी अशी ६८ हजार ८०५.३० क्विंटल बियाण्यांची मागणी असून सध्यास्थितीत जिल्ह्यात ४ हजार ४६९ क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. उर्वरित बियाण्यांचा साठा लवकर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर खत व बियाणे मिळतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकºयांची बियाणे व खतासाठी धावपळ सुरू होते. याच संधीचा फायदा घेत अनेक कृषी केंद्र संचालक बियाणे व खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करीत असतात. त्यामुळे शेतकºयांची लूट होत असल्याचा प्रकार दरवर्षी बघायला मिळते. यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत यावर्षी बियाणे व खताची टंचाई निर्माण होवू नये, यासाठी नियोजन केले आहे.यावर्षीच्या खरिप हंगामासाठी सार्वजनिक स्वरूपात १९ हजार ९२३ क्ंिवटल बियाण्यांची मागणी आहे. तर खासगी स्वरूपात ४८ हजार ८८२ क्विंटल अशी ६८ हजार ८०५.३० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. यापैकी सार्वजनिक मागणीनुसार १५९९ क्विंटल तर खासगी मागणीनुसार २८७० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यामध्ये भात, ज्वारी, तूर, कापूस, मुंग, उडीद, सोयाबीन, तीळ, कापूस, कापूस बीटी व इतर बियाण्यांचा समावेश असला तरी सध्या भात व सोयाबीन बियाणेच उपलब्ध झाले आहेत. लवकरच सर्व बियाणे उपलब्ध होतील, असे कृषी विभागाने म्हटले आहे.बियाण्यांची उगवण क्षमता तपासावीशेतकरी उसनवारी किंवा कर्ज काढून बियाण्यांची खरेदी करतात. मात्र अनेकांचे बियाणे पेरणी केल्यानंतर उगवत नाही. यात पूर्ण खर्च पाण्यात जातो. अशा वेळी काही शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करतात. मात्र निकृष्ठ दर्जाचे बियाणे विकणाऱ्यावर कारवाई होत नाही. शेतकºयाला मात्र नाईलाजास्तव दुसºयांदा बियाणे खरेदी करून पेरणी करावी लागत असते. त्यामुळे कृषी विभागाने विक्रीस असलेल्या बियाण्यांची आधीच चौकशी करून त्या बियाण्यांची उगवण क्षमता आहे किंवा नाही, हे तपासूनच विक्रीचे आदेश द्यावे, अशी मागणी आहे.