शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीमध्ये ४० टक्के तरुण कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यावर्षी पहिल्यांदाच अधिकाधिक तरुणांनी निवडणूक लढविली. ४० टक्के ग्रामपंचायतींवर तरुण ...

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यावर्षी पहिल्यांदाच अधिकाधिक तरुणांनी निवडणूक लढविली. ४० टक्के ग्रामपंचायतींवर तरुण उमेदवार निवडून आले. त्यामुळे या ग्रामपंचायतींना हे तरुण उमेदवार नवी दिशा देतील, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

मागील काही वर्षांमध्ये तरुणपिढी राजकारणात फारशी येत नव्हती. मात्र, यावर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बहुतांश गावांत तरुणांनीच पॅनल उभे करून निवडणूक लढविली. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनीही त्यांना साथ देत निवडून दिले. जिल्ह्यात ४० टक्के गावात तरुण कारभारी झाले आहेत. त्यामुळे ही तरुण मंडळी पुढील पाच वर्षांत गावाचा विकास करून गावाचे नाव जिल्ह्यातच नाही, तर राज्यात पुढे नेतील, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती

६०४

---

निवडून आलेले उमेदवार ४१९१

---

१८ ते ३२ वयोगटातील उमेदवार

१६००

---

कोट

गाव आणि देशाच्या विकासासाठी तरुणांनी राजकारणात येणे गरजेचे आहे. आपण पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात होतो. ग्रामस्थांनी भरभरून प्रेम दिले आणि तब्बल ३५२ मतांना निवडून दिले. आता गावाच्या विकासाकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जाईल.

- साईश सतीश वारजूकर

सदस्य, ग्रामपंचायत, शंकरपूर

----

तरुणांनी राजकारणात आल्यास गावासह देशाचा विकास शक्य आहे. त्यामुळे आपण ग्रामपंचायत निवडणूक लढविली. मतदारांनी निवडून देत आपल्यावर विश्वास टाकला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गावात अधिकाधिक विकास कामे करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

-चेतन बंडू बोबाटे

सदस्य, ग्रामपंचायत, गोवरी

---

राजकारणात तरुणपिढीने येणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास शक्य नाही. त्यामुळेच आपण निवडणूक लढविली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये गावात नागरिकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे.

-संदीप घोटेकर

चंदनवाही,राजुरा

---

उमेदवारांचे व्हिजन

मागील काही वर्षांमध्ये राजकारणाकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे अधिकाधिक सुशिक्षित तरुणांनी राजकारणात येऊन देशाचा विकास करणे गरजेचे आहे. गावाचा विकास झाल्यास देशाचा विकास शक्य आहे. त्यामुळे गावात सर्व सुविधा पुरविणे अत्यावश्यक आहे.

----------------

चिमूर तालुक्यात सर्वाधिक तरुण उमेदवार

जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यामध्ये ४० टक्के तरुण उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत प्रथमच सर्वाधिक तरुण चेहरे निवडून आले आहेत. यामध्ये चिमूर तालुक्यात तरुण आणि सुशिक्षित उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.