शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

५२ दिवसांचे आंदोलन आणखी तीव्र

By admin | Updated: March 4, 2016 00:54 IST

वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी पदभरतीत १०० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी...

वनविद्या पदवीधारकांचे उपोषण : सलम ५० दिवस केले साखळी उपोषण चंद्रपूर : वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी पदभरतीत १०० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चंद्रपुरात येऊन आंदोलन छेडले आहे. सलग ५० दिवस साखळी उपोषण करूनही दखल घेतली जात नसल्याने या पदवीधारकांनी आता आंदोलन आणखी तीव्र करीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दोन दिवसांपासून आठ विद्यार्थी हे उपोषण करीत आहेत.राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि डॉ. बा.सा.को. कृषी विद्यापीठ दापोली या दोन विद्यापिठांतर्गत प्रत्येकी एक असे एकूण दोन वनशास्त्र पदवी अभ्यासक्रमाचे महाविद्यालये आहेत. यातील प्रत्येक महाविद्यालयावर महाराष्ट्र शासनाचा दोन कोटी रुपयांचा खर्च होतो. यासोबतच भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि भारतीय वानिकी अनुसंधान व शिक्षा परिषद देहरादून यांचेही वित्तीय सहाय्य महाविद्यालयांना मिळते. वनशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये ४९ वनासंबंधित विषयाचा सखोल अभ्यास केला जातो. एवढेच नाही तर वनविभागद्वारे वनकार्यानुभव (सहा महिने) आणि वनशास्त्र महाविद्यालयाद्वारे वनव्यवसायिक प्रशिक्षण (सहा महिने) दिले जाते. चार वर्षाचा वनशास्त्र पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शासनाचा प्रत्येक विद्यार्थ्यांवर जवळपास ६.५ लाख रुपयांचा वित्तीय खर्च होतो, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी या पदाच्या भरतीमध्ये १०० टक्के जागा आरक्षित करून सरळ सेवा भरतीद्वारे नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील या पदवीधारक विद्यार्थ्यांनी वनमंत्र्यांच्या चंद्रपूर शहरात आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १२ जानेवारीपासून येथील मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरील परिसरात साखळी उपोषण सुरू केले. एखाद आठवड्यात आंदोलनाची दखल घेतली जाईल, अशी आशा या विद्यार्थ्यांना होती. मात्र तसे झाले नाही आणि साखळी उपोषण वाढत गेले. तब्बल ५० दिवस हे आंदोलन सुरूच होते. या आंदोलनादरम्यान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनकर्त्यांची चारदा भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्यातील सत्यता आणि न्यायिकता पडताळून पाहण्यासाठी वनमंत्र्यांनी कालावधी मागितला आणि आंदोलन मागे घेण्याची सूचना केली. तरीही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.साखळी उपोषणाचे ५० दिवस पूर्ण झाल्यानंतर आता या विद्यार्थ्यांनी आंदोलन आणखी तीव्र करीत बेमुदत उपोषण सुरू केले आहेत. १ मार्चपासून रोहित लांबे, नागेश डोंगरे, अक्षय पवार, महेश काकडे, हरीश गजभिये, पंकज लोनकर आणि सद्दाम हुसेन संदे हे आठ विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मागणीची दखल घेईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा त्यांचा निर्घार आहे. (शहर प्रतिनिधी)