शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

६१५ ग्राम पंचायती बक्षिसास पात्र

By admin | Updated: May 20, 2014 23:33 IST

ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत ६१५ ग्रामपंचायती बक्षिसास पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी

चंद्रपूर : ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत ६१५ ग्रामपंचायती बक्षिसास पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी शासनाकडून दिला जाणार आहे. गावाचा विकास, पर्यावरणाचे संवर्धन, जतन करण्याच्या अनुषंगाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविली जाते. योजनेसाठी निर्धारित केलेले निकष पूर्ण करणार्‍या गावांना लोकसंख्येच्या निकषानुसार दोन लाखांपासून दहा लाख रुपयापर्यंत रोख बक्षीस दिले जाते. २०१०-११ या वर्षी ३०१ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला. त्यानंतरच्या २३८ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. यावर्षी अनेक ग्रामपंचायतींनी योजनेत सहभाग नोंदविली आहे. तीन वर्षात ६१५ ग्रामपंचायतींनी योजनेत सहभागी होऊन बक्षीस मिळविले आहेत. यंदा सादर केलेल्या ग्रामपंचायतींची तपासणी लवकरच करण्यात येणार आहे. योजनेनुसार वृक्षलागवडीतील किती झाडे जगली, गाव ७५ टक्के निर्मल आहे का, करवसुली, प्लास्टिक पिशव्यांवर बंदी, मूर्ती विसर्जन संदर्भातील उपाय, ग्रामस्वच्छता, पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी, पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन हे निकष तपासण्यात येणार आहे. यात ज्या ग्रामपंचायती पात्र ठरतील, त्यांना बक्षीस दिले जाणार आहे. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर, सिंदेवाही, कोरपना, राजुरा, नागभीड या तालुक्यात ग्रामपंचायतींनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बक्षिसास पात्र ठरल्या आहेत. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण उत्थानासाठी शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना सुरू केली. योजनेच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत सहभागी व अपात्र ठरलेल्या गावामध्ये जनजागृती करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)