शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यांतील ३६० हातपंप ऐन उन्हाळ्यात बंद

By admin | Updated: April 21, 2016 01:13 IST

आजच्या स्थितीत जिल्ह्यातील ३६० हातपंप बंद आहेत. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

खरेदी प्रक्रिया रेंगाळली : उन्हाळा संपल्यावर येणार वाहने? मंगेश भांडेकर चंद्रपूरआजच्या स्थितीत जिल्ह्यातील ३६० हातपंप बंद आहेत. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दीड महिन्यापुर्वी जिल्हा परिषदेच्या सभेत हातपंप दुरूस्तीचे सहा वाहने खरेदी करण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र अर्धा उन्हाळा संपत असतानाही वाहन खरेदी करण्यात आलेले नाही. वाहन खरेदीची प्रक्रिया सध्या रेंगाळली असून उन्हाळा संपल्यानंतरच वाहने खरेदी होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे व सध्या तापत असलेल्या तीव्र उन्हामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक विहिरींची पाणी पातळी खोल गेली. त्यामुळे हातपंपाचे पाणी काही प्रमाणात पाणी टंचाई दूर करीत आहेत. मात्र जिल्ह्यातील ९ हजार ६७१ हातपंपापैकी सद्यस्थितीत ३६० हातपंप बंद पडले आहेत. यात २१४ हातपंप तात्पुरते तर १४६ हातपंप पाण्याची पातळी खोल गेल्याने बंद पडले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या हातपंप दुरूस्ती व देखभाल विभागाकडे हातपंप दुरूस्तीचे सहा वाहने होती. मात्र ती वाहने निर्लेखीत झाल्याने नव्या वाहनांची गरज निर्माण झाली. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत या वाहनांची खरेदी करणे आवश्यक होते. मात्र खरेदी करण्यासाठी तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. याबाबत जिल्हा परिषदेच्या सभेत ठरावही घेण्यात आला. त्यामुळे ३१ मार्चपुर्वी या वाहनांची खरेदी करणे आवश्यक होते. मात्र खरेदी प्रक्रिया रेंगाळल्याने या मुदतीतही वाहनांची खरेदी झाली नाही. वाहन खरेदीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांच्याकडून अभिप्राय मागविण्यात आला. मात्र ही सर्व प्रक्रिया करण्यात फार विलंब करण्यात आल्याने त्यांच्याकडून अभिप्राय येण्यास उशीर झाला आणि आता ही प्रक्रियाच रखडलेली आहे. सध्या एप्रिल महिना संपण्यावर असून मे महिन्यात पाणी टंचाईचे चित्र आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे वेळेत वाहने खरेदी होणे आवश्यक आहे. मात्र जिल्हा परिषदेत वाहन खरेदीसाठी सुरू असलेल्या सध्याच्या प्रक्रियेवरून उन्हाळा संपल्यानंतरच वाहने खरेदी होण्याची चिन्ह दिसून येत आहेत.