शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

खेड्यांतील ३६० हातपंप ऐन उन्हाळ्यात बंद

By admin | Updated: April 21, 2016 01:13 IST

आजच्या स्थितीत जिल्ह्यातील ३६० हातपंप बंद आहेत. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

खरेदी प्रक्रिया रेंगाळली : उन्हाळा संपल्यावर येणार वाहने? मंगेश भांडेकर चंद्रपूरआजच्या स्थितीत जिल्ह्यातील ३६० हातपंप बंद आहेत. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दीड महिन्यापुर्वी जिल्हा परिषदेच्या सभेत हातपंप दुरूस्तीचे सहा वाहने खरेदी करण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र अर्धा उन्हाळा संपत असतानाही वाहन खरेदी करण्यात आलेले नाही. वाहन खरेदीची प्रक्रिया सध्या रेंगाळली असून उन्हाळा संपल्यानंतरच वाहने खरेदी होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे व सध्या तापत असलेल्या तीव्र उन्हामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक विहिरींची पाणी पातळी खोल गेली. त्यामुळे हातपंपाचे पाणी काही प्रमाणात पाणी टंचाई दूर करीत आहेत. मात्र जिल्ह्यातील ९ हजार ६७१ हातपंपापैकी सद्यस्थितीत ३६० हातपंप बंद पडले आहेत. यात २१४ हातपंप तात्पुरते तर १४६ हातपंप पाण्याची पातळी खोल गेल्याने बंद पडले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या हातपंप दुरूस्ती व देखभाल विभागाकडे हातपंप दुरूस्तीचे सहा वाहने होती. मात्र ती वाहने निर्लेखीत झाल्याने नव्या वाहनांची गरज निर्माण झाली. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत या वाहनांची खरेदी करणे आवश्यक होते. मात्र खरेदी करण्यासाठी तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. याबाबत जिल्हा परिषदेच्या सभेत ठरावही घेण्यात आला. त्यामुळे ३१ मार्चपुर्वी या वाहनांची खरेदी करणे आवश्यक होते. मात्र खरेदी प्रक्रिया रेंगाळल्याने या मुदतीतही वाहनांची खरेदी झाली नाही. वाहन खरेदीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांच्याकडून अभिप्राय मागविण्यात आला. मात्र ही सर्व प्रक्रिया करण्यात फार विलंब करण्यात आल्याने त्यांच्याकडून अभिप्राय येण्यास उशीर झाला आणि आता ही प्रक्रियाच रखडलेली आहे. सध्या एप्रिल महिना संपण्यावर असून मे महिन्यात पाणी टंचाईचे चित्र आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे वेळेत वाहने खरेदी होणे आवश्यक आहे. मात्र जिल्हा परिषदेत वाहन खरेदीसाठी सुरू असलेल्या सध्याच्या प्रक्रियेवरून उन्हाळा संपल्यानंतरच वाहने खरेदी होण्याची चिन्ह दिसून येत आहेत.