शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

५३ टक्के रुग्ण ४० वर्षांखालील, तरीही लसीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. दररोज दीड हजारच्या वर रुग्ण आढळत आहेत. यामध्ये ४० वर्षांखालील नागरिकांची ...

चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. दररोज दीड हजारच्या वर रुग्ण आढळत आहेत. यामध्ये ४० वर्षांखालील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मृतांच्या आकडेवारीमध्येही ४० वर्षांखालील नागरिकांचा समावेश दिसून येत आहे. परंतु, तरीही शासनाकडून केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस देण्यात येत आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील ६१७, ६ ते १८ वयोगटातील ३७६४, १९ ते ४० वयोगटातील १९ हजार ६१, ४१ ते ६० वयोगटातील १५ हजार १०४, ६१ वर्षांवरील ४ हजार ८९८ रुग्णांची नोंद करण्यात आली. या आकडेवारीचा विचार केल्यास ० ते ४० वयोगटातील सुमारे २३ हजार ४४२ नागरिक बाधित झाले आहेत. ही आकडेवारी ४५ वर्षांवरील रुग्णांच्या आकडेवारीपेक्षा अधिक आहे. बहुतांश ज्येष्ठांचे घराबाहेर पडणे बंद आहे. परंतु, जीवनावश्यक वस्तू असो किंवा इतर कामासाठी युवकच बाहेर पडत आहेत. त्यामुळे ज्येष्ठांपेक्षा युवकच अधिक बाधित होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांचा मृत्यूही झाला आहे. १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला असला तरीसुद्धा ४५ वर्षांखालील नागरिकांसाठीच लस उपलब्ध नसल्याने त्यांनी पुन्हा किती प्रतीक्षा करावी लागणार हे वेळच सांगणार आहे.

-----

कोट

लस घेतल्यानंतर दीड महिन्यात इम्युनिटी तयार होत असते. लस घेतल्यानंतरही जवळपास ३० टक्के इन्फेशन होण्याची भीती असते. त्यामुळे लस घेण्यापूर्वी व घेतल्यानंतरही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. बहुतांश युवक गाफील असतात. मात्र, आपल्यामुळे कुटुंबाला बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

-डॉ. अभिलाषा गावतुरे, बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर

बॉक्स

लस मिळेपर्यंत अशी घ्या काळजी

कोरोनामुळे ४० वर्षांखालील युवकांचाही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे युवकांनी गाफील राहू नये. विनाकारण घराबाहेर पळणे टाळणे. आवश्यक काम असेलच तरच मास्क घालून बाहेर पडावे. घोळका करून गप्पा करणे टाळावे, दररोज सायंकाळी गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे.

अनेकजण शहरातील परिस्थिती पाहण्याच्या उद्देशाने सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडतात. मात्र, यामुळेही अनेकांना बाधा होत आहे. तर काहीजण केवळ खर्रा खाण्याच्या उद्देशाने बाहेर जातात. परंतु, एका खर्रामुळे राजुरा तालुक्यात चारजण बाधित झाल्याचा प्रकारही घटला आहे.

बॉक्स

४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण रखडले

शासनातर्फे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याभरात ४५ केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. विविध व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून, दुसरा बुस्टर डोस घ्यायचा आहे. तर बहुतेक ४५ वर्षांवरील नागरिकांचा पहिला व दुसराही डोस बाकी आहे. परंतु, जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने अनेक केंद्रावर लसच उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांश केंद्र बंद अवस्थेत आहेत.