शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी लागणार ६८ हजार क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:35 IST

खरीप हंगाम तोंडावर असून मशागतपूर्व कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लगबग : सद्यस्थितीत ४ हजार ४६९ क्विंटल बियाणे उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगाम तोंडावर असून मशागतपूर्व कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे. यावर्षीच्या खरिप हंगामासाठी सार्वजनिक व खासगी अशी ६८ हजार ८०५.३० क्विंटल बियाण्यांची मागणी असून सध्यास्थितीत जिल्ह्यात ४ हजार ४६९ क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. उर्वरित बियाण्यांचा साठा लवकर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर खत व बियाणे मिळतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकºयांची बियाणे व खतासाठी धावपळ सुरू होते. याच संधीचा फायदा घेत अनेक कृषी केंद्र संचालक बियाणे व खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करीत असतात. त्यामुळे शेतकºयांची लूट होत असल्याचा प्रकार दरवर्षी बघायला मिळते. यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत यावर्षी बियाणे व खताची टंचाई निर्माण होवू नये, यासाठी नियोजन केले आहे.यावर्षीच्या खरिप हंगामासाठी सार्वजनिक स्वरूपात १९ हजार ९२३ क्ंिवटल बियाण्यांची मागणी आहे. तर खासगी स्वरूपात ४८ हजार ८८२ क्विंटल अशी ६८ हजार ८०५.३० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. यापैकी सार्वजनिक मागणीनुसार १५९९ क्विंटल तर खासगी मागणीनुसार २८७० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यामध्ये भात, ज्वारी, तूर, कापूस, मुंग, उडीद, सोयाबीन, तीळ, कापूस, कापूस बीटी व इतर बियाण्यांचा समावेश असला तरी सध्या भात व सोयाबीन बियाणेच उपलब्ध झाले आहेत. लवकरच सर्व बियाणे उपलब्ध होतील, असे कृषी विभागाने म्हटले आहे.बियाण्यांची उगवण क्षमता तपासावीशेतकरी उसनवारी किंवा कर्ज काढून बियाण्यांची खरेदी करतात. मात्र अनेकांचे बियाणे पेरणी केल्यानंतर उगवत नाही. यात पूर्ण खर्च पाण्यात जातो. अशा वेळी काही शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करतात. मात्र निकृष्ठ दर्जाचे बियाणे विकणाऱ्यावर कारवाई होत नाही. शेतकºयाला मात्र नाईलाजास्तव दुसºयांदा बियाणे खरेदी करून पेरणी करावी लागत असते. त्यामुळे कृषी विभागाने विक्रीस असलेल्या बियाण्यांची आधीच चौकशी करून त्या बियाण्यांची उगवण क्षमता आहे किंवा नाही, हे तपासूनच विक्रीचे आदेश द्यावे, अशी मागणी आहे.