शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

४४४ मामा तलाव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 27, 2014 23:23 IST

धानासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात माजी मालगुजारी तलावांची संख्याही भरपूर प्रमाणात आहे. मात्र या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासन पाहिजे तसे लक्ष पुरवीत नसल्याने जिल्ह्यातील तब्बल

चंद्रपूर : धानासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात माजी मालगुजारी तलावांची संख्याही भरपूर प्रमाणात आहे. मात्र या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासन पाहिजे तसे लक्ष पुरवीत नसल्याने जिल्ह्यातील तब्बल ४४४ तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सावली तालुक्यातील सर्वाधिक १२३ मामा तलावांची स्थिती चिंताजनक आहे.यावर्षी अर्धाअधिक पावसाळा होऊनही पाहिजे त्या प्रमामात जलसाठा नाही. अनेक जलसाठे अर्धेही भरले नाही. अशावेळी भविष्यात पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे गावांतील प्रत्येक तलाव, विहिरी तसेच अन्य जलसाठ्यांतील आहे ती पाण्याची पातळी टिकविणे महत्त्वाचे आहे.जिल्ह्यात १६७८ माजी मालगुजारी तलाव आहे. या तलावाच्या भरोवशावर काही गावांमध्ये गुरांना पिण्यासाठी पाणी, सिंचन, मच्छीमारी, शिंगाडा पिक घेतल्या जाते. विशेष म्हणजे या तलावांमुळे गावातील पाण्याची पातळीही वाढते. मात्र या तलावापैकी तब्बल ४४४ तलावांची देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने ते सध्यास्थितीत चिंताजनक स्थितीत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक तलाव सिंदेवाही तालुक्यात आहे. विशेष म्हणजे सावली तालुक्यात सर्वाधिक तलाव दुर्लक्षीत आहे. या तालुक्यात २६१ माजी मालगुजारी तलाव आहे. यातील तब्बल १२३ तलाव सद्यास्थितीत सुस्थितीत नाही.त्यामुळे तताव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. (नगर प्रतिनिधी)