शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार क्विंटल गहू पडून

By admin | Updated: May 13, 2017 00:26 IST

जिल्हा पुरवठा विभागाने पैशाचा भरणा करूनही शुक्रवारी भारतीय अन्न-धान्य महामंडळाकडून (एफसीआय) गहू मिळाला नाही.

१२ ट्रक गोदामापुढे उभे : चालान भरूनही रेशनचा गहू पोहोचला नाहीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा पुरवठा विभागाने पैशाचा भरणा करूनही शुक्रवारी भारतीय अन्न-धान्य महामंडळाकडून (एफसीआय) गहू मिळाला नाही. हमालांअभावी १२ ट्रक पडोली येथील एफसीआयच्या गोदामापुढे दिवसभर उभे होते. त्यामुळे ४५ हजार क्विंटल गव्हाची उचल होऊ शकली नाही. परिणामी रेशन दुकानादारांपर्यंत गहू पोहोचला नाही. शनिवार व रविवारी सुटी आली असल्याने ही प्रक्रिया दोन दिवस लांबणीवर पडली.जिल्हा पुरवठा विभागातर्फे ४५ हजार क्विंटल गहू आणि ४५ हजार क्विंटल तांदळाचा पुरवठा जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात येतो. त्यापैकी तांदळाचा पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी करण्यात येते. ते राईल मिलवर भरडून स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना उपलब्ध केले जाते. सध्या जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने आॅनलाईन करण्यात आली आहेत. त्यांचे नियतन आणि पुरवठा आदी आॅनलाईन सुरू करण्यात आला आहे. पुरवठा विभाग भारतीय अन्न-धान्य महामंडळाकडून गव्हाची खरेदी करते. त्याकरिता पुरवठा विभागाकडून चालान भरणा केला जातो. पैसे भरल्यानंतर त्या पावत्यांच्या आधारे एफसीआयच्या गोदामातून धान्य उपलब्ध केले जाते. ही नियमित प्रक्रिया आहे. परंतु शुक्रवारी त्यात खंड पडला. पुरवठा विभागाने गव्हाची उचल करण्यासाठी सकाळीच पडोली येथील एमसीआयच्या गोदामापुढे १२ ट्रक पाठविले. दोन ट्रकमध्ये गव्हाची पोती भरण्यात आली. मात्र, उर्वरित ट्रक तसेच गोदामापुढे उभे होते. तूर खरेदीसाठी एफसीआयने जिल्ह्यात खरेदी केंद्र उघडले आहे. त्याकरिता एमसीआयच्या अधिकाऱ्यांनी हमालांना तूर खरेदी केंद्रावर पाठविले. परिणामी पुरवठा विभागाचे ट्रक रिकामेच दिवसभर उभे राहिले.गव्हाची उचल करण्यासाठी पैशाचा भरणा केल्यानंतरही ट्रकमध्ये गव्हाची पोती टाकण्यात आली नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्किन यांना दुपारी मिळाली. त्यांनी चंद्रूपरच्या एफसीआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी ट्रकमध्ये गव्हाची पोती भरण्याची मागणी केली. तेव्हा एफसीआयकडे हमाल उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.९६५ दुकानांवर आॅनलाईन प्रक्रियाजिल्ह्यात १५२४ स्वस्त धान्य दुकान आहेत. त्यांना पीओएस मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ९६५ दुकानांमध्ये पीओएस मशीनद्वारे ग्राहकांशी व्यवहार सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात मे महिन्यात २ हजार ३२० क्विंटल गहू, २ हजार ३०८ क्विंटल तांदूळ आणि २७० क्विंटल साखर लाभार्थ्यांना देण्यात आली आहे. त्याचा लाभ १६ हजार ८८६ कार्डधारकांना मिळाला आहे.