शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

४२० गावातील नागरिकांना खासगी वाहतुकीचाच आधार

By admin | Updated: October 30, 2015 01:06 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी, गाव तेथे एसटी’ ही योजना राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविली जात आहे.

चंद्रपूर : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी, गाव तेथे एसटी’ ही योजना राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविली जात आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल ४२० गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही एसटीची बस पोहचली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना आजही खाजगी वाहनाने किंवा पायी प्रवास करावा लागत आहे. चंद्रपूर जिल्हा जंगलव्याप्त आहे. कोरपना, जिवती, राजुरा आदी तालुक्यातील गावे पहाडीवर वसलेले आहेत. या गावातील नागरिकांना शासनाच्या सोयीसुविधा पुरवण्याचे काम प्रशासनस्तरावरुन सुरु आहे. मात्र, दुर्गम भागातील गावांमध्ये आजही प्रशासनाच्या सोयीसुविधा पोहचू शकलेल्या नाहीत. जिल्ह्यात एकूण १६७३ गावे आहेत. यात फक्त १ हजार २३३ गावांमध्ये एसटी बस सरू करण्यात आली आहे. दुर्गम भागात पहाडावर असलेल्या गावातील नागरिकांनी आपल्या गावात एसटी बससेवा सुरू व्हावी, यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, बससेवा सुरू करण्यात येत असलेल्या अडचणींमुळे अद्याप ४२० गावांमध्ये बससेवा सुरू होऊ शकलेली नाही. ज्या गावांमध्ये राज्य परिवहन मंडळाची बससेवा उपलब्ध नाही, अशा गावांमध्ये खाजगी वाहतुकीला ऊत आला आहे. वाहतुकीची सुविधा नसल्याने प्रवाशी मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत असतात. परिणामी खाजगी वाहतुकदार हे प्रवाशांना जनावरे कोंबल्यासारखे वाहनात भरून वाहतूक करीत असतात. यामुळे अनेकदा मोठे अपघातही घडले आहेत. मात्र, याची दखल घेऊन बससेवा सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना झालेल्या नाहीत. दुर्गम भागात जंगलात, पहाडावर वसलेल्या अनेक गावांमध्ये रस्त्याची व्यवस्था नाही. तर ज्या गावांमध्ये रस्त्याचे बांधकाम झाले आहे, त्या गावात जाण्याऱ्या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने रस्ते पुर्णत: उखडलेले आहेत. त्यामुळे उखडलेल्या रस्त्याने बस धावू शकत नाही. उखडलेल्या रस्त्यामुळे बसगाडीचे नुकसान होत असल्याने अनेक गावांत सुरू झालेली बससेवा बंद करण्यात आल्याचाही प्रकार अनेकदा एसटी आगाराकडून घडला आहे. याचा त्रास दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासन व परिवहन मंडळाने दुर्गम भागातील नागरिकांची प्रवासासाठी होत असलेली दमछाक थांबविण्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)बससेवेअभावी विद्यार्थ्यांची होरपळबससेवा सुरू नसल्याने अनेक गावातील विद्यार्थ्यांची होरपळ होत आहे. प्राथमिक शिक्षणाची गावातच सोय असली तरी हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शहरी भागात जावे लागते. मात्र बससेवाच नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर जाता येत नाही. परिणामी अनेक गावातील विद्यार्थी हे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षण घेणे सोडून देत असल्याचे वास्तव्य आहे. अपूर्ण रस्त्यांचा अडथळादुर्गम भागातील अनेक गावांमध्ये रस्त्याचे काम अपूर्ण आहे. गावात जाण्यास योग्य रस्ता नसल्यास उखडलेल्या रस्त्यामुळे बसगाडीचे नुकसान होते. त्यामुळे एसटी आगार ज्या गावांत योग्य रस्ते नाही, अशा गावांमध्ये बससेवा सुरू करण्यास उदासिन आहे.