शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

३६ पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:40 IST

जिल्ह्यातील ३६ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके भरणे व देखभाल दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधीच नाही.

ठळक मुद्देजलसंधारणाची बैठक : अधिकारी गैरहजर, पदाधिकाºयांचा वचक नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ३६ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके भरणे व देखभाल दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधीच नाही. त्यामुळे या योजना पुढील महिन्यात बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामत: नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असून जिल्हा परिषद पदाधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर यांनी केला आहे.जलसंधारण विभागासारख्या महत्त्वपूर्ण बैठकीला ७० टक्के अधिकाºयांची अनुपस्थिती दिसून आली. त्यामुळे अध्यक्षांचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप डॉ. वारजूकर यांनी केला आहे. या बैठकीला लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व अन्य चार अधिकारी उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी येथील महावितरणचे अभियंता, जिल्हा कृषी अधीक्षक, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक, उपअभियंता यांत्रिकी, बांधकाम उपविभागाचे उपअभियंता यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी गैरहजर होते.जलसंधारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक असतानाही या बैठकीला ७० टक्के अधिकारी अनुपस्थित होते. नियोजनाचा अभाव व प्रशासनावर अध्यक्षाची पकड नसल्याने अधिकारी गैरहजर राहत राहतात. यामुळे विकास कामांना खिळ बसत असल्याचा आरोप डॉ. वारजूकर यांनी केला आहे.पाणी टंचाईची शक्यतायावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे नदी, नाले आताच कोरडी पडली आहेत. अनेक गावातील पाणीपुरवठा आताच प्रभावित झाला असून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईची झळ नागरिकांना सोसावे लागण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने आताच नियोजन करणे गरजेचे आहे.