शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

६० शेततळ्यांनी डोंगरहळदी शिवार झाले जलमय

By admin | Updated: July 29, 2016 00:55 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिवारातील आवश्यतेप्रमाणे जलसंधारणाची वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली आहे.

७४.५० टीसीएम पाणीसाठा : ५० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा चंद्रपूर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिवारातील आवश्यतेप्रमाणे जलसंधारणाची वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी शिवारात बहुतांश शेतकरी धानाचे उत्पन्न घेतात. धानास मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासत असते. शिवारातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवार अभियानातून तब्बल ६० शेततळे खोदण्यात आले आहे. या शेततळ्यांमुळे डोंगरहळदी शिवार जलमय झाले असून कोरडवाहू जमिनी हक्काच्या सिंचनाखाली आली आहे. तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या डोंगरहळदी या गावात आदिवासी व अल्पभुधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. शिवारातील जमिनी बहुतांश कोरडवाहू आहे. सिंचनाची सोय नसल्याने मान्सूनच्या पावसावर शेतकरी धानाचे पीक घेतात. पावसाने दगा दिल्यास धानाच्या पिकावरही पाणी सोडावे लागते. सिंचन व्यवस्था उपलब्ध झाल्यास खरीपातील धानाचे पीक चांगल्या पध्दतीने घेण्यासोबतच दुसरे व तिसरे पिकही शेतकऱ्यांना घेता येवू शकते. हा दृष्टीकोन समोर ठेवत कृषी विभागाच्या वतीने शिवारात तब्बल ६० शेततळ्यांचे क्लस्टर तयार करण्यात आले. यातील ४९ शेततळे अभियानातून या वर्षी बांधण्यात आले असून ११ शेततळे जुने आहेत. डोंगरहळदी या गावाची कोरडवाहू शेती अभियानातर्गतही निवड करण्यात आली आहे. शेततळ्यांसोबतच शिवारातील बोडी नुतनीकरणाची ४ व मजगीची कामेही करण्यात आली. त्यामुळे शिवारातील बहुतांश शेतकऱ्यांकडे आता हक्काचे सिंचन उपलब्ध झाले आहे. पूर्वी शिवारातील शेतकरी एकच पिक घ्यायचे आता. दोन ते तिन पीके घेता येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) ५० हेक्टर क्षेत्राला पाणी शेततळ्यांमुळे शिवारात ७४.५० टीसीएम इतका पाणी साठा निर्माण झाला आहे. परिसरातील ५० हेक्टरला या पाणीसाठ्यातून एक प्रवाही पाणी पातळी देता येणार आहे. जलयुक्त अभियानातून झालेल्या या कामांचा परिसरातील आदीवासी व अल्पभुधारक शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर फायदा होणार आहे. साचलेल्या पाण्यातून डिझल पंपाव्दारे पाण्याची उचल करुन पिकास पाणी देता येईल. २० शेततळे हे ३० बाय ३० आकाराचे तर २९ शेततळे २० बाय २० आकाराचे बांधण्यात आले आहे. डिझल इंजिनचे प्रस्ताव शिवारात ६० शेतकऱ्यांकडे शेततळे झाले आहे. या शेततळ्यांतून शेतकऱ्यांना डिझल इंजिन लावून पाणी उचलता यावे व सिंचन करता यावे म्हणून आदिवासी विकास विभागाच्या योजनेअंतर्गत आदिवासी समाजाच्या शेतकऱ्यांना डिझल इंजिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या पाठपुराव्याने प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.