शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कृषी विभागाच्या फलोत्पादन अभियानाचा ६४५ शेतकऱ्यांना लाभ

By admin | Updated: September 28, 2016 00:50 IST

पारंपारिक शेतीला फळबागांची जोड देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन अभियान योजना राबविली जात आहे.

४ कोटी ६ लक्ष रूपयांचे अनुदान वाटले : यावर्षी ५२ लाखांचा आराखडाचंद्रपूर : पारंपारिक शेतीला फळबागांची जोड देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन अभियान योजना राबविली जात आहे. फळझाडांना प्रोत्साहन देण्यासोबतच या पीक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरली आहे. जिल्ह्यात ६४५ शेतकऱ्यांनाी या योजनेंतर्गत फळबागांची लागवड करत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. फलोत्पादन अतिशय फायद्याची शेती आहे. विविध प्रकारच्या फळांना बाजारात चांगली मागणी असून दरही चांगला मिळत असल्याने या शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे फार आवश्यक आहे. त्यामुळेच पारंपारिक पिकांसोबतच काही क्षेत्रात फळ पिकेही घ्यावीत, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. फळ पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविले जात आहे. शेतकऱ्यांना फळ शेतीकडे वळविण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान हे अभियान उपलब्ध करून देत आहे.अभियानाच्या क्षेत्र विस्तार या घटकांतर्गत फळबागांमध्ये पपई, केळी, मसाला पीक, हळद, मिरची लागवड व पुष्पोत्पादन या पिकांसह त्यासाठी आवश्यक संरक्षित शेती या घटकांतर्गत हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी, प्लॉस्टीक मल्चींग, शेडनेट हाऊस, हरीतगृह यामध्ये उच्च दर्जाची भाजीपाला लागवड व साहित्य आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते. सदर योजनेतील काही घटक शंभर टक्के अनुदानावर राबविले जातात. तर काही ५० व ३५ टक्के अनुदानावर आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४ कोटी ६ लाखांचे अनुदान विविध बाबींसाठी आतापर्यंत अदा करण्यात आले आहे. यावर्षी सुध्दा ५२ लाख रूपयांचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र फलोत्पादनाखाली आणण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)