शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

प्रदूषणामुळे चार वर्षांत ४०० वर नागरिकांचा मृत्यू

By admin | Updated: June 5, 2016 00:42 IST

उद्योगांनी व्यापलेल्या चंद्रपूर शहरासह परिसरातील नागरिकांचा अक्षरश: श्वास कोंडला जात आहे.

शासकीय रुग्णालय : खासगी रुग्णालयातील मृतांची आकडेवारी अनेकपटचंद्रपूर : उद्योगांनी व्यापलेल्या चंद्रपूर शहरासह परिसरातील नागरिकांचा अक्षरश: श्वास कोंडला जात आहे. मात्र त्यावर अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. गेल्या चार वर्षांत प्रदूषणामुळे झालेल्या आजाराने शासकीय रुग्णालयातील आकडेवारीनुसार ४०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला, तर १ लाख २२ हजार ७६२ नागरिकांनी उपचार करवून घेतले. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी माहितीच्या अधिकारात या विषयात माहिती घेतली. त्यातून ही आकडेवारी पुढे आली. ही आकडेवारी केवळ शासकीय रुग्णालयातील आहे. खासगी रुग्णालयात उपचार करवून घेणाऱ्यांची व उपचारादरम्यान, मृत्यू पावलेल्यांची आकडेवारी यापेक्षा कैकपट असल्याचे एका जाणकाराने सांगितले. चंद्रपुरात महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. यासोबतच जिल्ह्यात विविध ठिकाणी खासगी कंपन्यांचे पॉवर प्लँट आहेत. तसेच कोळशावर आधारित अनेक उद्योग कार्यरत आहेत. वीज निर्मितीसाठी लाखो टन कोळसा जाळला जातो. त्यातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनडाय आॅक्साईडमुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. दमा, हृदयविकार, त्वचारोग, कॅन्सर यासारख्या गंभीर आजाराची बाधा नागरिकांना होत आहे. जिल्ह्यात कोळसा खाणींची संख्या अधिक असल्याने कोळशाची वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होते. त्यातून सातत्याने कोळशाची धूळ वातावरणात पसरत असते. या धूळ प्रदूषणानेही नागरिक बेजार आहेत. (प्रतिनिधी)वृक्षारोपणाबाबत उदासीनताप्रदूषणावर मात करण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे. मात्र वृक्षारोपणाबाबत कायम उदासिनता दिसून येते. वृक्षारोपण केले जाते. मात्र पुढे त्याच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते, असाच नित्याचा अनुभव आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला चंद्रपूर व अवतीभोवतीच्या १,११७ हेक्टर परिसरात नियमानुसार १० फुटांवर झाडे लावायची होती. त्या झाडांची संख्या ९० लाख ते एक करोड एवढी होते. परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार केवळ ११ लाख ९१ हजार ६६० झाडे लावण्यात आली आहेत. त्यातून ८ लाख ६६ हजार ३५० झाडे जीवंत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. आकडेवारीचा अभ्यास केला असता दिलेल्या जबाबदारीपैकी केवळ ८ ते १० टक्के वृक्षारापणाचे काम केल्याचे निदर्शनास येते.