शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

रस्त्याच्या चौपदरीकरणात ६ हजार रोपटे नष्ट होणार

By admin | Updated: May 4, 2017 00:38 IST

उमरेड व्हाया चिमूर ते वणी पर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

चिमूर-वणी मार्ग : दोन वर्षांपूर्वी लावण्यात आली होती रोपटेवरोरा : उमरेड व्हाया चिमूर ते वणी पर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये वरोरा-चिमूर मार्गालगत दोन वर्षापासून लावण्यात आलेले सहा हजार रोपटे नष्ट होणार आहेत. रस्ता वाढविण्याकरिता आजतागत झालेला हजारो रुपयांचा खर्च व्यर्थ जाणार असल्याने वन्यप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.सामाजिक वनीकरण विभाग वरोराच्या वतीने आनंदवन नजीक वरोरा-चिमूर मार्गावरील दीड किमी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा सन २०१५ मध्ये ४ हजार ५०० तर सन २०१६ मध्ये दीड हजार असे सहा हजार रोपटे लावण्यात आले. ही रोपटे उन्हाळ्यातही जीवंत असून त्याला पाणी देणे व देखभाल करण्यकरिता मजूर लावण्यात आले असल्याने अल्पावधीत रोपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उमरेड व्हाया चिमूर वरोरा-वणी मार्गाच्या चौपदीकरणाच्या कामाला मागील काही दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. या चौपदरीकरणाच्या कामात रोपे पूर्णत: नष्ट होणार आहे. केवळ दीड किमी अंतरावर सहा हजार रोपटे नष्ट होणार असल्याने लाखो रूपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)सामाजिक वनीकरण विभाग हतबलवरोरा-चिमूर मार्गालगत दुतर्फा रोपे लावण्याकरिता सामाजिक वनीकरण विभागाने संबंधीत कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले. नाहरकत प्रमाणपत्रात तेव्हा रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्यात येईल, त्यात लावलेले रोपे नष्ट झाल्यास कुठलीही तक्रार करता येणार नाही, असे नमूद करण्यात आल्याने सामाजिक वनीकरण विभाग हतबल झाले आहे. चिमूर वरोरा रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात दीड किमी अंतरावरील सहा हजार रोपे नष्ट होणार असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आला.- आर.एस. वाकुरेसामाजिक वनीकरणअधिकारी वरोरा