शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

खरिपाची ५५ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंधरा ते वीस दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे थांबविली होती. परिणामी आजपर्यंत केवळ ५५ टक्के म्हणजे जवळपास १ लाख ७६ हजार ४३२ हेक्टरवर पेरणी झाली असून ३५ टक्के पेरणीची कामे अद्यापही व्हायची आहेत. काही दिवसांपासून जिल्ह्यात ...

ठळक मुद्देपावसाने दिला होता दगा : सद्या समाधानकारक हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंधरा ते वीस दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे थांबविली होती. परिणामी आजपर्यंत केवळ ५५ टक्के म्हणजे जवळपास १ लाख ७६ हजार ४३२ हेक्टरवर पेरणी झाली असून ३५ टक्के पेरणीची कामे अद्यापही व्हायची आहेत. काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिमझीम असल्याने सध्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. लवकरच पेरणीची कामे आटोपतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.यावर्षी जिल्ह्यात ४ लाख ४२ हजार ३१८ हेक्टरवर खरिप पीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने आनंदीत शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली. मात्र त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे काही शेतकºयांनी पेरणीची कामे थांबविली.पावसाने बरिच विश्रांती घेतल्याने जागा कडक आली आणि पेरणी शक्य नव्हती. अशात अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पेरणीच्या कामांना वेग आला असून लवकरच निर्धारीत क्षेत्रावर पेरणी पूर्ण होईल, असा आशावाद कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी धान, कापसू, सोयाबीन आदी पिकांची लागवड झाली आहे.जिल्ह्यात पिकनिहाय झालेली पेरणीआतापर्यंत जिल्ह्यात ९८ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी झाली आहे. तर ३२ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, २४ हजार १०२ हेक्टरवर तूर व २१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची पेरणी झाली आहे. या पेरणीची टक्केवारी ५५.२० एवढी आहे.