शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

६४ दिवसांपासून ‘ते’ विद्यार्थी शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:02 IST

कोरपना तालुक्यातील एकमेव आयएसओ जिल्हा परिषद शाळा, गेडामगुडा पटसंख्येअभावी बंद झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशासनाचे दुर्लक्ष : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

आशिष देरकर।आॅनलाईन लोकमतकोरपना : कोरपना तालुक्यातील एकमेव आयएसओ जिल्हा परिषद शाळा, गेडामगुडा पटसंख्येअभावी बंद झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी विशेष ग्रामसभा बोलावून आमची शाळा सुरू करा म्हणून ग्रामसभेत मागणी केली व तसा ‘पेसा’ ग्रामसभेचा ठराव सर्वानुमते मंजूर करून घेतला. मात्र शाळा सुरु न झाल्याने ६४ दिवसांपासून येथील विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे वास्तव समोर आले आहे.येथील ग्रामस्थ इतर कोणत्याची शाळेत आपले विद्यार्थी पाठविण्यास तयार नसून शिक्षण विभाग, तेथील पूर्वीचे मुख्याध्यापक लहू नवले येथील विद्यार्थ्यांना इतर शाळेत पाठविण्यासाठी गावात जाऊन प्रयत्न करीत आहे. मात्र गावकºयांनी एकच निर्णय घेतल्याने शिक्षण विभागाची पंचाईत झाली आहे. आमची शाळा सुरु झाल्यावरच आमचे विद्यार्थी शाळेत जातील, असा पवित्र येथील लोकांनी घेतला आहे.परीक्षेचे दिवस जवळ आलेले आहे. विद्यार्थी दोन महिन्यांपासून शाळेत न गेल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहेत. येथील विद्यार्थी शिक्षणातही हुशार होते. मात्र ६४ दिवसांचा खंड पडल्याने विद्यार्थ्यांसह पालक फार हताश झाले आहे. आज नाही तर उद्या माय-बाप सरकार निर्णय घेऊन किमान गुणवत्तेच्या आधारावर आमची शाळा सुरु करतील, या आशेवर असलेल्या गावकºयांच्या पदरी निराशाच आलेली आहे.शाळेविषयी वृत्तपत्रात व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या धडकल्या. विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असताना मात्र खासदार, आमदार यासारख्या लोकप्रतिनिधींनी गावाला साधी भेट दिली नसल्याने गावकºयांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद शाळा गेडामगुडा या शाळेने विद्यार्थ्यांना चांगले घडविले आहे. पालकांनी स्वत:ची शाळा समजून शाळेला मोठे योगदान दिले आहे. शेकडो शिक्षकांनी शाळेला भेटी दिल्या आहे. लोकसहभागातून शाळा घडली असल्यामुळे शाळेविषयी गावकऱ्यांना अभिमान आहे.शासन अनभिज्ञ६४ दिवसांपासून विद्यार्थी शाळाबाह्य असून शासनास या गंभीर बाबीची कल्पना नसावी, ही मोठी शोकांतिका आहे. जिल्हास्तरावरून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन अहवाल सादर करण्याची गरज आहे. आरटीईनुसार एकही विद्यार्थी शाळाबाह्य असू नये, असे शासनाचे धोरण असताना शासनालाच या धोरणाचा विसर पडला की काय, असा प्रश्न लोकांना पडला आहे.-तर विद्यार्थी नक्षलवादी बनतीलआमचे विद्यार्थी शिकावे, असे शासनाला वाटत नसेल तर खुशाल शाळा बंद ठेवावी. मात्र आम्ही दुसºया शाळेत विद्यार्थी पाठवणार नाही. गावातील शाळा आमच्यासाठी दैवत आहे. शाळा बंद करून मुलांना इतर शाळेत पाठविण्यास आमचा नकार आहे. मग आमचे विद्यार्थी नक्षलवादी झाले तरी चालेल.- विठ्ठल गेडाम, माजी सरपंच