शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

एका तपात ४१६ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

By admin | Updated: August 12, 2014 23:40 IST

निसर्गाची अवकृपा, वाढती महागाई, मजुरांचा तुटवडा तसेच शासन, प्रशासनाचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. शेतकरी शेती करताना नाकीनऊ येत आहे.

चंद्रपूर : निसर्गाची अवकृपा, वाढती महागाई, मजुरांचा तुटवडा तसेच शासन, प्रशासनाचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. शेतकरी शेती करताना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे कधी बँकेचे, बचत गटाचे तर, कधी सावकारी कर्ज घेऊन दरवर्षी नव्या आशेने शेतकरी शेती करतात. मात्र त्यांच्या खात्यात नैराश्यच येत आहे. कर्जाचा डोंगर सतत वाढल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मागील १२ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ४१६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २००३ पासून जुलै २०१४ पर्यंत एकूण ४१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातील २८६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाने पात्र ठरविल्या आहे. त्यांना २ कोटी ८६ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.बेभरोवशाचा व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेती व्यवसायातून शेतकऱ्यांना अनेक अडचणींना समोर जावे लागते. त्यातच प्रशासकीय अडचणीही कमी नाही. जिल्ह्यात सिंचन क्षेत्र कमी आहे. ज्या शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय केली त्यांना वीज मिळत नसल्याची स्थितीही आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची तर, स्थिती बिकट आहे. त्यामुळे यावर्षी नाही तर, पूढील वर्षी उत्पन्न होईल, या आशेवर शेतकरी शेती करतात. मात्र काही वेळा त्यांना यातून मार्ग काढता येत नाही. त्यातच अनेकजण आपले जीवन संपवत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळण्यासाठीही अनेक अडचणी येतात. जिल्हा समितीद्वारे प्रथम आत्महत्येचे कारण शोधल्या जाते. या समितीमध्ये १४ सदस्यांचा समावेश आहे.त्यानंतर पूर्ण माहिती गोळा केल्यानंतर आर्थिक मदत दिल्या जाते. ४१६ शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये १८६ शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी पात्र तर, १२८ शेतकऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यातील २ प्रकरणांची चौकशी सुरु आहे. आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)