शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

४६ अंशाचा पारा अंगावर झेलतोयं बळीराजा !

By admin | Updated: May 27, 2016 01:10 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाची शेती विषयीची उदासीनता, यामुळे शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे.

बळीराजा पुन्हा व्यस्त : रखरखत्या उन्हात मशागतीच्या कामांना वेग प्रकाश काळे गोवरीनिसर्गाचा लहरीपणा आणि शासनाची शेती विषयीची उदासीनता, यामुळे शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करुनही शेवटी हाती काहीच शिल्लक राहत नाही. केलेली मेहनतही व्यर्थ ठरते. परंतु पुन्हा उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून ४६ अंश सेल्सीअस तापमानात शेतीच्या मशागतीत बळीराजा व्यस्त झाला आहे. कुटुंबियांची पोटाची खडगी भरावी, या एकमेव आशेपोटी स्वत:चे अंग होरपळून काढत आहे.कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट आहे. देशातील ७० टक्के शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्ग आजकाल लहरीपणाने वागायला लागला आहे.यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविल्यानंतर मायबाप सरकारनेही तोकडा दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. उत्पादनापेक्षा खर्च अधिक वाढल्यने यावर्षी खर्च केलेला पैसा निघाला नाही. परिणामी शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात चंद्रपूर जिल्हा सर्वात उष्ण समजला जातो. उन्हात बाहेर पडले तर जीव कासावीस होतो. एवढे तप्त ऊन्ह आहे. अशा रणरणत्या उन्हात शेतीची कामे करणे म्हणजे जीवाचा अंत पाहण्यासारखे आहे. शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना लागला आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. बि-बियाणे घ्यायलाही शेतकऱ्यांकडे पैसा उरला नाही. उत्पादनात घट आल्याने कर्जाचा डोंगर वाढला आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाल्याने शेती कसायची सारी इच्छाच मरुन गेली आहे. मात्र कुटुंबियांचे उपाशी पोट आजही त्याला स्वस्थ बसू देत नाही. बळीराजा ४६ अंशाचा पारा अंगावर झेलत मशागतीची कामे करीत आहे. ना निसर्गाची साथ, ना शासनाचा मदतीचा हात.शेतकऱ्यांचा वाली कोणीच उरला नाही. त्यामुळे शेतकरी पार वैतागून गेला आहे. मात्र वास्तवाशी झुंज देत जगणे हेच शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे.