शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

ग्रामपंचायतींचे ४५ टक्के वृक्ष नष्ट

By admin | Updated: February 5, 2015 23:05 IST

ग्लोबल वार्मिंगसारख्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने वृक्ष लागवड योजना राबवली. मात्र, या योजनेचा पुरता फज्जा उडाला असून ग्रामपंचायतींनी लावलेले केवळ ५४.६६ टक्के वृक्ष

मंगेश भांडेकर - चंद्रपूरग्लोबल वार्मिंगसारख्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने वृक्ष लागवड योजना राबवली. मात्र, या योजनेचा पुरता फज्जा उडाला असून ग्रामपंचायतींनी लावलेले केवळ ५४.६६ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा अहवाल राष्ट्रीय हरित सेना पथकाने तपासणी अहवालातून दिला आहे. या अहवालातून तिनशेच्यावर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. पर्यावरणीय संतुलन कायम राखून गावाचा शाश्वत विकास हा वृक्ष लागवड योजनेचा मूळ उद्देश होता. मात्र, योजनेच्या मुळ उद्देशालाच ग्रामपंचायतींनी हरताळ फासली आहे. ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवड न करता तर काहींनी केवळ देखाव्यासाठी वृक्ष लागवड करुन निधीची उचल केली आहे. वृक्ष लागवड योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले. या उद्दिष्टाची पुर्तता करण्यासाठी रोजगार हमी योजना, १३ वा वित्त आयोग, पर्यावरण संतुलीत, ग्रामनिधीच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र, लावलेली वृक्ष जगविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचे खड्डेच दिसतात वृक्ष मात्र गायब आहेत. ही बाब निदर्शनास येताच वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. २० नोव्हेंबर २०१४ ला रोहयो आयुक्तांनी पत्र पाठवून रोजगार हमी योजनेतून मागील तीन वर्षात ग्रामपंचायतस्तरावर करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. तपासणीसाठी जिल्ह्यातील १७१ राष्ट्रीय हरित सेना पथकाची नियुक्ती करण्यात आली. या पथकांनी जिल्ह्यातील ७६१ पैकी २४९ ग्रामपंचायतीमधील ४२१ वृक्ष लागवड कामाची चौकशी केली. यात ४५.३४ टक्के वृक्ष नष्ट झाले. ७६१ ग्रामपंचायतींनी ७ लाख ९४ हजार ३९५ रोपांची लागवड केली. मात्र, प्रत्यक्षात ४ लाख ३४ हजार २१० रोपटेच जिवंत असल्याचे राष्ट्रीय हरित सेना पथकाच्या अहवालात म्हटले आहे.