शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

३७० कोल्हापुरी बंधारे नादुरूस्त

By admin | Updated: February 28, 2015 01:20 IST

जिल्हा परिषद सिंचाई विभागामार्फत १०० हेक्टर पर्यंत विविध सिंचन योजना कार्यान्वीत आहेत. मात्र, या सिंचन प्रकल्पांची योग्य देखभाल होत नसल्याने हे प्रकल्प ...

चंद्रपूर : जिल्हा परिषद सिंचाई विभागामार्फत १०० हेक्टर पर्यंत विविध सिंचन योजना कार्यान्वीत आहेत. मात्र, या सिंचन प्रकल्पांची योग्य देखभाल होत नसल्याने हे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी कुचकामी ठरत आहेत. जिल्ह्यातील ६३९ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी तब्बल ३७० बंधारे हे फुटलेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांचा शेतकऱ्यांना कोणताच लाभ होत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्हा परिषद सिंचाई विभागामार्फत ८५ लघु पाटबंधारे तलाव, १६७८ माजी मालगुजारी तलाव, ५ पाझर तलाव, २८ गाव तलाव व ६३९ कोल्हापुरी बंधारे आहेत. तलाव व बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली असली तरी, अल्पवधीत हे बंधारे फुटले आहेत. सिंचन वाढीसाठी ८ लघु पाटबंधारे तलाव, ४३९ माजी मालगुजारी तलाव व ३७० कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती आवश्यक असल्याचे सिंचाई सिंचाई विभागाने म्हटले आहे. दुरूस्तीस पात्र ४३९ माजी मालगुजारी तलावांपैकी विदर्भ सघन सिंचन विकास कामातंर्गत ३१५ तलावाच्या दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात आले आहेत, असे कार्यकारी अभियंता लघु सिंचाई विभाग जिल्हा परिषद यांनी म्हटले आहे. तसेच २२ कामे जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत मंजूर तर तर २९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरीत ३३ कामे सेस निधीतून सन २०१५-१६ मध्ये व ४० कामे २०१६-१७ मध्ये प्रस्तावित करण्यात येतील, असेही कार्यकारी अभियंता यांनी म्हटले आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्रामपंचायत स्तरावर ४८७ तलावातील गाळ काढण्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. व २०१४-१५ च्या नियोजनापैकी सेल्फवर असलेली दुरूस्तीची ७४ कामे घेण्यात आल्याचेही म्हटले आहे. मात्र, अनेक तलावात पाणी साचून राहते. परिणामी गाळ उपसा करण्यास अडचणी येतात. अशा परिस्थतीत गाळ उपसा करण्याचे कामे होणार कशी, प्रश्न नागरिकांनी केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)