शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

३७० कोल्हापुरी बंधारे नादुरूस्त

By admin | Updated: February 28, 2015 01:20 IST

जिल्हा परिषद सिंचाई विभागामार्फत १०० हेक्टर पर्यंत विविध सिंचन योजना कार्यान्वीत आहेत. मात्र, या सिंचन प्रकल्पांची योग्य देखभाल होत नसल्याने हे प्रकल्प ...

चंद्रपूर : जिल्हा परिषद सिंचाई विभागामार्फत १०० हेक्टर पर्यंत विविध सिंचन योजना कार्यान्वीत आहेत. मात्र, या सिंचन प्रकल्पांची योग्य देखभाल होत नसल्याने हे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी कुचकामी ठरत आहेत. जिल्ह्यातील ६३९ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी तब्बल ३७० बंधारे हे फुटलेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांचा शेतकऱ्यांना कोणताच लाभ होत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्हा परिषद सिंचाई विभागामार्फत ८५ लघु पाटबंधारे तलाव, १६७८ माजी मालगुजारी तलाव, ५ पाझर तलाव, २८ गाव तलाव व ६३९ कोल्हापुरी बंधारे आहेत. तलाव व बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली असली तरी, अल्पवधीत हे बंधारे फुटले आहेत. सिंचन वाढीसाठी ८ लघु पाटबंधारे तलाव, ४३९ माजी मालगुजारी तलाव व ३७० कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती आवश्यक असल्याचे सिंचाई सिंचाई विभागाने म्हटले आहे. दुरूस्तीस पात्र ४३९ माजी मालगुजारी तलावांपैकी विदर्भ सघन सिंचन विकास कामातंर्गत ३१५ तलावाच्या दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात आले आहेत, असे कार्यकारी अभियंता लघु सिंचाई विभाग जिल्हा परिषद यांनी म्हटले आहे. तसेच २२ कामे जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत मंजूर तर तर २९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरीत ३३ कामे सेस निधीतून सन २०१५-१६ मध्ये व ४० कामे २०१६-१७ मध्ये प्रस्तावित करण्यात येतील, असेही कार्यकारी अभियंता यांनी म्हटले आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्रामपंचायत स्तरावर ४८७ तलावातील गाळ काढण्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. व २०१४-१५ च्या नियोजनापैकी सेल्फवर असलेली दुरूस्तीची ७४ कामे घेण्यात आल्याचेही म्हटले आहे. मात्र, अनेक तलावात पाणी साचून राहते. परिणामी गाळ उपसा करण्यास अडचणी येतात. अशा परिस्थतीत गाळ उपसा करण्याचे कामे होणार कशी, प्रश्न नागरिकांनी केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)