शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बल्लारपूर पेपर मिल कर्मचाऱ्यांना ६० टक्के दिवाळी बोनस

By admin | Updated: October 28, 2016 00:53 IST

बल्लारपूर पेपर मिल सध्या आर्थिक संकटातून जात आहे. तीन महिन्यांच्या पगार अडला आहे.

नरेश पुगलिया : कच्चा माल बांबूची समस्या न्यायालयात मांडणारबल्लारपूर: बल्लारपूर पेपर मिल सध्या आर्थिक संकटातून जात आहे. तीन महिन्यांच्या पगार अडला आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये याकरिता व्यवस्थापनाने थकीत वार्षिक बोनसमधील ६० टक्के रक्कम देण्याचे ठरवून हे २ कोटी ४० रुपये रक्कम गुरूवारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.नियमित कर्मचारी रोजंदारी आणि अ श्रेणी ठेकेदारी कर्मचारी यांना प्रत्येकी १० हजार रुपये तर त्यानंतरच्या ठेकेदारी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे आर्थिक संकटात सापडून असलेल्या पेपर मिलच्या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. वार्षिक बोनसची बाकी रक्कम नोव्हेंबर महिन्यात दिलीजाईल. आष्टी पेपर मिल कर्मचाऱ्यांनाही याच पद्धतीने बोनसची रक्कम दिली जाणार आहे. अशी माहिती बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी आज येथे दिली. बिल्ट पेपर मिल उद्योगाच उपाध्यक्ष रणजी अब्राहम आणि स्थानिय मुख्य महाव्यवस्थापक व्यंकटेशरलू यांच्याशी पुगलिया यांनी चर्चा केली. बोनसची ही रक्कम देण्याचे ठरले. जे के पेपर समूह ही मिल विकत घेण्याविषयी विलंब करीत आहे. त्यावर उपाय म्हणून काही अन्य उद्योगांनी यात तात्पुरती गुंतवणूक करणञयाची तयारी दर्शविली आअहे. त्या मार्गाने आर्थिक व्यवस्था करुन ही मिल अविरत चालू ठेवली जाणार आहे. त्यातूनच अडलेल्या पगाराचा मुद्दा सुटणार आहे.खरे संकट कच्चा माल बांबू वन विभागाकडून न मिळणे हे आहे. यात मुख्य अडथळा राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, असा आरोप करीत दिवाळीनंतर पेपर मिल मजदूर सभा, वन विभागाच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे, असे पुगलिया यांनी सांगितले. बांबू लिलावात पेपर मिल ही एकच पार्टी बोलीकरिता आली. त्याचा दोष या पेपर मिलचा कसा व त्याची वन विभागाकडून अडवणूक का, हा आपला शासनाला प्रश्न आहे, असे म्हणत पेपर मिलवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १० हजार लोकांचा रोजगार अवलंबून आहे. यामुळे ही मिल बंद पडू नये, याकरिता प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. वनजमिनीवर अनेक वर्षांपासून राहात असलेल्या, शेतीकरिता असणाऱ्या गरिबांना हाकलून लावण्याचा शासनाचा प्रयत्न निंदनीय आहे, असे म्हणत, जिल्ह्यातील उद्योग बंद होत आहेत. ते चालू होतील व नवीन उद्योग या जिल्ह्यात कसे येतील, याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी पत्रपरिषदेतून सरकारला दिला. या पत्रपरिषदेत महासचिव वसंत मांढरे, नायर, रामदास वागदरकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)थकीत वेतनासाठी निदर्शनेपगार तीन महिन्यापासून अडला आहे. सुपर व वार्षिक बोनस नाही. या रागापोटी बुधवारला पेपर मिल कर्मचाऱ्यांनी पेपर मिलच्या थापर गेट पुढे जमा होऊन थकीत रकमेची मागणी केली होती.