शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

४९८ वैयक्तिक दाव्यांची जमीन अद्याप मोजणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

उपविभागाचे दावे २९ फेब्रुवारी तर जिल्हास्तरावरील दावे ३१ मार्च २०२० पर्यंत निकाली काढण्याचे नियोजन जिल्हास्तरीय वनहक्क समितीने केले आहे. दावे मंजूर झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. आतापर्यंत ३ हजार ७४ दाव्यांची प्रक्रिया आटोपली. त्यामुळे या सर्व दावेदारांना सातबारा वाटप करण्यात आला. हे सातबाराधारक दावेदार आता शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात.

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा समितीने मंजूर केलेल्या ३ हजार ८७२ वैयक्तिक आदिवासी वनहक्क दाव्यांपैकी ३ हजार ७४ दावेदारांना सातबारा वाटप करण्यात आला. ३१ मार्च २०२० पर्यंत ३०० दावेदारांना सातबारा वाटपाचे नियोजन प्रशासनाने केले. मात्र भूमी अभिलेख कार्यालयाकडून ४९८ वैयक्तिक दावेदारांच्या जमिनीची मोजणी प्रक्रिया अद्याप झाली नाही. त्यामुळे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून कालबद्ध कार्यक्रम आखून २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत मोजणीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.वनहक्क अधिनियम अंतर्गत उपविभाग स्तरावरील वैयक्तिक वनहक्क दावे तातडीने निकाली काढण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. सद्यस्थितीत उपविभागस्तरावर ११५ आणि जिल्हास्तरावर २०७ दावे प्रलंबित आहेत. त्यामध्ये सर्वाधिक प्रलंबित दावे असलेल्या विभागात चंद्रपूर, मूल, चिमूर, वरोरा, ब्रह्मपुरी व नागभीडचा समावेश आहे.उपविभागाचे दावे २९ फेब्रुवारी तर जिल्हास्तरावरील दावे ३१ मार्च २०२० पर्यंत निकाली काढण्याचे नियोजन जिल्हास्तरीय वनहक्क समितीने केले आहे. दावे मंजूर झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. आतापर्यंत ३ हजार ७४ दाव्यांची प्रक्रिया आटोपली. त्यामुळे या सर्व दावेदारांना सातबारा वाटप करण्यात आला. हे सातबाराधारक दावेदार आता शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात. सातबाराअभावी नागरिक योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी बैठका घेण्यात आल्या. मंजूर झालेल्या वैयक्तिक व सामूहिक दावेदारांना शासनाच्या कोणत्याही विभागांकडून अडवणूक न करता कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिल्या होत्या. याचा चांगला परिणाम जिल्ह्यात दिसून आला. मात्र हक्काचा सातबारा मिळणे, ही बाब महत्त्वपूर्ण आहे. आजमितीस मोजणी पूर्ण होऊनही ३०० दावेदारांना सातबारा मिळाला नाही. यामध्ये गोंडपिपरी उपविभागातील गोंडपिपरी व पोंभुर्णा तालुक्याचा समावेश आहे. शिवाय दावे मंजूर झाल्यानंतर ४९८ दावेदारांच्या जमिनीची मोजणी झाली नाही. याकरिता जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाला २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत मुदत दिली. त्यामुळे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून कालबद्ध कृती कार्यक्रमाची जलदगतीने अंमलबजावणी होते काय, याकडे जिल्ह्यातील वनहक्कधारकांचे लक्ष लागले आहे.२२६ दाव्यांचे पुनर्विलोकनजिल्ह्यातील आदिवासींनी सादर केलेल्या दाव्यांपैकी २२६ दाव्यांचे पुनर्विलोकन करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी २१ डिसेंबर २०१९ रोजी दिला. त्यामुळे संबंधित विभागाने कार्यबद्ध कार्यक्रम तयार करून तीन महिन्यात सदर दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

टॅग्स :agricultureशेती