शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४९८ वैयक्तिक दाव्यांची जमीन अद्याप मोजणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

उपविभागाचे दावे २९ फेब्रुवारी तर जिल्हास्तरावरील दावे ३१ मार्च २०२० पर्यंत निकाली काढण्याचे नियोजन जिल्हास्तरीय वनहक्क समितीने केले आहे. दावे मंजूर झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. आतापर्यंत ३ हजार ७४ दाव्यांची प्रक्रिया आटोपली. त्यामुळे या सर्व दावेदारांना सातबारा वाटप करण्यात आला. हे सातबाराधारक दावेदार आता शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात.

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा समितीने मंजूर केलेल्या ३ हजार ८७२ वैयक्तिक आदिवासी वनहक्क दाव्यांपैकी ३ हजार ७४ दावेदारांना सातबारा वाटप करण्यात आला. ३१ मार्च २०२० पर्यंत ३०० दावेदारांना सातबारा वाटपाचे नियोजन प्रशासनाने केले. मात्र भूमी अभिलेख कार्यालयाकडून ४९८ वैयक्तिक दावेदारांच्या जमिनीची मोजणी प्रक्रिया अद्याप झाली नाही. त्यामुळे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून कालबद्ध कार्यक्रम आखून २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत मोजणीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.वनहक्क अधिनियम अंतर्गत उपविभाग स्तरावरील वैयक्तिक वनहक्क दावे तातडीने निकाली काढण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. सद्यस्थितीत उपविभागस्तरावर ११५ आणि जिल्हास्तरावर २०७ दावे प्रलंबित आहेत. त्यामध्ये सर्वाधिक प्रलंबित दावे असलेल्या विभागात चंद्रपूर, मूल, चिमूर, वरोरा, ब्रह्मपुरी व नागभीडचा समावेश आहे.उपविभागाचे दावे २९ फेब्रुवारी तर जिल्हास्तरावरील दावे ३१ मार्च २०२० पर्यंत निकाली काढण्याचे नियोजन जिल्हास्तरीय वनहक्क समितीने केले आहे. दावे मंजूर झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. आतापर्यंत ३ हजार ७४ दाव्यांची प्रक्रिया आटोपली. त्यामुळे या सर्व दावेदारांना सातबारा वाटप करण्यात आला. हे सातबाराधारक दावेदार आता शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात. सातबाराअभावी नागरिक योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी बैठका घेण्यात आल्या. मंजूर झालेल्या वैयक्तिक व सामूहिक दावेदारांना शासनाच्या कोणत्याही विभागांकडून अडवणूक न करता कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिल्या होत्या. याचा चांगला परिणाम जिल्ह्यात दिसून आला. मात्र हक्काचा सातबारा मिळणे, ही बाब महत्त्वपूर्ण आहे. आजमितीस मोजणी पूर्ण होऊनही ३०० दावेदारांना सातबारा मिळाला नाही. यामध्ये गोंडपिपरी उपविभागातील गोंडपिपरी व पोंभुर्णा तालुक्याचा समावेश आहे. शिवाय दावे मंजूर झाल्यानंतर ४९८ दावेदारांच्या जमिनीची मोजणी झाली नाही. याकरिता जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाला २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत मुदत दिली. त्यामुळे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून कालबद्ध कृती कार्यक्रमाची जलदगतीने अंमलबजावणी होते काय, याकडे जिल्ह्यातील वनहक्कधारकांचे लक्ष लागले आहे.२२६ दाव्यांचे पुनर्विलोकनजिल्ह्यातील आदिवासींनी सादर केलेल्या दाव्यांपैकी २२६ दाव्यांचे पुनर्विलोकन करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी २१ डिसेंबर २०१९ रोजी दिला. त्यामुळे संबंधित विभागाने कार्यबद्ध कार्यक्रम तयार करून तीन महिन्यात सदर दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

टॅग्स :agricultureशेती