शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

४२ महिला बनल्या गावाच्या कारभारी

By admin | Updated: September 28, 2015 01:17 IST

देशाच्या राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यामुळे अनेक महिला राजकारणात उतरल्या आहेत.

चिमूर तालुका : संविधानाने बनविले सावित्रीच्या लेकींना पुढारीखडसंगी : देशाच्या राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यामुळे अनेक महिला राजकारणात उतरल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकात चिमूर तालुक्यात ८० पैकी ४२ गावात सरपंचपदी महिला विराजमान झाल्या आहेत.भारतीय संविधानाने महिला-पुरुषांना समान अधिकार दिले. मात्र पुरुषाच्या भेदभाव मानसिकतेने देशातील महिलांना अनेक वर्षे चुल आणि मुलापर्यंतच सीमित राहावे लागले होते. देशात अनेक वर्षे महिलांना दुय्यम दर्जाचे स्थान दिल्या जात होते तर त्यांना शिक्षणापासूनही वंचित ठेवण्यात आले. बहिष्कृत महिलांच्या हक्कासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करुन महिलांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून दिले. महिलाच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईने अनेक हाल अपेस्टा सहन करीत महिलांनाही शिक्षणाचे दारे उघडली. त्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रात पुढे सरसावल्याचे दिसत आहे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामीण भागात विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविण्यात आले. सोबतच ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये महिला अनेक गावांचा कारभार सांभाळत आहेत. चिमूर तालुक्यात नुकत्याच ८० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकामध्ये राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षणाच्या कायद्यामुळे ४२ ग्रामपंचायतीच्या सरपंच बनल्या आहेत. येत्या १० आॅक्टोबरला शंकरपूर, १९ आॅक्टोबरला कन्हाळगाव व खैरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची धुरा महिलाच सांभाळणार आहेत. त्यामुळे ४२ गावांच्या महिलांना पाच वर्षे तरी ‘अच्छे दिन’ आले आहेत. (वार्ताहर)भिवकुंड ग्रामपंचायतीवर दोन्ही कारभारी महिलाचनऊ सदस्य संख्या असलेल्या भिवकुंड गट ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीमध्ये सरपंच पद महिलासाठी राखीव होते. त्यामुळे सरपंच म्हणून ममता गायकवाड यांची निवड करण्यात आली तर उपसरपंच म्हणून जिजाबाई झाडे यांची निवड झाली आहे. त्यामुळे गावाच्या दोन्ही कारभारनी महिला बनल्या आहेत. सरपंच, उपसरपंच महिला बनल्याने अनेक वर्षांची पुरुषांची मक्तेदानी संपुष्टात आली आहेत. तर या महिला पुरुषांच्या पुढे जाऊन कसा कारभार करतात, याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.