शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

बल्लारपूर पेपर मिल कर्मचाऱ्यांना ६० टक्के दिवाळी बोनस

By admin | Updated: October 28, 2016 00:53 IST

बल्लारपूर पेपर मिल सध्या आर्थिक संकटातून जात आहे. तीन महिन्यांच्या पगार अडला आहे.

नरेश पुगलिया : कच्चा माल बांबूची समस्या न्यायालयात मांडणारबल्लारपूर: बल्लारपूर पेपर मिल सध्या आर्थिक संकटातून जात आहे. तीन महिन्यांच्या पगार अडला आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये याकरिता व्यवस्थापनाने थकीत वार्षिक बोनसमधील ६० टक्के रक्कम देण्याचे ठरवून हे २ कोटी ४० रुपये रक्कम गुरूवारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.नियमित कर्मचारी रोजंदारी आणि अ श्रेणी ठेकेदारी कर्मचारी यांना प्रत्येकी १० हजार रुपये तर त्यानंतरच्या ठेकेदारी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे आर्थिक संकटात सापडून असलेल्या पेपर मिलच्या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. वार्षिक बोनसची बाकी रक्कम नोव्हेंबर महिन्यात दिलीजाईल. आष्टी पेपर मिल कर्मचाऱ्यांनाही याच पद्धतीने बोनसची रक्कम दिली जाणार आहे. अशी माहिती बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी आज येथे दिली. बिल्ट पेपर मिल उद्योगाच उपाध्यक्ष रणजी अब्राहम आणि स्थानिय मुख्य महाव्यवस्थापक व्यंकटेशरलू यांच्याशी पुगलिया यांनी चर्चा केली. बोनसची ही रक्कम देण्याचे ठरले. जे के पेपर समूह ही मिल विकत घेण्याविषयी विलंब करीत आहे. त्यावर उपाय म्हणून काही अन्य उद्योगांनी यात तात्पुरती गुंतवणूक करणञयाची तयारी दर्शविली आअहे. त्या मार्गाने आर्थिक व्यवस्था करुन ही मिल अविरत चालू ठेवली जाणार आहे. त्यातूनच अडलेल्या पगाराचा मुद्दा सुटणार आहे.खरे संकट कच्चा माल बांबू वन विभागाकडून न मिळणे हे आहे. यात मुख्य अडथळा राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, असा आरोप करीत दिवाळीनंतर पेपर मिल मजदूर सभा, वन विभागाच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे, असे पुगलिया यांनी सांगितले. बांबू लिलावात पेपर मिल ही एकच पार्टी बोलीकरिता आली. त्याचा दोष या पेपर मिलचा कसा व त्याची वन विभागाकडून अडवणूक का, हा आपला शासनाला प्रश्न आहे, असे म्हणत पेपर मिलवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १० हजार लोकांचा रोजगार अवलंबून आहे. यामुळे ही मिल बंद पडू नये, याकरिता प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. वनजमिनीवर अनेक वर्षांपासून राहात असलेल्या, शेतीकरिता असणाऱ्या गरिबांना हाकलून लावण्याचा शासनाचा प्रयत्न निंदनीय आहे, असे म्हणत, जिल्ह्यातील उद्योग बंद होत आहेत. ते चालू होतील व नवीन उद्योग या जिल्ह्यात कसे येतील, याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी पत्रपरिषदेतून सरकारला दिला. या पत्रपरिषदेत महासचिव वसंत मांढरे, नायर, रामदास वागदरकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)थकीत वेतनासाठी निदर्शनेपगार तीन महिन्यापासून अडला आहे. सुपर व वार्षिक बोनस नाही. या रागापोटी बुधवारला पेपर मिल कर्मचाऱ्यांनी पेपर मिलच्या थापर गेट पुढे जमा होऊन थकीत रकमेची मागणी केली होती.