शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

४२ महिला बनल्या गावाच्या कारभारी

By admin | Updated: September 28, 2015 01:17 IST

देशाच्या राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यामुळे अनेक महिला राजकारणात उतरल्या आहेत.

चिमूर तालुका : संविधानाने बनविले सावित्रीच्या लेकींना पुढारीखडसंगी : देशाच्या राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यामुळे अनेक महिला राजकारणात उतरल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकात चिमूर तालुक्यात ८० पैकी ४२ गावात सरपंचपदी महिला विराजमान झाल्या आहेत.भारतीय संविधानाने महिला-पुरुषांना समान अधिकार दिले. मात्र पुरुषाच्या भेदभाव मानसिकतेने देशातील महिलांना अनेक वर्षे चुल आणि मुलापर्यंतच सीमित राहावे लागले होते. देशात अनेक वर्षे महिलांना दुय्यम दर्जाचे स्थान दिल्या जात होते तर त्यांना शिक्षणापासूनही वंचित ठेवण्यात आले. बहिष्कृत महिलांच्या हक्कासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करुन महिलांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून दिले. महिलाच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईने अनेक हाल अपेस्टा सहन करीत महिलांनाही शिक्षणाचे दारे उघडली. त्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रात पुढे सरसावल्याचे दिसत आहे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामीण भागात विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविण्यात आले. सोबतच ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये महिला अनेक गावांचा कारभार सांभाळत आहेत. चिमूर तालुक्यात नुकत्याच ८० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकामध्ये राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षणाच्या कायद्यामुळे ४२ ग्रामपंचायतीच्या सरपंच बनल्या आहेत. येत्या १० आॅक्टोबरला शंकरपूर, १९ आॅक्टोबरला कन्हाळगाव व खैरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची धुरा महिलाच सांभाळणार आहेत. त्यामुळे ४२ गावांच्या महिलांना पाच वर्षे तरी ‘अच्छे दिन’ आले आहेत. (वार्ताहर)भिवकुंड ग्रामपंचायतीवर दोन्ही कारभारी महिलाचनऊ सदस्य संख्या असलेल्या भिवकुंड गट ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीमध्ये सरपंच पद महिलासाठी राखीव होते. त्यामुळे सरपंच म्हणून ममता गायकवाड यांची निवड करण्यात आली तर उपसरपंच म्हणून जिजाबाई झाडे यांची निवड झाली आहे. त्यामुळे गावाच्या दोन्ही कारभारनी महिला बनल्या आहेत. सरपंच, उपसरपंच महिला बनल्याने अनेक वर्षांची पुरुषांची मक्तेदानी संपुष्टात आली आहेत. तर या महिला पुरुषांच्या पुढे जाऊन कसा कारभार करतात, याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.