शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

३६ पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:40 IST

जिल्ह्यातील ३६ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके भरणे व देखभाल दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधीच नाही.

ठळक मुद्देजलसंधारणाची बैठक : अधिकारी गैरहजर, पदाधिकाºयांचा वचक नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ३६ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके भरणे व देखभाल दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधीच नाही. त्यामुळे या योजना पुढील महिन्यात बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामत: नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असून जिल्हा परिषद पदाधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर यांनी केला आहे.जलसंधारण विभागासारख्या महत्त्वपूर्ण बैठकीला ७० टक्के अधिकाºयांची अनुपस्थिती दिसून आली. त्यामुळे अध्यक्षांचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप डॉ. वारजूकर यांनी केला आहे. या बैठकीला लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व अन्य चार अधिकारी उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी येथील महावितरणचे अभियंता, जिल्हा कृषी अधीक्षक, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक, उपअभियंता यांत्रिकी, बांधकाम उपविभागाचे उपअभियंता यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी गैरहजर होते.जलसंधारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक असतानाही या बैठकीला ७० टक्के अधिकारी अनुपस्थित होते. नियोजनाचा अभाव व प्रशासनावर अध्यक्षाची पकड नसल्याने अधिकारी गैरहजर राहत राहतात. यामुळे विकास कामांना खिळ बसत असल्याचा आरोप डॉ. वारजूकर यांनी केला आहे.पाणी टंचाईची शक्यतायावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे नदी, नाले आताच कोरडी पडली आहेत. अनेक गावातील पाणीपुरवठा आताच प्रभावित झाला असून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईची झळ नागरिकांना सोसावे लागण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने आताच नियोजन करणे गरजेचे आहे.