शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

४४८ गावांना मिळाली ५३ हजार ९७८ हेक्टर जमीनमालकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, गोंडपिपरी, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी व राजुरा उपविभागात ५९१ गावे जंगलाला लागून आहेत. या गावांमध्ये ५० एकरपेक्षा अधिक जमीन असल्याने वनहक्क कायद्याच्या नियम ३ अन्वये ग्रामसभेद्वारे समित्या गठित करण्यात आल्या. सर्वच गावांनी सामूहिक दावे सादर केले. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५९१ पैकी ४८५ गावांनी तहसील कार्यालयाद्वारे उपविभागीय समितीकडे दावा दाखल केला.

ठळक मुद्देवनहक्क कायद्याची फलश्रुती : केवळ २१ सामूहिक दावे प्रलंबित

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जंगलाला लागून असलेल्या जिल्ह्यातील ५५१ गावांपैकी ४४८ गावांनी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम अंतर्गत दाखल केलेले सामूहिक वनहक्क दावे जिल्हा समितीने मंजूर केले. त्यामुळे या गावांना ५३ हजार ९७८. ४० हेक्टर क्षेत्राची जमीन मालकी मिळाली आहे. जिल्हा समितीकडे आता केवळ २१ सामूहिक दावे प्रलंबित आहेत. ग्राम वनहक्क समित्यांनी ठराव घेतल्यानंतर तहसील, उपविभागीय समिती व जिल्हा समितीकडून तातडीने सकारात्मक पाऊल उचलल्याने सामूहिक वनहक्क दाव्यांचा निपटारा झाल्याची माहिती समित्यांच्या सदस्यांनी केली.जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, गोंडपिपरी, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी व राजुरा उपविभागात ५९१ गावे जंगलाला लागून आहेत. या गावांमध्ये ५० एकरपेक्षा अधिक जमीन असल्याने वनहक्क कायद्याच्या नियम ३ अन्वये ग्रामसभेद्वारे समित्या गठित करण्यात आल्या. सर्वच गावांनी सामूहिक दावे सादर केले. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५९१ पैकी ४८५ गावांनी तहसील कार्यालयाद्वारे उपविभागीय समितीकडे दावा दाखल केला. ग्राम वनहक्क समिती व ग्रामसभेच्या संयुक्त चौकशी अहवालानंतर त्रुटी आढळल्याने १०६ दावे प्रलंबित आहेत. उपविभागीय समितीकडून छानणी करून ४८५ दाव्यांपैकी ४६९ प्रकरणे जिल्हा समितीकडे पाठविण्यात आली. त्यापैकी ४४८ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर २१ प्रकरणे सद्यस्थितीत प्रलंबित आहेत. मंजूर झालेल्या ४४८ गावांना ५३ हजार ९७८.४० हेक्टर जमिनीची मालकी मिळाल्याने विकासाला चालना मिळणार आहे.असे आहेत गावाचे हक्कग्रामसभा सामूहिक वनसंसाधनाचे वन्यजीवन, वने व जैवविविधता वापरासाठी मुभा व रक्षण व वापरासंबंधीचे नियम करू शकते. या नियमांचे पालन होत नसल्यास ग्रामसभेला योग्य ती पावले उचलण्याचे अधिकार आहेत. वन विभागाला सामूहिक जमिनीवर वृक्ष लागवड करायची असेल तर, या सामूहिक वनसंसाधनांवर असलेले अधिकार समूहाचे आहेत असे म्हणून ग्रामसभा हे काम थांबवू शकतात. जंगल जर खाण किंवा इतर कामांसाठी वापरले जात असेल तर हे जंगल सामूहिक वनसंसाधन आहे. त्याचे मूळ रहिवासाचे स्थान, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचा भाग असल्याने त्यावर गावकऱ्यांचा हक्क आहे. त्याचे रक्षण करण्याचा गावकऱ्यांना अधिकार आहे, असा दावा ग्रामसभा करू शकते.परंपरागत हद्दीच्या वादाला तिलांजलीसामूहिक वनहक्क दावे सादर करताना परंपरागत हद्दीबाबतीत काही जिल्ह्यांतील अर्जदारांमध्ये वाद निर्माण झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यात वादाला तिलांजली मिळाली. वनक्षेत्रात एकापेक्षा अधिक गावांचा दावा आल्यानंतर संबंधित गावांच्या वनहक्क समितीने एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतला. त्यानंतरच सदर उपविभागीय समितीकडे सादर केली. प्राप्त अहवालाची निकषणानुसार तपासणी केल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी वनहक्क दाव्यांना मंजुरी दिली.सामुदायिक वनहक्कांमुळे गावांचा विकास होणार आहे. ग्रामसभांनी वन्यजीव, वने व जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी लक्ष द्यावे. जिल्ह्यातील व्यक्तिगत व सामूहिक वनहक्क प्रलंबित प्रकरणांचाही नियमानुसार लवकरच निपटारा केला जाणार आहे.- डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी चंद्रपूर

टॅग्स :forest departmentवनविभाग