शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

पाच वर्षात ४६ जणांचा बळी

By admin | Updated: December 16, 2014 22:49 IST

जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष पेटला आहे. गेल्या पाच वर्षात हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांना जीव गमवावा लागला असून या घटनांवर अद्यापही आळा घालता आलेला नाही. त्यामुळे जंगली भागातील नागरिक

मानव-वन्यप्राणी संघर्ष : वाघ-बिबट हल्ल्यात ३५ जणांनी गमावला जीवमंगेश भांडेकर - चंद्रपूरजिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष पेटला आहे. गेल्या पाच वर्षात हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांना जीव गमवावा लागला असून या घटनांवर अद्यापही आळा घालता आलेला नाही. त्यामुळे जंगली भागातील नागरिक भीतीत जीवन जगत आहेत. वन्यप्राणी गावात प्रवेश करून जनावरांवर हल्ले, सरपन गोळा करणाऱ्या, शेतकाम करणाऱ्या अनेकांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिक जंगलात एकट्याने जाण्यास धजावत आहेत. वनविभाग वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी विविध उपाययोजना करून नागरिकांना जंगलात जाण्यापासून सावध करीत आहे. परंतु वन्यप्राणी हल्ल्याच्या घटना कमी झालेल्या नाही. २०१० ते डिसेंबर २०१४ पर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांचा बळी गेला आहे. यात ३५ घटना वाघ व बिबट हल्ल्याच्या आहेत. तर रान डुक्कराच्या हल्ल्यात सहा, अस्वल एक व रानगवा प्राण्याच्या हल्ल्यात एकाचा जीव गेला आहे. यामध्ये काही मृतकाच्या कुटुंबाना प्रत्येकी दोन लाख, पाच लाख तर एका कुटुंबाला केवळ एक लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. दोन मृतांची ओळख पटली नाही. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा ठार झालेल्यांच्या कुटुंबाला वनविभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र, विविध कागदपत्राची पुर्तता करावी लागत असल्याने त्रास सहन करावा लागत असल्याचे मृताच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. सरत्या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ९ जणांचा बळी गेला आहे. यात तीन रानडुक्कर, एक अस्वल व पाच घटना वाघ हल्ल्याच्या आहेत. या घटनांतील सर्व मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात घरचा कर्ता व्यक्ती गेल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्नन त्यांच्या समोर असून भविष्यात मानव-वन्यप्राणी संघर्षातून कोणतीही जीवीत हानी होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.