शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
2
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
3
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
4
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
5
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
6
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
7
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
8
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
9
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
10
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
11
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
12
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
13
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
14
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
15
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
16
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
17
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
18
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
19
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

५३ टक्के रुग्ण ४० वर्षांखालील, तरीही लसीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. दररोज दीड हजारच्या वर रुग्ण आढळत आहेत. यामध्ये ४० वर्षांखालील नागरिकांची ...

चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. दररोज दीड हजारच्या वर रुग्ण आढळत आहेत. यामध्ये ४० वर्षांखालील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मृतांच्या आकडेवारीमध्येही ४० वर्षांखालील नागरिकांचा समावेश दिसून येत आहे. परंतु, तरीही शासनाकडून केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस देण्यात येत आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील ६१७, ६ ते १८ वयोगटातील ३७६४, १९ ते ४० वयोगटातील १९ हजार ६१, ४१ ते ६० वयोगटातील १५ हजार १०४, ६१ वर्षांवरील ४ हजार ८९८ रुग्णांची नोंद करण्यात आली. या आकडेवारीचा विचार केल्यास ० ते ४० वयोगटातील सुमारे २३ हजार ४४२ नागरिक बाधित झाले आहेत. ही आकडेवारी ४५ वर्षांवरील रुग्णांच्या आकडेवारीपेक्षा अधिक आहे. बहुतांश ज्येष्ठांचे घराबाहेर पडणे बंद आहे. परंतु, जीवनावश्यक वस्तू असो किंवा इतर कामासाठी युवकच बाहेर पडत आहेत. त्यामुळे ज्येष्ठांपेक्षा युवकच अधिक बाधित होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांचा मृत्यूही झाला आहे. १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला असला तरीसुद्धा ४५ वर्षांखालील नागरिकांसाठीच लस उपलब्ध नसल्याने त्यांनी पुन्हा किती प्रतीक्षा करावी लागणार हे वेळच सांगणार आहे.

-----

कोट

लस घेतल्यानंतर दीड महिन्यात इम्युनिटी तयार होत असते. लस घेतल्यानंतरही जवळपास ३० टक्के इन्फेशन होण्याची भीती असते. त्यामुळे लस घेण्यापूर्वी व घेतल्यानंतरही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. बहुतांश युवक गाफील असतात. मात्र, आपल्यामुळे कुटुंबाला बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

-डॉ. अभिलाषा गावतुरे, बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर

बॉक्स

लस मिळेपर्यंत अशी घ्या काळजी

कोरोनामुळे ४० वर्षांखालील युवकांचाही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे युवकांनी गाफील राहू नये. विनाकारण घराबाहेर पळणे टाळणे. आवश्यक काम असेलच तरच मास्क घालून बाहेर पडावे. घोळका करून गप्पा करणे टाळावे, दररोज सायंकाळी गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे.

अनेकजण शहरातील परिस्थिती पाहण्याच्या उद्देशाने सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडतात. मात्र, यामुळेही अनेकांना बाधा होत आहे. तर काहीजण केवळ खर्रा खाण्याच्या उद्देशाने बाहेर जातात. परंतु, एका खर्रामुळे राजुरा तालुक्यात चारजण बाधित झाल्याचा प्रकारही घटला आहे.

बॉक्स

४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण रखडले

शासनातर्फे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याभरात ४५ केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. विविध व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून, दुसरा बुस्टर डोस घ्यायचा आहे. तर बहुतेक ४५ वर्षांवरील नागरिकांचा पहिला व दुसराही डोस बाकी आहे. परंतु, जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने अनेक केंद्रावर लसच उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांश केंद्र बंद अवस्थेत आहेत.