शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

उद्योगबंदीच्या स्थितीमुळे ५०० कोटींची गुंतवणूक ठप्प

By admin | Updated: December 23, 2014 23:00 IST

जिल्ह्यातील आणि चंद्रपूर परिसरातील उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीमुळे ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक ठप्प पडली आहे. एवढेच नाही तर, एमआयडीसी क्षेत्रातील चार स्पंज आयर्न प्लँटही बंद पडले आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्यातील आणि चंद्रपूर परिसरातील उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीमुळे ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक ठप्प पडली आहे. एवढेच नाही तर, एमआयडीसी क्षेत्रातील चार स्पंज आयर्न प्लँटही बंद पडले आहेत. उद्योगांना या स्थितीतून बाहेर काढण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी अलिकडेच उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन सहकार्याची विनंती केली. यातून काय मार्ग निघतो, याकडे आता उद्योजकांचे लक्ष लागले आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लोह आहे. त्याची चाचणी करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे. हे क्षेत्र नक्षलग्रस्तभागात येत असल्याने व्यावसायिकांना अडचणीचे ठरत आहे. खनिज संपत्ती उपलब्ध असतानाही त्याचा वापर करता येत नसल्याने यासंदर्भात सरकारने निर्णय घेण्याची विनंती उद्योजकांकडून होत आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाने २०१० पासून चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगबंदी घातली आहे. यामुळे नव्या उद्योगांचा मार्ग बंद झाला आहे. अनेक गुंतरवणूकदार आणि उद्योजक या जिल्ह्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आतूर असले तरी बंदी हटविण्याच्या मागणीवर निर्णय झाला नाही.अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर अधिक असल्याची उद्योजकांची ओरड आहे. याचा प्रतिकूल परिणाम स्टिल आणि प्लॉस्टीक उद्योगावर पडत असल्याने स्पर्धेत हे उद्योजक टिकू शकत नाही, असे उद्योजकांचे मत आहे.कोळसा हा उद्योगांमध्ये महत्वाचा असला तरी आॅक्शनमध्ये तो खरेदी करावा लागत असल्याने दर अधिक पडतो. यामुळे विजेच्या उत्पादन दरातही वाढ होते. अधिक दराची वीज खरेदी करण्यास सरकार आणि अन्य उद्योगसमूह तयार नसल्याने हा खर्च कसा पेलवायचा असा प्रश्न उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)