शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पाच वर्षात ४६ जणांचा बळी

By admin | Updated: December 16, 2014 22:49 IST

जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष पेटला आहे. गेल्या पाच वर्षात हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांना जीव गमवावा लागला असून या घटनांवर अद्यापही आळा घालता आलेला नाही. त्यामुळे जंगली भागातील नागरिक

मानव-वन्यप्राणी संघर्ष : वाघ-बिबट हल्ल्यात ३५ जणांनी गमावला जीवमंगेश भांडेकर - चंद्रपूरजिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष पेटला आहे. गेल्या पाच वर्षात हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांना जीव गमवावा लागला असून या घटनांवर अद्यापही आळा घालता आलेला नाही. त्यामुळे जंगली भागातील नागरिक भीतीत जीवन जगत आहेत. वन्यप्राणी गावात प्रवेश करून जनावरांवर हल्ले, सरपन गोळा करणाऱ्या, शेतकाम करणाऱ्या अनेकांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिक जंगलात एकट्याने जाण्यास धजावत आहेत. वनविभाग वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी विविध उपाययोजना करून नागरिकांना जंगलात जाण्यापासून सावध करीत आहे. परंतु वन्यप्राणी हल्ल्याच्या घटना कमी झालेल्या नाही. २०१० ते डिसेंबर २०१४ पर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांचा बळी गेला आहे. यात ३५ घटना वाघ व बिबट हल्ल्याच्या आहेत. तर रान डुक्कराच्या हल्ल्यात सहा, अस्वल एक व रानगवा प्राण्याच्या हल्ल्यात एकाचा जीव गेला आहे. यामध्ये काही मृतकाच्या कुटुंबाना प्रत्येकी दोन लाख, पाच लाख तर एका कुटुंबाला केवळ एक लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. दोन मृतांची ओळख पटली नाही. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा ठार झालेल्यांच्या कुटुंबाला वनविभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र, विविध कागदपत्राची पुर्तता करावी लागत असल्याने त्रास सहन करावा लागत असल्याचे मृताच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. सरत्या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ९ जणांचा बळी गेला आहे. यात तीन रानडुक्कर, एक अस्वल व पाच घटना वाघ हल्ल्याच्या आहेत. या घटनांतील सर्व मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात घरचा कर्ता व्यक्ती गेल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्नन त्यांच्या समोर असून भविष्यात मानव-वन्यप्राणी संघर्षातून कोणतीही जीवीत हानी होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.