शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

उद्योगबंदीच्या स्थितीमुळे ५०० कोटींची गुंतवणूक ठप्प

By admin | Updated: December 23, 2014 23:00 IST

जिल्ह्यातील आणि चंद्रपूर परिसरातील उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीमुळे ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक ठप्प पडली आहे. एवढेच नाही तर, एमआयडीसी क्षेत्रातील चार स्पंज आयर्न प्लँटही बंद पडले आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्यातील आणि चंद्रपूर परिसरातील उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीमुळे ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक ठप्प पडली आहे. एवढेच नाही तर, एमआयडीसी क्षेत्रातील चार स्पंज आयर्न प्लँटही बंद पडले आहेत. उद्योगांना या स्थितीतून बाहेर काढण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी अलिकडेच उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन सहकार्याची विनंती केली. यातून काय मार्ग निघतो, याकडे आता उद्योजकांचे लक्ष लागले आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लोह आहे. त्याची चाचणी करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे. हे क्षेत्र नक्षलग्रस्तभागात येत असल्याने व्यावसायिकांना अडचणीचे ठरत आहे. खनिज संपत्ती उपलब्ध असतानाही त्याचा वापर करता येत नसल्याने यासंदर्भात सरकारने निर्णय घेण्याची विनंती उद्योजकांकडून होत आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाने २०१० पासून चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगबंदी घातली आहे. यामुळे नव्या उद्योगांचा मार्ग बंद झाला आहे. अनेक गुंतरवणूकदार आणि उद्योजक या जिल्ह्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आतूर असले तरी बंदी हटविण्याच्या मागणीवर निर्णय झाला नाही.अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर अधिक असल्याची उद्योजकांची ओरड आहे. याचा प्रतिकूल परिणाम स्टिल आणि प्लॉस्टीक उद्योगावर पडत असल्याने स्पर्धेत हे उद्योजक टिकू शकत नाही, असे उद्योजकांचे मत आहे.कोळसा हा उद्योगांमध्ये महत्वाचा असला तरी आॅक्शनमध्ये तो खरेदी करावा लागत असल्याने दर अधिक पडतो. यामुळे विजेच्या उत्पादन दरातही वाढ होते. अधिक दराची वीज खरेदी करण्यास सरकार आणि अन्य उद्योगसमूह तयार नसल्याने हा खर्च कसा पेलवायचा असा प्रश्न उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)