शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जखमी विद्यार्थ्याचा उपचाराविना ३६ तास प्रवास

By admin | Updated: November 2, 2015 00:54 IST

जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा) येथून जवाहर नवोदय विद्यालय बुंदी (राजस्थान) ..

पालकांत संताप : बुंदीतील जवाहर नवोदय विद्यालयाचा प्रतापतळोधी (बा) : जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा) येथून जवाहर नवोदय विद्यालय बुंदी (राजस्थान) येथे स्थानांतरित केलेला वर्ग ९ चा विद्यार्थी झाडावरून पडल्याने जखमी झाला. याबाबत विद्यालयाने पालकांना तर कळविले नाहीच; त्या विद्यार्थ्यावर उपचारही केला नाही. त्याला तशाच जखमी अवस्थेत तळोधीकडे रवाना केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अमन रवींद्र ढोबळे मु. मांगली ता. भद्रावती जि. चंद्रपूर असे या जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. अमन झाडावरून पडून त्याचा उजवा पाय व डाव्या हाताचा खांदा फ्रॅक्चर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राजस्थान प्रांतातील बुंदी येथे चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बा) येथील वर्ग ९ मध्ये शिकणाऱ्या मुलांचे प्राचार्यानी परस्पर स्थानांतर केले. सदर विद्यार्थी जुलै महिन्यात राजस्थानला गेला. परंतु त्याच्याविषयी पालकांना कोणतीच माहिती प्राचार्यांनी कळविली नाही. अशातच ३० आॅक्टोबरला अमन रविंद्र ढोबळे हा आवळ्याच्या झाडावरून पडून त्याच्या उजव्या मांडीचे हाड तुटले. तसेच डाव्या खांद्यालाही जबर दुखापत झाली. परंतु प्रशासनाने पालकाला याबाबत कळविण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्याच्यावर उपचारही केला नाही. अमनला रेल्वेमध्ये बसवून तळोधीकडे रवाना केले. त्यानंतर पालकांना भ्रमणध्वनीवरून आपला मुलगा गंभीर जखमी असून आपण खासगी वाहन करून नागपूरला या, असा निरोप दिला. हा सर्व प्रकार घडूनही तळोधी येथील नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. केवळ मुक्याबहिऱ्याची भूमिका घेऊन आपणाला यातले काहीच माहीत नाही. याबाबत बुंदीच्या प्राचार्यानी काही कळविले नाही, असे सांगून हात वर केले. विशेष म्हणजे, तळोधी विद्यालयाचाच विद्यार्थी जखमी अवस्थेत विद्यालयातील रस्त्यावर आणून टाकल्यानंतरही त्याला गाडीतून उतरविण्याकरिता विद्यालयाचे कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे बुंदीपासून तळोधी (बा) पर्यंत त्याला उचलणे, गाडीत ठेवणे, खाली उतरविणे, त्याची देखरेख करणे ही सर्व कामे त्याच्यासोबत असणाऱ्या १४-१५ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांनीच केली. नागपूरवरून अशा प्रकारचा गंभीर विद्यार्थी खासगी बसने तळोधीला आणला. परंतु सदर बसमध्ये गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. त्याला वेगळे रुग्णवाहिकेत पाठविण्यात आले नाही. विशेष म्हणजे, या बसचालकाने मोहाळी (नागभीड) जवळ एकदम ब्रेक दाबल्याने बसमधील काही प्रवाशीसुद्धा जखमी झाले आहे. यात जखमी विद्यार्थ्याला किती त्रास झाला असेल, याची जाणीव येते. सदर बसमध्ये जखमी विद्यार्थ्यासह ३२ विद्यार्थी व जवळपास तेवढेच प्रवासी बसले होते. जवाहर नवोदय विद्यालय, बुंदीच्या प्राचार्यांनी सदर विद्यार्थ्याला आवळे तोडण्याकरिता झाडावर चढवून त्याच्याकडून आवळे तोडून घेतल्याचे विद्यार्थ्याकडून ऐकायला मिळाले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे राजस्थानला स्थलांतर करताना प्राचार्यांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही. व स्वत:च बळजबरीने विशिष्ट विद्यार्थ्याचे स्थलांतर केले. अपंग विद्यार्थ्यावरसुद्धा दया दाखविली नाही.अशा या असंवेदनशिल व माणूसकी हरविलेल्या प्राचार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात पालकांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला आहे. तसेच केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी व मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे पालकांनी लोकमतला सांगितले. ३६ तास जखमी अवस्थेत वेदनेने विव्हळणाऱ्या अमनला न्याय मिळणार का, याकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. (वार्ताहर)