शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर पेपर मिल कर्मचाऱ्यांना ६० टक्के दिवाळी बोनस

By admin | Updated: October 28, 2016 00:53 IST

बल्लारपूर पेपर मिल सध्या आर्थिक संकटातून जात आहे. तीन महिन्यांच्या पगार अडला आहे.

नरेश पुगलिया : कच्चा माल बांबूची समस्या न्यायालयात मांडणारबल्लारपूर: बल्लारपूर पेपर मिल सध्या आर्थिक संकटातून जात आहे. तीन महिन्यांच्या पगार अडला आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये याकरिता व्यवस्थापनाने थकीत वार्षिक बोनसमधील ६० टक्के रक्कम देण्याचे ठरवून हे २ कोटी ४० रुपये रक्कम गुरूवारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.नियमित कर्मचारी रोजंदारी आणि अ श्रेणी ठेकेदारी कर्मचारी यांना प्रत्येकी १० हजार रुपये तर त्यानंतरच्या ठेकेदारी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे आर्थिक संकटात सापडून असलेल्या पेपर मिलच्या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. वार्षिक बोनसची बाकी रक्कम नोव्हेंबर महिन्यात दिलीजाईल. आष्टी पेपर मिल कर्मचाऱ्यांनाही याच पद्धतीने बोनसची रक्कम दिली जाणार आहे. अशी माहिती बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी आज येथे दिली. बिल्ट पेपर मिल उद्योगाच उपाध्यक्ष रणजी अब्राहम आणि स्थानिय मुख्य महाव्यवस्थापक व्यंकटेशरलू यांच्याशी पुगलिया यांनी चर्चा केली. बोनसची ही रक्कम देण्याचे ठरले. जे के पेपर समूह ही मिल विकत घेण्याविषयी विलंब करीत आहे. त्यावर उपाय म्हणून काही अन्य उद्योगांनी यात तात्पुरती गुंतवणूक करणञयाची तयारी दर्शविली आअहे. त्या मार्गाने आर्थिक व्यवस्था करुन ही मिल अविरत चालू ठेवली जाणार आहे. त्यातूनच अडलेल्या पगाराचा मुद्दा सुटणार आहे.खरे संकट कच्चा माल बांबू वन विभागाकडून न मिळणे हे आहे. यात मुख्य अडथळा राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, असा आरोप करीत दिवाळीनंतर पेपर मिल मजदूर सभा, वन विभागाच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे, असे पुगलिया यांनी सांगितले. बांबू लिलावात पेपर मिल ही एकच पार्टी बोलीकरिता आली. त्याचा दोष या पेपर मिलचा कसा व त्याची वन विभागाकडून अडवणूक का, हा आपला शासनाला प्रश्न आहे, असे म्हणत पेपर मिलवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १० हजार लोकांचा रोजगार अवलंबून आहे. यामुळे ही मिल बंद पडू नये, याकरिता प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. वनजमिनीवर अनेक वर्षांपासून राहात असलेल्या, शेतीकरिता असणाऱ्या गरिबांना हाकलून लावण्याचा शासनाचा प्रयत्न निंदनीय आहे, असे म्हणत, जिल्ह्यातील उद्योग बंद होत आहेत. ते चालू होतील व नवीन उद्योग या जिल्ह्यात कसे येतील, याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी पत्रपरिषदेतून सरकारला दिला. या पत्रपरिषदेत महासचिव वसंत मांढरे, नायर, रामदास वागदरकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)थकीत वेतनासाठी निदर्शनेपगार तीन महिन्यापासून अडला आहे. सुपर व वार्षिक बोनस नाही. या रागापोटी बुधवारला पेपर मिल कर्मचाऱ्यांनी पेपर मिलच्या थापर गेट पुढे जमा होऊन थकीत रकमेची मागणी केली होती.