शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
2
झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
3
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
4
कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
5
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
6
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
7
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
8
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
9
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
10
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
11
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
12
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
13
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
14
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
15
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
16
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
17
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
18
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
20
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे

पाच वर्षात ४६ जणांचा बळी

By admin | Updated: December 16, 2014 22:49 IST

जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष पेटला आहे. गेल्या पाच वर्षात हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांना जीव गमवावा लागला असून या घटनांवर अद्यापही आळा घालता आलेला नाही. त्यामुळे जंगली भागातील नागरिक

मानव-वन्यप्राणी संघर्ष : वाघ-बिबट हल्ल्यात ३५ जणांनी गमावला जीवमंगेश भांडेकर - चंद्रपूरजिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष पेटला आहे. गेल्या पाच वर्षात हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांना जीव गमवावा लागला असून या घटनांवर अद्यापही आळा घालता आलेला नाही. त्यामुळे जंगली भागातील नागरिक भीतीत जीवन जगत आहेत. वन्यप्राणी गावात प्रवेश करून जनावरांवर हल्ले, सरपन गोळा करणाऱ्या, शेतकाम करणाऱ्या अनेकांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिक जंगलात एकट्याने जाण्यास धजावत आहेत. वनविभाग वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी विविध उपाययोजना करून नागरिकांना जंगलात जाण्यापासून सावध करीत आहे. परंतु वन्यप्राणी हल्ल्याच्या घटना कमी झालेल्या नाही. २०१० ते डिसेंबर २०१४ पर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांचा बळी गेला आहे. यात ३५ घटना वाघ व बिबट हल्ल्याच्या आहेत. तर रान डुक्कराच्या हल्ल्यात सहा, अस्वल एक व रानगवा प्राण्याच्या हल्ल्यात एकाचा जीव गेला आहे. यामध्ये काही मृतकाच्या कुटुंबाना प्रत्येकी दोन लाख, पाच लाख तर एका कुटुंबाला केवळ एक लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. दोन मृतांची ओळख पटली नाही. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा ठार झालेल्यांच्या कुटुंबाला वनविभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र, विविध कागदपत्राची पुर्तता करावी लागत असल्याने त्रास सहन करावा लागत असल्याचे मृताच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. सरत्या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ९ जणांचा बळी गेला आहे. यात तीन रानडुक्कर, एक अस्वल व पाच घटना वाघ हल्ल्याच्या आहेत. या घटनांतील सर्व मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात घरचा कर्ता व्यक्ती गेल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्नन त्यांच्या समोर असून भविष्यात मानव-वन्यप्राणी संघर्षातून कोणतीही जीवीत हानी होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.