शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

एम्टाच्या ४६८ कामगारांना थकीत वेतन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:28 IST

कोळसा खाण बंद झाल्यानंतर येथील कामगारांनी कामगार नेता राजू डोंगे यांच्या नेतृत्वात जेल भरो, भिक मांगो, टॉवरवर चढून विरुगिरी, भद्रावती ते चंद्रपूर पायदळ जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे आणि धरणे देणे या प्रकारची आंदोलने छेडली.

ठळक मुद्देमार्ग मोकळा : कामगारांची पडताळणी अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : तालुक्यात बरांज ( मो. ) गावाजवळ जानेवारी २००८ मध्ये कर्नाटका एम्टा कंपनीची कोळसा खाण सुरु करण्यात आली. परंतु २७ सप्टेंबर २०१४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१५ पासून ही कोळसा खाण बंद करण्यात आली. या खाणीत तत्कालीन ४६८ कामगार कार्यरत होते. पंरतु तेथील कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामगारांचे वेतन बंद करण्यात आले. दरम्यान, या कंपनीचे व्यवस्थापन केपीसीएलला वर्ग करण्यात आले. आता तत्कालीन कार्यरत असणाऱ्या कामगारांना सहा महिन्यांचे वेतन मिळणार आहे.कोळसा खाण बंद झाल्यानंतर येथील कामगारांनी कामगार नेता राजू डोंगे यांच्या नेतृत्वात जेल भरो, भिक मांगो, टॉवरवर चढून विरुगिरी, भद्रावती ते चंद्रपूर पायदळ जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे आणि धरणे देणे या प्रकारची आंदोलने छेडली. या दरम्यान कंपनीतील कामगार बरांज येथील रहिवासी निलेश निखाडे याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्याही केली. त्यानंतर शासन आणि प्रशासनाने या आत्महत्येची व आंदोलनांची दखल घेवून १६ मे २०१६ रोजी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत केपीसीएल कंपनीने कामगारांप्रति सहानुभुती म्हणून सहा महिन्यांचे वेतन देण्याचे मान्य केले. परंतु तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही कामगारांना वेतन मिळाले नाही. यामुळे कामगारात असंतोष उफाळून आला. दरम्यान, ५ आॅगस्ट २०१९ रोजी चंद्रपूर येथे खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. कुनाल खेमणार, केपीसीएलचे अधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगराध्यक्ष अनिल धानोरकर, कामगार प्रतिनिधी राजू डोंगे, विनोद मत्ते, अशोक घोडमारे, आणि दिनेश वानखेडे यांच्यासह फार मोठया संख्येने कामगार बंधू हजर होते. या बैठकीनंतर कामगारांना वेतन मिळण्याच्या प्रक्रियेला वेग आला. यानुसार अलिकडे ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०१९ या कालावधीत कामगारांची व्यक्तीगत सत्यता पडताळणी केपीसीएलच्या अधिकाºयांद्वारे व जिल्हा खनिकर्म अधिकाºयांद्वारे करण्यात आल्याचे समजते.