शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

रस्त्याच्या चौपदरीकरणात ६ हजार रोपटे नष्ट होणार

By admin | Updated: May 4, 2017 00:38 IST

उमरेड व्हाया चिमूर ते वणी पर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

चिमूर-वणी मार्ग : दोन वर्षांपूर्वी लावण्यात आली होती रोपटेवरोरा : उमरेड व्हाया चिमूर ते वणी पर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये वरोरा-चिमूर मार्गालगत दोन वर्षापासून लावण्यात आलेले सहा हजार रोपटे नष्ट होणार आहेत. रस्ता वाढविण्याकरिता आजतागत झालेला हजारो रुपयांचा खर्च व्यर्थ जाणार असल्याने वन्यप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.सामाजिक वनीकरण विभाग वरोराच्या वतीने आनंदवन नजीक वरोरा-चिमूर मार्गावरील दीड किमी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा सन २०१५ मध्ये ४ हजार ५०० तर सन २०१६ मध्ये दीड हजार असे सहा हजार रोपटे लावण्यात आले. ही रोपटे उन्हाळ्यातही जीवंत असून त्याला पाणी देणे व देखभाल करण्यकरिता मजूर लावण्यात आले असल्याने अल्पावधीत रोपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उमरेड व्हाया चिमूर वरोरा-वणी मार्गाच्या चौपदीकरणाच्या कामाला मागील काही दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. या चौपदरीकरणाच्या कामात रोपे पूर्णत: नष्ट होणार आहे. केवळ दीड किमी अंतरावर सहा हजार रोपटे नष्ट होणार असल्याने लाखो रूपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)सामाजिक वनीकरण विभाग हतबलवरोरा-चिमूर मार्गालगत दुतर्फा रोपे लावण्याकरिता सामाजिक वनीकरण विभागाने संबंधीत कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले. नाहरकत प्रमाणपत्रात तेव्हा रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्यात येईल, त्यात लावलेले रोपे नष्ट झाल्यास कुठलीही तक्रार करता येणार नाही, असे नमूद करण्यात आल्याने सामाजिक वनीकरण विभाग हतबल झाले आहे. चिमूर वरोरा रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात दीड किमी अंतरावरील सहा हजार रोपे नष्ट होणार असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आला.- आर.एस. वाकुरेसामाजिक वनीकरणअधिकारी वरोरा