शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रदूषणामुळे चार वर्षांत ४०० वर नागरिकांचा मृत्यू

By admin | Updated: June 5, 2016 00:42 IST

उद्योगांनी व्यापलेल्या चंद्रपूर शहरासह परिसरातील नागरिकांचा अक्षरश: श्वास कोंडला जात आहे.

शासकीय रुग्णालय : खासगी रुग्णालयातील मृतांची आकडेवारी अनेकपटचंद्रपूर : उद्योगांनी व्यापलेल्या चंद्रपूर शहरासह परिसरातील नागरिकांचा अक्षरश: श्वास कोंडला जात आहे. मात्र त्यावर अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. गेल्या चार वर्षांत प्रदूषणामुळे झालेल्या आजाराने शासकीय रुग्णालयातील आकडेवारीनुसार ४०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला, तर १ लाख २२ हजार ७६२ नागरिकांनी उपचार करवून घेतले. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी माहितीच्या अधिकारात या विषयात माहिती घेतली. त्यातून ही आकडेवारी पुढे आली. ही आकडेवारी केवळ शासकीय रुग्णालयातील आहे. खासगी रुग्णालयात उपचार करवून घेणाऱ्यांची व उपचारादरम्यान, मृत्यू पावलेल्यांची आकडेवारी यापेक्षा कैकपट असल्याचे एका जाणकाराने सांगितले. चंद्रपुरात महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. यासोबतच जिल्ह्यात विविध ठिकाणी खासगी कंपन्यांचे पॉवर प्लँट आहेत. तसेच कोळशावर आधारित अनेक उद्योग कार्यरत आहेत. वीज निर्मितीसाठी लाखो टन कोळसा जाळला जातो. त्यातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनडाय आॅक्साईडमुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. दमा, हृदयविकार, त्वचारोग, कॅन्सर यासारख्या गंभीर आजाराची बाधा नागरिकांना होत आहे. जिल्ह्यात कोळसा खाणींची संख्या अधिक असल्याने कोळशाची वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होते. त्यातून सातत्याने कोळशाची धूळ वातावरणात पसरत असते. या धूळ प्रदूषणानेही नागरिक बेजार आहेत. (प्रतिनिधी)वृक्षारोपणाबाबत उदासीनताप्रदूषणावर मात करण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे. मात्र वृक्षारोपणाबाबत कायम उदासिनता दिसून येते. वृक्षारोपण केले जाते. मात्र पुढे त्याच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते, असाच नित्याचा अनुभव आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला चंद्रपूर व अवतीभोवतीच्या १,११७ हेक्टर परिसरात नियमानुसार १० फुटांवर झाडे लावायची होती. त्या झाडांची संख्या ९० लाख ते एक करोड एवढी होते. परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार केवळ ११ लाख ९१ हजार ६६० झाडे लावण्यात आली आहेत. त्यातून ८ लाख ६६ हजार ३५० झाडे जीवंत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. आकडेवारीचा अभ्यास केला असता दिलेल्या जबाबदारीपैकी केवळ ८ ते १० टक्के वृक्षारापणाचे काम केल्याचे निदर्शनास येते.