शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

३५५ कोरोनामुक्त तर १४८ नवे रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८३ हजार ५१ वर पोहोचली. सुरूवातीपासूनच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७९ हजार ४७१ झाली आहे. ...

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८३ हजार ५१ वर पोहोचली. सुरूवातीपासूनच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७९ हजार ४७१ झाली आहे. सध्या २ हजार २१५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ४ लाख ७६ हजार २४६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ९० हजार ५४४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज एकूण २,६१५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४८ पॉझिटिव्ह तर २ हजार ४६७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १,४६५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १,३५७, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३८, यवतमाळ ५०, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरूच आहे. त्यामुळे मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

चंद्रपुरात आढळले फक्त १८ रूग्ण

बाधित आलेल्या १४८ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात १८, चंद्रपूर तालुका १७, बल्लारपूर ३३, भद्रावती १३, ब्रह्मपुरी २, नागभीड ५, सिंदेवाही २, मूल ९, सावली १, पोंभूर्णा ४, गोंडपिपरी २, राजुरा १६, चिमूर २, वरोरा ७, कोरपना १३, जिवती २ व इतर ठिकाणच्या २ रूग्णांचा समावेश आहे.

असे आहेत मृत

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील सिद्धार्थनगर येथील ४९ वर्षीय पुरूष, पद्मापूर येथील ५३ वर्षीय महिला, नरेंद्र नगर वार्ड येथील ६० वर्षीय पुरूष, बल्लारपूर तालुक्यातील ६७ वर्षीय पुरूष, भद्रावती तालुक्यातील किल्ला वार्ड येथील ५८ वर्षीय पुरूष, वरोरा तालुक्यातील २७ वर्षीय पुरूष, ५४ वर्षीय पुरूष, मूल तालुक्यातील ५३ वर्षीय महिला, नागभीड तालुक्यातील किशोर नगर येथील ४५ वर्षीय पुरूष, गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील ७५ वर्षीय पुरूष तर गोंदिया तालुक्यातील अर्जुनी मोरगाव येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.