शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
3
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
4
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
5
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
6
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
7
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
8
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
9
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
10
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
11
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
12
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
13
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
14
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
15
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
16
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
17
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
18
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
19
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
20
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

४२ महिला बनल्या गावाच्या कारभारी

By admin | Updated: September 28, 2015 01:17 IST

देशाच्या राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यामुळे अनेक महिला राजकारणात उतरल्या आहेत.

चिमूर तालुका : संविधानाने बनविले सावित्रीच्या लेकींना पुढारीखडसंगी : देशाच्या राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यामुळे अनेक महिला राजकारणात उतरल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकात चिमूर तालुक्यात ८० पैकी ४२ गावात सरपंचपदी महिला विराजमान झाल्या आहेत.भारतीय संविधानाने महिला-पुरुषांना समान अधिकार दिले. मात्र पुरुषाच्या भेदभाव मानसिकतेने देशातील महिलांना अनेक वर्षे चुल आणि मुलापर्यंतच सीमित राहावे लागले होते. देशात अनेक वर्षे महिलांना दुय्यम दर्जाचे स्थान दिल्या जात होते तर त्यांना शिक्षणापासूनही वंचित ठेवण्यात आले. बहिष्कृत महिलांच्या हक्कासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करुन महिलांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून दिले. महिलाच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईने अनेक हाल अपेस्टा सहन करीत महिलांनाही शिक्षणाचे दारे उघडली. त्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रात पुढे सरसावल्याचे दिसत आहे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामीण भागात विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविण्यात आले. सोबतच ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये महिला अनेक गावांचा कारभार सांभाळत आहेत. चिमूर तालुक्यात नुकत्याच ८० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकामध्ये राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षणाच्या कायद्यामुळे ४२ ग्रामपंचायतीच्या सरपंच बनल्या आहेत. येत्या १० आॅक्टोबरला शंकरपूर, १९ आॅक्टोबरला कन्हाळगाव व खैरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची धुरा महिलाच सांभाळणार आहेत. त्यामुळे ४२ गावांच्या महिलांना पाच वर्षे तरी ‘अच्छे दिन’ आले आहेत. (वार्ताहर)भिवकुंड ग्रामपंचायतीवर दोन्ही कारभारी महिलाचनऊ सदस्य संख्या असलेल्या भिवकुंड गट ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीमध्ये सरपंच पद महिलासाठी राखीव होते. त्यामुळे सरपंच म्हणून ममता गायकवाड यांची निवड करण्यात आली तर उपसरपंच म्हणून जिजाबाई झाडे यांची निवड झाली आहे. त्यामुळे गावाच्या दोन्ही कारभारनी महिला बनल्या आहेत. सरपंच, उपसरपंच महिला बनल्याने अनेक वर्षांची पुरुषांची मक्तेदानी संपुष्टात आली आहेत. तर या महिला पुरुषांच्या पुढे जाऊन कसा कारभार करतात, याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.