शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
4
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
5
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
6
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
7
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
8
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
9
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
10
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
11
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
12
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
13
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
14
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
15
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
16
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
17
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
18
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
19
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
20
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर

४४८ गावांना मिळाली ५३ हजार ९७८ हेक्टर जमीनमालकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, गोंडपिपरी, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी व राजुरा उपविभागात ५९१ गावे जंगलाला लागून आहेत. या गावांमध्ये ५० एकरपेक्षा अधिक जमीन असल्याने वनहक्क कायद्याच्या नियम ३ अन्वये ग्रामसभेद्वारे समित्या गठित करण्यात आल्या. सर्वच गावांनी सामूहिक दावे सादर केले. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५९१ पैकी ४८५ गावांनी तहसील कार्यालयाद्वारे उपविभागीय समितीकडे दावा दाखल केला.

ठळक मुद्देवनहक्क कायद्याची फलश्रुती : केवळ २१ सामूहिक दावे प्रलंबित

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जंगलाला लागून असलेल्या जिल्ह्यातील ५५१ गावांपैकी ४४८ गावांनी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम अंतर्गत दाखल केलेले सामूहिक वनहक्क दावे जिल्हा समितीने मंजूर केले. त्यामुळे या गावांना ५३ हजार ९७८. ४० हेक्टर क्षेत्राची जमीन मालकी मिळाली आहे. जिल्हा समितीकडे आता केवळ २१ सामूहिक दावे प्रलंबित आहेत. ग्राम वनहक्क समित्यांनी ठराव घेतल्यानंतर तहसील, उपविभागीय समिती व जिल्हा समितीकडून तातडीने सकारात्मक पाऊल उचलल्याने सामूहिक वनहक्क दाव्यांचा निपटारा झाल्याची माहिती समित्यांच्या सदस्यांनी केली.जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, गोंडपिपरी, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी व राजुरा उपविभागात ५९१ गावे जंगलाला लागून आहेत. या गावांमध्ये ५० एकरपेक्षा अधिक जमीन असल्याने वनहक्क कायद्याच्या नियम ३ अन्वये ग्रामसभेद्वारे समित्या गठित करण्यात आल्या. सर्वच गावांनी सामूहिक दावे सादर केले. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५९१ पैकी ४८५ गावांनी तहसील कार्यालयाद्वारे उपविभागीय समितीकडे दावा दाखल केला. ग्राम वनहक्क समिती व ग्रामसभेच्या संयुक्त चौकशी अहवालानंतर त्रुटी आढळल्याने १०६ दावे प्रलंबित आहेत. उपविभागीय समितीकडून छानणी करून ४८५ दाव्यांपैकी ४६९ प्रकरणे जिल्हा समितीकडे पाठविण्यात आली. त्यापैकी ४४८ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर २१ प्रकरणे सद्यस्थितीत प्रलंबित आहेत. मंजूर झालेल्या ४४८ गावांना ५३ हजार ९७८.४० हेक्टर जमिनीची मालकी मिळाल्याने विकासाला चालना मिळणार आहे.असे आहेत गावाचे हक्कग्रामसभा सामूहिक वनसंसाधनाचे वन्यजीवन, वने व जैवविविधता वापरासाठी मुभा व रक्षण व वापरासंबंधीचे नियम करू शकते. या नियमांचे पालन होत नसल्यास ग्रामसभेला योग्य ती पावले उचलण्याचे अधिकार आहेत. वन विभागाला सामूहिक जमिनीवर वृक्ष लागवड करायची असेल तर, या सामूहिक वनसंसाधनांवर असलेले अधिकार समूहाचे आहेत असे म्हणून ग्रामसभा हे काम थांबवू शकतात. जंगल जर खाण किंवा इतर कामांसाठी वापरले जात असेल तर हे जंगल सामूहिक वनसंसाधन आहे. त्याचे मूळ रहिवासाचे स्थान, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचा भाग असल्याने त्यावर गावकऱ्यांचा हक्क आहे. त्याचे रक्षण करण्याचा गावकऱ्यांना अधिकार आहे, असा दावा ग्रामसभा करू शकते.परंपरागत हद्दीच्या वादाला तिलांजलीसामूहिक वनहक्क दावे सादर करताना परंपरागत हद्दीबाबतीत काही जिल्ह्यांतील अर्जदारांमध्ये वाद निर्माण झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यात वादाला तिलांजली मिळाली. वनक्षेत्रात एकापेक्षा अधिक गावांचा दावा आल्यानंतर संबंधित गावांच्या वनहक्क समितीने एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतला. त्यानंतरच सदर उपविभागीय समितीकडे सादर केली. प्राप्त अहवालाची निकषणानुसार तपासणी केल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी वनहक्क दाव्यांना मंजुरी दिली.सामुदायिक वनहक्कांमुळे गावांचा विकास होणार आहे. ग्रामसभांनी वन्यजीव, वने व जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी लक्ष द्यावे. जिल्ह्यातील व्यक्तिगत व सामूहिक वनहक्क प्रलंबित प्रकरणांचाही नियमानुसार लवकरच निपटारा केला जाणार आहे.- डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी चंद्रपूर

टॅग्स :forest departmentवनविभाग