शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

खरिपाची ५५ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंधरा ते वीस दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे थांबविली होती. परिणामी आजपर्यंत केवळ ५५ टक्के म्हणजे जवळपास १ लाख ७६ हजार ४३२ हेक्टरवर पेरणी झाली असून ३५ टक्के पेरणीची कामे अद्यापही व्हायची आहेत. काही दिवसांपासून जिल्ह्यात ...

ठळक मुद्देपावसाने दिला होता दगा : सद्या समाधानकारक हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंधरा ते वीस दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे थांबविली होती. परिणामी आजपर्यंत केवळ ५५ टक्के म्हणजे जवळपास १ लाख ७६ हजार ४३२ हेक्टरवर पेरणी झाली असून ३५ टक्के पेरणीची कामे अद्यापही व्हायची आहेत. काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिमझीम असल्याने सध्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. लवकरच पेरणीची कामे आटोपतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.यावर्षी जिल्ह्यात ४ लाख ४२ हजार ३१८ हेक्टरवर खरिप पीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने आनंदीत शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली. मात्र त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे काही शेतकºयांनी पेरणीची कामे थांबविली.पावसाने बरिच विश्रांती घेतल्याने जागा कडक आली आणि पेरणी शक्य नव्हती. अशात अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पेरणीच्या कामांना वेग आला असून लवकरच निर्धारीत क्षेत्रावर पेरणी पूर्ण होईल, असा आशावाद कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी धान, कापसू, सोयाबीन आदी पिकांची लागवड झाली आहे.जिल्ह्यात पिकनिहाय झालेली पेरणीआतापर्यंत जिल्ह्यात ९८ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी झाली आहे. तर ३२ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, २४ हजार १०२ हेक्टरवर तूर व २१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची पेरणी झाली आहे. या पेरणीची टक्केवारी ५५.२० एवढी आहे.