शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

६०० संगणक परिचालकांचे मानधन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:13 IST

केंद्र आणि राज्य सरकार कोणतेही काम करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा आधार घेत आहे. शेतकऱ्यांच्या विविध कामांसह सर्व प्रकारचे आॅनलाईन काम या संगणक परिचालकांकडून करण्यात येते. मात्र या कामगारांनाच वर्षभरापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देउपासमारीची वेळ : संबंधित विभागाचे दुर्लक्ष, वर्षभरापासून मानधनविनाच कामे

दुर्योधन घोंगडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसुशी दाबगाव : केंद्र आणि राज्य सरकार कोणतेही काम करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा आधार घेत आहे. शेतकऱ्यांच्या विविध कामांसह सर्व प्रकारचे आॅनलाईन काम या संगणक परिचालकांकडून करण्यात येते. मात्र या कामगारांनाच वर्षभरापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.‘आपले सरकार’च्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना आॅनलाईन सेवा देणाºया चंद्रपूर जिल्ह्यातील ६०० संगणक परिचालकांना वर्षभरापासून मानधनाकरिता वंचित रहावे लागत आहे. त्यातील काही संगणक कर्मचाºयांचे मानधन एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत झाले असून अर्ध्याहून अधिक संगणक परिचालकांचे मानधन बाकी आहे. जानेवारी २०१८ ते एप्रिल २०१८ पासून ६०० संगणक परिचालकांचे मानधन थकित आहे. ते मानधनविनाच काम करीत आहेत. त्यामुळे वर्षभरापासून त्यांचे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.यासंदर्भात संघटनेचे सचिव धनराज रामटेके यांनी आपले सरकार सेवा केंद्राचे प्रोजेक्ट मॅनेजर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जिल्हा परिषदेकडून संगणक परिचालकाचा मासिक निधी जिल्हा परिषद चंद्रपूरकडून न आल्यामुळेच जिल्ह्यातील संगणक परिचालकांचे मानधन झालेले नाही. निधी आल्यास तात्काळ वाटप करण्यात येईल, असे सांगितले.राज्यातील ग्रामपंचायती आॅनलाईन करण्याच्या हेतूने आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून आॅनलाईन सेवा कार्यान्वित करण्यात आली. त्याकरिता संग्राम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आॅनलाईन कामे सुरू करण्यात आली. आता राज्य सरकारने संग्राम सॉफ्टवेअरमध्ये बदल करून त्याऐवजी ‘ई ग्राम’ सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे. त्यामुळे नव्या सॉफ्टवेअरद्वारे संगणक कर्मचारी काम करीत आहेत. संग्राम प्रकल्प संपल्याने तर संग्राममधील सर्व संगणक परिचालक ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पात सामावून घेण्यासंदर्भात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संघटनेला आश्वासने दिली व वर्षाच्या कालावधीनंतर का होईना सामावून घेण्यात आले. त्यानुसार आॅनलाईन कामेही चालू झालीत. ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना आॅनलाईन दाखल्यासह सेवा सुरू झाली. एवढेच नाही तर शेतकरी बांधवासाठीची चालू करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाचे आॅनलाईन अर्जही भरून देण्याचे कामसुद्धा त्यांनी केले. मात्र त्यांच्या मानधनाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे संगणक परिचालकांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा परिषदेने कंपनीला मासिक अनुदान अदा करून कंपनीने संगणक परिचालकास तात्काळ वेतन अदा करावे व त्यांची होणारी आर्थिक व मानसिक हानी टाळावी, अशी मागणी आहे. वेतन न मिळाल्यास जिल्हा संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.