शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

धडक मोहिमेतून ४५९ ग्राहकांची वीज कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:20 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिलाचा वेळेत भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देथकबाकीदारांविरूद्ध मोहीम : मुदतीच्या आत बिल भरण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिलाचा वेळेत भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ४५९ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे ख्ांडित करण्यात आला. तर थकबाकीदारांपैकी १ हजार २३ ग्राहकांनी कारवाईचा धसका घेत पहिल्या दिवशी ३७ लाख९५ हजार रूपयांच्या थकीत बिलाचा भरणा केला.एकीकडे वीज बिल हाती आल्याबरोबर वीज बिलाचा भरणा करणरे ग्राहक तर एकीकडे थकबाकीदार अशा दुहेरीत महावितरण आहे. विकल्या गेलेल्या विजेचा वीज बिलाच्या माध्यमातून वसुली करून परत वीज विकत घेऊन ग्राहकांना वीज पुरवठा करण्याची जवाबदारी पार पाडताना थकबाकीदारांमुळे महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे १३ कोटी ९७ लाखांच्या घरात थकबाकी पोहोचली आहे. तर वाणिज्यीक ग्राहकांकडे ४ कोटी ९७ लाख रूपये थकबाकी आहे. औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी २ लाख रूपये थकबाकी आहे.चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे १ कोटी ४१ लाख तर सरकारी कार्यालयांकडे १ कोटी ७३ लाख रूपये थकबाकी आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा ख्ांडित केलेल्या ग्राहकांकडे ४० कोटी ३८ लाख तसेच कृषी पंपधारकाकडे ६१ कोटी ९७ लाखांची थकबाकी आहे.महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. वीज ग्राहकांकडून वीजबिल विहित मुदतीत वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महावितरण चंद्रपूर परिमंडळात अनेक ग्राहकांपयोगी योजना सुरू करण्यात आल्या असून दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक विद्युत विकास कार्यक्रम, इंफ्रा-२, आरएपीडीआरपी (पुर्नरचित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम), नवीन कृषी पंपांना वीजपुरवठा देणे व नवीन ३३ केव्ही उपकेद्रांची निर्मिती आदी कामे सुरू आहेत. त्यातून ग्राहकांना शाश्वत वीज पुरवठ्याची हमी देण्यात आली आहे. ही कामे ग्राहकांना शाश्वत व योग्य दाबाचा वीजपुरवठा देण्यासाठी करण्यात येत आहेत. यामुळे सर्व थकबाकीदार ग्राहकांनी थकीत असलेले वीजबिल वेळेत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.