शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

६११ शाळांना ‘अ’ दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:29 IST

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शाळासिद्धी उपक्रम सुरु केला.

ठळक मुद्देशाळासिद्धी उपक्रम : ५० शाळांचा उपक्रमात सहभागच नाही

परिमल डोहणे ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शाळासिद्धी उपक्रम सुरु केला. या उपक्रमानुसार शाळा प्रशासनाने केलेल्या स्वयंमुल्याकनानुसार जिल्ह्यातील ६११ शाळांना ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. तर एक हजार ७८३ शाळांना ‘ब’ श्रेणी व ९५ शाळांना ‘क’ श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. मात्र ५० शाळांनी उदासीनता दाखवत या उपक्रमात सहभागच घेतला नाही.संपूर्ण शाळांना दर्जानुसार श्रेणी देण्यासाठी केंद्रस्तरावरुन शाळासिद्धी प्रणाली तयार करण्यात आली होती. शाळांमधील पायाभूत सुविधा व गुणवत्तेच्या निकषांच्या आधारावर शाळांना श्रेणी देण्यात येते. त्यासाठी ४६ मानके व सात क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्यांदा मुख्यमध्यापकांना स्वत: शाळेचे मुल्यमापन करायचे होते. यामध्ये जिल्ह्यातील २ हजार ५३९ शाळांपैकी २ हजार ४२२ शाळेने शाळासिद्धी उपक्रमातंर्गत मुल्यमापन केले होते. त्यापैकी सहभागी झालेल्या शाळांपैकी ६७ शाळांनी पोर्टलवर अर्धवट माहिती भरली. तर ५० शाळांनी अर्जच सादर केले नाही.शाळासिद्धी उपक्रमातंर्गत स्वयंमूल्यमापनात शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शिक्षकांची कामगिरी या आधारावर शाळेने स्वयंमुल्यमापण केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६११ शाळांना ‘अ’ श्रेणीचा दर्जा, तर १ हजार ७८३ शाळांना ब श्रेणी, ९५ शाळांना क श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. मात्र या उपक्रमात ५० शाळांनी सहभागच घेतला नाही.अजूनही बाह्यमुल्यमापन नाहीमुख्यध्यापकांच्या माध्यमातून शाळेचे स्वयंमूल्यमापन केल्यानंतर आलेल्या गुणांनुसार श्रेणी देण्यात आली. त्यानंतर शाळेचे बाह्यमुल्यमापन करण्यात येणार होते. मात्र अद्यापही कोणत्याही शाळेचे बाह्यमुल्यमापन करण्यात आले नाही. त्यामुळे स्वत: शाळेने मुल्यमापन करुन दिलेली श्रेणी योग्य आहे की नाही, याबाबत संभ्रम दिसून येत आहे.मुल्यमापनासाठी डाएटने केले प्रयत्नशाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा सातत्यपूर्ण शैक्षणिक संस्था (डाएट) तर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यानंतर केंद्रस्तरावरील सर्व शिक्षकांच्या १२५ केंद्रावर विशेष कार्यशाळा घेण्यात आल्या. यात एक हजार ९६८ शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ८४८ मुख्याध्यापकांनी तर ५ हजार ९९९ शिक्षकांनी सहभाग घेतला होता.शाळासिद्धी उपक्रमातंर्गत वर्षभरापूर्वी शाळांना टूल देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षकांनी आपल्या श्रेणीत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच डीआयसीपीडीच्या माध्यमातूनही प्रयत्न करण्यात येत आहेत.- धनंजय चापलेप्राचार्य, डाएट कॉलेज, चंद्रपूर.