शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

६०० संगणक परिचालकांचे मानधन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:13 IST

केंद्र आणि राज्य सरकार कोणतेही काम करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा आधार घेत आहे. शेतकऱ्यांच्या विविध कामांसह सर्व प्रकारचे आॅनलाईन काम या संगणक परिचालकांकडून करण्यात येते. मात्र या कामगारांनाच वर्षभरापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देउपासमारीची वेळ : संबंधित विभागाचे दुर्लक्ष, वर्षभरापासून मानधनविनाच कामे

दुर्योधन घोंगडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसुशी दाबगाव : केंद्र आणि राज्य सरकार कोणतेही काम करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा आधार घेत आहे. शेतकऱ्यांच्या विविध कामांसह सर्व प्रकारचे आॅनलाईन काम या संगणक परिचालकांकडून करण्यात येते. मात्र या कामगारांनाच वर्षभरापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.‘आपले सरकार’च्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना आॅनलाईन सेवा देणाºया चंद्रपूर जिल्ह्यातील ६०० संगणक परिचालकांना वर्षभरापासून मानधनाकरिता वंचित रहावे लागत आहे. त्यातील काही संगणक कर्मचाºयांचे मानधन एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत झाले असून अर्ध्याहून अधिक संगणक परिचालकांचे मानधन बाकी आहे. जानेवारी २०१८ ते एप्रिल २०१८ पासून ६०० संगणक परिचालकांचे मानधन थकित आहे. ते मानधनविनाच काम करीत आहेत. त्यामुळे वर्षभरापासून त्यांचे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.यासंदर्भात संघटनेचे सचिव धनराज रामटेके यांनी आपले सरकार सेवा केंद्राचे प्रोजेक्ट मॅनेजर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जिल्हा परिषदेकडून संगणक परिचालकाचा मासिक निधी जिल्हा परिषद चंद्रपूरकडून न आल्यामुळेच जिल्ह्यातील संगणक परिचालकांचे मानधन झालेले नाही. निधी आल्यास तात्काळ वाटप करण्यात येईल, असे सांगितले.राज्यातील ग्रामपंचायती आॅनलाईन करण्याच्या हेतूने आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून आॅनलाईन सेवा कार्यान्वित करण्यात आली. त्याकरिता संग्राम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आॅनलाईन कामे सुरू करण्यात आली. आता राज्य सरकारने संग्राम सॉफ्टवेअरमध्ये बदल करून त्याऐवजी ‘ई ग्राम’ सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे. त्यामुळे नव्या सॉफ्टवेअरद्वारे संगणक कर्मचारी काम करीत आहेत. संग्राम प्रकल्प संपल्याने तर संग्राममधील सर्व संगणक परिचालक ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पात सामावून घेण्यासंदर्भात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संघटनेला आश्वासने दिली व वर्षाच्या कालावधीनंतर का होईना सामावून घेण्यात आले. त्यानुसार आॅनलाईन कामेही चालू झालीत. ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना आॅनलाईन दाखल्यासह सेवा सुरू झाली. एवढेच नाही तर शेतकरी बांधवासाठीची चालू करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाचे आॅनलाईन अर्जही भरून देण्याचे कामसुद्धा त्यांनी केले. मात्र त्यांच्या मानधनाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे संगणक परिचालकांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा परिषदेने कंपनीला मासिक अनुदान अदा करून कंपनीने संगणक परिचालकास तात्काळ वेतन अदा करावे व त्यांची होणारी आर्थिक व मानसिक हानी टाळावी, अशी मागणी आहे. वेतन न मिळाल्यास जिल्हा संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.