शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

कृषी विभागाच्या फलोत्पादन अभियानाचा ६४५ शेतकऱ्यांना लाभ

By admin | Updated: September 28, 2016 00:50 IST

पारंपारिक शेतीला फळबागांची जोड देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन अभियान योजना राबविली जात आहे.

४ कोटी ६ लक्ष रूपयांचे अनुदान वाटले : यावर्षी ५२ लाखांचा आराखडाचंद्रपूर : पारंपारिक शेतीला फळबागांची जोड देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन अभियान योजना राबविली जात आहे. फळझाडांना प्रोत्साहन देण्यासोबतच या पीक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरली आहे. जिल्ह्यात ६४५ शेतकऱ्यांनाी या योजनेंतर्गत फळबागांची लागवड करत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. फलोत्पादन अतिशय फायद्याची शेती आहे. विविध प्रकारच्या फळांना बाजारात चांगली मागणी असून दरही चांगला मिळत असल्याने या शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे फार आवश्यक आहे. त्यामुळेच पारंपारिक पिकांसोबतच काही क्षेत्रात फळ पिकेही घ्यावीत, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. फळ पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविले जात आहे. शेतकऱ्यांना फळ शेतीकडे वळविण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान हे अभियान उपलब्ध करून देत आहे.अभियानाच्या क्षेत्र विस्तार या घटकांतर्गत फळबागांमध्ये पपई, केळी, मसाला पीक, हळद, मिरची लागवड व पुष्पोत्पादन या पिकांसह त्यासाठी आवश्यक संरक्षित शेती या घटकांतर्गत हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी, प्लॉस्टीक मल्चींग, शेडनेट हाऊस, हरीतगृह यामध्ये उच्च दर्जाची भाजीपाला लागवड व साहित्य आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते. सदर योजनेतील काही घटक शंभर टक्के अनुदानावर राबविले जातात. तर काही ५० व ३५ टक्के अनुदानावर आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४ कोटी ६ लाखांचे अनुदान विविध बाबींसाठी आतापर्यंत अदा करण्यात आले आहे. यावर्षी सुध्दा ५२ लाख रूपयांचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र फलोत्पादनाखाली आणण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)