शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

एका तपात ४१६ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

By admin | Updated: August 12, 2014 23:40 IST

निसर्गाची अवकृपा, वाढती महागाई, मजुरांचा तुटवडा तसेच शासन, प्रशासनाचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. शेतकरी शेती करताना नाकीनऊ येत आहे.

चंद्रपूर : निसर्गाची अवकृपा, वाढती महागाई, मजुरांचा तुटवडा तसेच शासन, प्रशासनाचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. शेतकरी शेती करताना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे कधी बँकेचे, बचत गटाचे तर, कधी सावकारी कर्ज घेऊन दरवर्षी नव्या आशेने शेतकरी शेती करतात. मात्र त्यांच्या खात्यात नैराश्यच येत आहे. कर्जाचा डोंगर सतत वाढल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मागील १२ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ४१६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २००३ पासून जुलै २०१४ पर्यंत एकूण ४१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातील २८६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाने पात्र ठरविल्या आहे. त्यांना २ कोटी ८६ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.बेभरोवशाचा व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेती व्यवसायातून शेतकऱ्यांना अनेक अडचणींना समोर जावे लागते. त्यातच प्रशासकीय अडचणीही कमी नाही. जिल्ह्यात सिंचन क्षेत्र कमी आहे. ज्या शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय केली त्यांना वीज मिळत नसल्याची स्थितीही आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची तर, स्थिती बिकट आहे. त्यामुळे यावर्षी नाही तर, पूढील वर्षी उत्पन्न होईल, या आशेवर शेतकरी शेती करतात. मात्र काही वेळा त्यांना यातून मार्ग काढता येत नाही. त्यातच अनेकजण आपले जीवन संपवत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळण्यासाठीही अनेक अडचणी येतात. जिल्हा समितीद्वारे प्रथम आत्महत्येचे कारण शोधल्या जाते. या समितीमध्ये १४ सदस्यांचा समावेश आहे.त्यानंतर पूर्ण माहिती गोळा केल्यानंतर आर्थिक मदत दिल्या जाते. ४१६ शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये १८६ शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी पात्र तर, १२८ शेतकऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यातील २ प्रकरणांची चौकशी सुरु आहे. आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)