शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्य सरकारकडे अडकले जीएसटी परताव्याचे ५ कोटी २९ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

चंद्रपूर महानगर पालिकेकडून दरवर्षी अत्यावश्यक बाबींवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. प्रामुख्याने कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी सर्वाधिक निधी आरक्षित ठेवावा लागतो. शिवाय, शहरातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आणि अन्य कामांसाठी निधी राखून आरक्षित ठेवले जाते. शिवाय विकास आराखड्यातील मंजूर कामांसाठी स्वतंत्र उभारला जातो.

ठळक मुद्देचंद्रपूर मनपाची अर्थकोंडी : लॉकडाऊनमुळे मालमत्ता कर व जीएसटी परताव्यावरच मतदार

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे उद्योग-व्यवसायांचे अर्थचक्र थांबले. लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता दिल्याने काही व्यवसाय सुरू झालेत. मात्र, आगामी आर्थिक वर्षात मनपाचे कोट्यवधींचे उत्पन्न घटणार आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी मनपाची मदार आता केवळ मालमत्ता कर आणि जीएसटी परताव्यावरच असणार आहे. विशेष म्हणजे जीएसटी परताव्याचा ५ कोटी २९ लाखांचा निधी राज्य सरकारकडून अद्याप मिळाला नाही. त्यामुळे मनपाला यापुढे विकासकामांचे प्राधान्यक्रमच बदलावे लागणार आहे.चंद्रपूर महानगर पालिकेकडून दरवर्षी अत्यावश्यक बाबींवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. प्रामुख्याने कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी सर्वाधिक निधी आरक्षित ठेवावा लागतो. शिवाय, शहरातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आणि अन्य कामांसाठी निधी राखून आरक्षित ठेवले जाते. शिवाय विकास आराखड्यातील मंजूर कामांसाठी स्वतंत्र उभारला जातो. यंदा कोरोनामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने यंदा महानगर पालिकेला कोट्यवधींच्या महसुली उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. दर महिन्याला मनपाला जीएसटी परतावा म्हणून राज्य सरकारकडून रक्कम अदा केली जाते. जीएसटी परताव्याच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत भर पडत असते. कोरोनामुळे उत्पन्न घटल्याने जीएसटी परताव्यावरच मनपाला अवलंबून राहण्याची वेळ आहे. तिजोरीत खळखळाट झाल्यास अत्यावश्यक कामे वगळून काही निर्माणाधिन व प्रस्तावित विकास कामांनाही गुंडाळून ठेवण्याची वेळ मनपावर येऊ शकते. अशा आर्थिक पेचप्रसंगात जीएसटी परतावा मोठा आधार आहे. मात्र, राज्य सरकारकडून ५ कोटी २९ लाख केव्हा मिळणार, याची मनपाला प्रतीक्षा आहे.करवसुली फक्त ५८ टक्केसन २०१८-१९ च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार ३४ कोटी ९१ लाख आणि सन २०१९-२० च्या अंदाजपत्रकानुसार ३४ कोटी ७२ लाखांचे उत्पन्न निधी विविध प्रकारच्या करातून मनपाला मिळाले. यामध्ये मालमत्ता कराचामोठा वाटा आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ५८ टक्के कर वसुली झाली. जानेवारी, फेबु्रवारी व मार्च महिन्यातच मोठी कर वसुली होते. लॉकडाऊनमुळे यंदाचे गणित बिघडले. मालमत्ता कर वसुलीसाठी डिमांड बूक छापण्याचे काम सुरू आहे. परंतु, कोरोनाचे संकट पूर्णत: टळल्यानंतरच पुढची कार्यवाही करावी लागणार आहे.कोरोना प्रतिबंधासाठी २ कोटी ३३ लाखकोरोनाविरूद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनपा जिल्हा नियोजन समितीकडून २ कोटी ३३ लाखांचा निधी मिळाला. यातून शहरात अनेक उपाययोजना केल्या जात आहेत, असा दावा मनपाने केला. स्वबळावर निधी उभारणे शक्य नसल्याने कोरोनावर मात करण्यासाठी पुन्हा सुमारे १२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्राने दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मनपाकडून विविध प्रतिबंध उपाययोजना सुरू आहेत. यंदा कर वसुलीवर अनिष्ट परिणाम झाला आहे. राज्य शासनाकडून जीएसटी परताव्याची रक्कम मनपाला येणे बाकी आहे.- राजेश मोहिते,आयुक्त, मनपा, चंद्रपूर

टॅग्स :GSTजीएसटीState Governmentराज्य सरकार