शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

प्रदूषणामुळे चार वर्षांत ४०० वर नागरिकांचा मृत्यू

By admin | Updated: June 5, 2016 00:42 IST

उद्योगांनी व्यापलेल्या चंद्रपूर शहरासह परिसरातील नागरिकांचा अक्षरश: श्वास कोंडला जात आहे.

शासकीय रुग्णालय : खासगी रुग्णालयातील मृतांची आकडेवारी अनेकपटचंद्रपूर : उद्योगांनी व्यापलेल्या चंद्रपूर शहरासह परिसरातील नागरिकांचा अक्षरश: श्वास कोंडला जात आहे. मात्र त्यावर अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. गेल्या चार वर्षांत प्रदूषणामुळे झालेल्या आजाराने शासकीय रुग्णालयातील आकडेवारीनुसार ४०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला, तर १ लाख २२ हजार ७६२ नागरिकांनी उपचार करवून घेतले. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी माहितीच्या अधिकारात या विषयात माहिती घेतली. त्यातून ही आकडेवारी पुढे आली. ही आकडेवारी केवळ शासकीय रुग्णालयातील आहे. खासगी रुग्णालयात उपचार करवून घेणाऱ्यांची व उपचारादरम्यान, मृत्यू पावलेल्यांची आकडेवारी यापेक्षा कैकपट असल्याचे एका जाणकाराने सांगितले. चंद्रपुरात महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. यासोबतच जिल्ह्यात विविध ठिकाणी खासगी कंपन्यांचे पॉवर प्लँट आहेत. तसेच कोळशावर आधारित अनेक उद्योग कार्यरत आहेत. वीज निर्मितीसाठी लाखो टन कोळसा जाळला जातो. त्यातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनडाय आॅक्साईडमुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. दमा, हृदयविकार, त्वचारोग, कॅन्सर यासारख्या गंभीर आजाराची बाधा नागरिकांना होत आहे. जिल्ह्यात कोळसा खाणींची संख्या अधिक असल्याने कोळशाची वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होते. त्यातून सातत्याने कोळशाची धूळ वातावरणात पसरत असते. या धूळ प्रदूषणानेही नागरिक बेजार आहेत. (प्रतिनिधी)वृक्षारोपणाबाबत उदासीनताप्रदूषणावर मात करण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे. मात्र वृक्षारोपणाबाबत कायम उदासिनता दिसून येते. वृक्षारोपण केले जाते. मात्र पुढे त्याच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते, असाच नित्याचा अनुभव आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला चंद्रपूर व अवतीभोवतीच्या १,११७ हेक्टर परिसरात नियमानुसार १० फुटांवर झाडे लावायची होती. त्या झाडांची संख्या ९० लाख ते एक करोड एवढी होते. परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार केवळ ११ लाख ९१ हजार ६६० झाडे लावण्यात आली आहेत. त्यातून ८ लाख ६६ हजार ३५० झाडे जीवंत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. आकडेवारीचा अभ्यास केला असता दिलेल्या जबाबदारीपैकी केवळ ८ ते १० टक्के वृक्षारापणाचे काम केल्याचे निदर्शनास येते.