शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर तालुक्यातील ५० टक्के शेती पडीत

By admin | Updated: August 31, 2014 23:42 IST

निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या उदासीनतेमुळे चिमूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे तर यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

अमोद गौरकार - शंकरपूरनिसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या उदासीनतेमुळे चिमूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे तर यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. तालुक्यातील ५० टक्के जमिन यावर्षी पडीत आहे. चिमूर तालुक्यातील ८० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. तालुक्यात मोठा उद्योग नसल्याने तालुक्यातील नागरिकांचे शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. त्यातही शेकडो एकर शेतजमीन चनसल्याने कोरडवाहू शेतीवरच भर दिल्या जात आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीने खचून न जाता यावर्षी चांगली शेती करावी, या नव्या जिद्दीने शेतीकरी कामाला लागले. परंतु, याहीवर्षी निसर्गाने दगा दिला. अर्धा हंगाम जाऊनही समाधानकारक पाऊस झाला नाही. अत्यल्प पावसामुळे पिके सुकत आहेत. तर भात पिकाची अजूनही लागवड झाली नाही. त्यामुळे यावेळी धानपिक होणारच नाही. तर ज्यांनी कापूस व सोयाबीन पिके घेतली त्याही पिकावर रोगांचा प्रादुर्भावामुळे तेही पिके करपल्या जात आहे.चिमूर तालुक्यात ७० हजार २३६ हेक्टर जमीन पिक क्षेत्राखाली येते. यातील १२ हजार १९९ हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. तर उर्वरीत ५८ हजार हेक्टर जमीन कोरडवाहू आहे. त्यामुळे निसर्गाची साथ मिळाली तरच चिमूर तालुक्यातील शेतीत भरघोस उत्पन्न मिळते. यावर्षी सुरवातीपासूनच पावसाने दगा दिला. ज्यांनी शेतात काहीच पेरले नाही, त्यांच्या जमिनी आजही पडीत आहे. तर ज्यांनी सोयाबीन व कापूस पेरले आहेत, तेही पावसाअभावी करपू लागले आहे. करपलेले पिके पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रु आवरणे कठीण झाले आहे.शासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन तत्काळ आर्थिक मदत वितरीत करण्याची मागणी जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून होत आहे.