शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

टीसीसाठी मोजा ५०० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 01:29 IST

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता अतिशय महत्त्वाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) आवश्यक आहे.

जि.प. चिमूर शाळेतील प्रकार : गरीब पालकांची लूटराजकुमार चुनारकर खडसंगी (चिमूर)विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता अतिशय महत्त्वाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) आवश्यक आहे. पुढच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला सादर करावा लागतो. मात्र खासगी शाळांच्या विद्यार्थी मिळवण्याच्या शर्यतीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांची पिळवणूक होत असून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी चक्क दाखल्यासाठी पाचशे रुपये आकारणे सुरू केले आहे. त्यामुळे टीसीचे भाव कडाडल्याचे चित्र चिमूर शहरात दिसून येत आहे. जून महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे आतापासूनच पालक आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून वर्ग चार व वर्ग सात मधून उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला काढण्याची लगबग सुरू केली आहे. जि.प. च्या शाळांमध्ये वर्ग एक ते चार तसेच सातवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. यासाठी शाळा सोडल्याचा दाखला गरजेचा आहे. हा दाखला काढण्यासाठी पालक शाळेत गेले असता, त्यांच्याकडून शाळा सुधार फंड म्हणून ५०० रुपयांची पावती फाडून दाखला देण्यात येत आहे. पैसे दिले नाही तर दाखला देण्यास विरोध केलाजात असल्याची ओरड पालकांकडून सुरू आहे.आरटीई अधीनियमानुसार सर्व विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे याकरिता शासनाने हा कायदा केला. या कायद्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणे, हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. मात्र शिक्षणासाठी शाळेत नाव दाखल करण्यासाठी टीसीच्या नावावर चिमूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या क्रमांक एक या शाळेतून पालकाकडून टीसीसाठी शाळा सुधार फंडाच्या नावावर पाचशे रुपये घेतले जात आहे. मुख्याध्यापकाकडून देण्यात येणाऱ्या पावतीवर मात्र सही व शिक्का सुद्धा नाही. त्यामुळे सही व शिक्का मारण्यास मुख्याध्यापक विसरले की जाणीवपूर्वक मारला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळात सर्वसामान्य मजूर वर्गाचे विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र त्यांच्या पाल्यांच्या पुढील शिक्षणासाठी पाचशे रूपयाचा खर्च न परवडणारा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा चिमूरकडून दाखल्यासाठी होत असलेल्या पाचशे रुपयाच्या वसुलीतून गरीब पालकांची लूट होत आहे. या प्रकारावर आळा बसवून अशी सक्ती करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.आरटीई अधिनियमाचे उल्लंघन० ते १४ वर्षे वयोगटातील सर्व प्रवर्गातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायदा केला. मात्र टीसीसाठी ५०० रुपये शाळा सुधारफंड आकारून चिमूर शहरात या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे.आपल्या वर्गाची पटसंख्या टिकून राहावी यासाठी खासगी शाळाचे शिक्षक पालकांना अनेक आमिष दाखवित आहेत. टीसीचे पैसेही शिक्षकच देतात, अशा समजूतीतून टीसीचा दर वाढल्याची चर्चा शिक्षक वर्गात सुरू आहे.टीसीसाठी पैसे घेण्याचा नियम नाहीया प्रकाराबाबत शिक्षक विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, टीसीसाठी पैसे घेण्याचा शासनाचा असा कुठलाही नियम नाही. मात्र शाळेच्या भौगोलिक दुरुस्तीसाठी व्यवस्थापन समितीने ठरविले तर काही रक्कम घेता येवू शकते. मात्र बळजबरी करता येत नाही.