शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

४६ अंशाचा पारा अंगावर झेलतोयं बळीराजा !

By admin | Updated: May 27, 2016 01:10 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाची शेती विषयीची उदासीनता, यामुळे शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे.

बळीराजा पुन्हा व्यस्त : रखरखत्या उन्हात मशागतीच्या कामांना वेग प्रकाश काळे गोवरीनिसर्गाचा लहरीपणा आणि शासनाची शेती विषयीची उदासीनता, यामुळे शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करुनही शेवटी हाती काहीच शिल्लक राहत नाही. केलेली मेहनतही व्यर्थ ठरते. परंतु पुन्हा उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून ४६ अंश सेल्सीअस तापमानात शेतीच्या मशागतीत बळीराजा व्यस्त झाला आहे. कुटुंबियांची पोटाची खडगी भरावी, या एकमेव आशेपोटी स्वत:चे अंग होरपळून काढत आहे.कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट आहे. देशातील ७० टक्के शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्ग आजकाल लहरीपणाने वागायला लागला आहे.यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविल्यानंतर मायबाप सरकारनेही तोकडा दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. उत्पादनापेक्षा खर्च अधिक वाढल्यने यावर्षी खर्च केलेला पैसा निघाला नाही. परिणामी शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात चंद्रपूर जिल्हा सर्वात उष्ण समजला जातो. उन्हात बाहेर पडले तर जीव कासावीस होतो. एवढे तप्त ऊन्ह आहे. अशा रणरणत्या उन्हात शेतीची कामे करणे म्हणजे जीवाचा अंत पाहण्यासारखे आहे. शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना लागला आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. बि-बियाणे घ्यायलाही शेतकऱ्यांकडे पैसा उरला नाही. उत्पादनात घट आल्याने कर्जाचा डोंगर वाढला आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाल्याने शेती कसायची सारी इच्छाच मरुन गेली आहे. मात्र कुटुंबियांचे उपाशी पोट आजही त्याला स्वस्थ बसू देत नाही. बळीराजा ४६ अंशाचा पारा अंगावर झेलत मशागतीची कामे करीत आहे. ना निसर्गाची साथ, ना शासनाचा मदतीचा हात.शेतकऱ्यांचा वाली कोणीच उरला नाही. त्यामुळे शेतकरी पार वैतागून गेला आहे. मात्र वास्तवाशी झुंज देत जगणे हेच शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे.