शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीमध्ये ४० टक्के तरुण कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यावर्षी पहिल्यांदाच अधिकाधिक तरुणांनी निवडणूक लढविली. ४० टक्के ग्रामपंचायतींवर तरुण ...

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यावर्षी पहिल्यांदाच अधिकाधिक तरुणांनी निवडणूक लढविली. ४० टक्के ग्रामपंचायतींवर तरुण उमेदवार निवडून आले. त्यामुळे या ग्रामपंचायतींना हे तरुण उमेदवार नवी दिशा देतील, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

मागील काही वर्षांमध्ये तरुणपिढी राजकारणात फारशी येत नव्हती. मात्र, यावर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बहुतांश गावांत तरुणांनीच पॅनल उभे करून निवडणूक लढविली. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनीही त्यांना साथ देत निवडून दिले. जिल्ह्यात ४० टक्के गावात तरुण कारभारी झाले आहेत. त्यामुळे ही तरुण मंडळी पुढील पाच वर्षांत गावाचा विकास करून गावाचे नाव जिल्ह्यातच नाही, तर राज्यात पुढे नेतील, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती

६०४

---

निवडून आलेले उमेदवार ४१९१

---

१८ ते ३२ वयोगटातील उमेदवार

१६००

---

कोट

गाव आणि देशाच्या विकासासाठी तरुणांनी राजकारणात येणे गरजेचे आहे. आपण पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात होतो. ग्रामस्थांनी भरभरून प्रेम दिले आणि तब्बल ३५२ मतांना निवडून दिले. आता गावाच्या विकासाकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जाईल.

- साईश सतीश वारजूकर

सदस्य, ग्रामपंचायत, शंकरपूर

----

तरुणांनी राजकारणात आल्यास गावासह देशाचा विकास शक्य आहे. त्यामुळे आपण ग्रामपंचायत निवडणूक लढविली. मतदारांनी निवडून देत आपल्यावर विश्वास टाकला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गावात अधिकाधिक विकास कामे करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

-चेतन बंडू बोबाटे

सदस्य, ग्रामपंचायत, गोवरी

---

राजकारणात तरुणपिढीने येणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास शक्य नाही. त्यामुळेच आपण निवडणूक लढविली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये गावात नागरिकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे.

-संदीप घोटेकर

चंदनवाही,राजुरा

---

उमेदवारांचे व्हिजन

मागील काही वर्षांमध्ये राजकारणाकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे अधिकाधिक सुशिक्षित तरुणांनी राजकारणात येऊन देशाचा विकास करणे गरजेचे आहे. गावाचा विकास झाल्यास देशाचा विकास शक्य आहे. त्यामुळे गावात सर्व सुविधा पुरविणे अत्यावश्यक आहे.

----------------

चिमूर तालुक्यात सर्वाधिक तरुण उमेदवार

जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यामध्ये ४० टक्के तरुण उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत प्रथमच सर्वाधिक तरुण चेहरे निवडून आले आहेत. यामध्ये चिमूर तालुक्यात तरुण आणि सुशिक्षित उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.