शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगबंदीच्या स्थितीमुळे ५०० कोटींची गुंतवणूक ठप्प

By admin | Updated: December 23, 2014 23:00 IST

जिल्ह्यातील आणि चंद्रपूर परिसरातील उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीमुळे ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक ठप्प पडली आहे. एवढेच नाही तर, एमआयडीसी क्षेत्रातील चार स्पंज आयर्न प्लँटही बंद पडले आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्यातील आणि चंद्रपूर परिसरातील उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीमुळे ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक ठप्प पडली आहे. एवढेच नाही तर, एमआयडीसी क्षेत्रातील चार स्पंज आयर्न प्लँटही बंद पडले आहेत. उद्योगांना या स्थितीतून बाहेर काढण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी अलिकडेच उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन सहकार्याची विनंती केली. यातून काय मार्ग निघतो, याकडे आता उद्योजकांचे लक्ष लागले आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लोह आहे. त्याची चाचणी करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे. हे क्षेत्र नक्षलग्रस्तभागात येत असल्याने व्यावसायिकांना अडचणीचे ठरत आहे. खनिज संपत्ती उपलब्ध असतानाही त्याचा वापर करता येत नसल्याने यासंदर्भात सरकारने निर्णय घेण्याची विनंती उद्योजकांकडून होत आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाने २०१० पासून चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगबंदी घातली आहे. यामुळे नव्या उद्योगांचा मार्ग बंद झाला आहे. अनेक गुंतरवणूकदार आणि उद्योजक या जिल्ह्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आतूर असले तरी बंदी हटविण्याच्या मागणीवर निर्णय झाला नाही.अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर अधिक असल्याची उद्योजकांची ओरड आहे. याचा प्रतिकूल परिणाम स्टिल आणि प्लॉस्टीक उद्योगावर पडत असल्याने स्पर्धेत हे उद्योजक टिकू शकत नाही, असे उद्योजकांचे मत आहे.कोळसा हा उद्योगांमध्ये महत्वाचा असला तरी आॅक्शनमध्ये तो खरेदी करावा लागत असल्याने दर अधिक पडतो. यामुळे विजेच्या उत्पादन दरातही वाढ होते. अधिक दराची वीज खरेदी करण्यास सरकार आणि अन्य उद्योगसमूह तयार नसल्याने हा खर्च कसा पेलवायचा असा प्रश्न उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)