शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

उमेद समूहाकडून ३.२५ लाख ‘मास्क’ उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

मार्च महिन्यात कोविड १९ चा प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणत असताना मास्कचा तुडवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कापडी मास्क तयार करण्याबाबत विचार समोर ठेवला होता. त्यामुळे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने कापडी मास्क निर्मितीचे नियोजन केले.

ठळक मुद्देमहिला समूहांची कामगिरी : दोन महिन्यात ५४ लाखांची आर्थिक उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उमेद महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानतील स्वयंसहायता समूहाने सुमारे ३.२५ लाख कापडी मास्क उत्पादन करून ५४ लाखांची आर्थिक उलाढाल केली आहे. टाळेबंदीच्या काळात केवळ मास्क विक्रीतून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करणारा एकमेव स्वयंसहायता समूह आहे.मार्च महिन्यात कोविड १९ चा प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणत असताना मास्कचा तुडवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कापडी मास्क तयार करण्याबाबत विचार समोर ठेवला होता. त्यामुळे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने कापडी मास्क निर्मितीचे नियोजन केले. मास्क तयार करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने तज्ज्ञ मंडळीकडून कापडाचा दर्जा आणि रचना याविषयी माहिती घेऊन मास्कचे उत्पादन करण्यात आले. विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रतिबंधक उपाय योजना असताना क्षेत्रकार्य करीत असल्याने विविध विभागांनी उमेद अभियानाच्या स्वयंसहायता समूहांकडे मागणी केली. आजमितीस मास्क उत्पादनातून ५४ लाखांची उलाढाल झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्वयंसहायता समूहाच्या या कार्याला प्रोत्साहन दिले. दर्जाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. या सर्व नियोजनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा अभियान सहसंचालक शंकर किरवे, जिल्हा व्यवस्थापक गजानन ताजने तसेच तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी मोलाची भूमिका बजावली.८०० महिलांना रोजगारमागणीनुसार दुहेरी आणि तिहेरी कापड असलेले मास्क तयार करण्याचे काम सुरू झाले. मार्च ते एप्रिल या महिन्यात मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने जिल्हाभरातील सुमारे २५० हून स्वयंसहायता समूहांनी दिवसरात्र एक करून मास्कची गरज पूर्ण केली. या माध्यमातून सुमारे ८०० हून अधिक महिलांना रोजगार मिळाला. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील समूहांनी यात हिरिरीने सहभाग नोंदवून मास्क तयार केले.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगर परिषद, आरोग्य विभाग या शासकीय कार्यालयासोबतच स्थानिक स्तरावर ग्रामपंचायतीने नोंदवलेल्या मागणीनुसार समूहांनी मास्क पुरविले. त्याचबरोबर चंद्रपूरनजीक असलेल्या खासगी विविध उद्योग कंपन्या, औषध दुकाने तसेच कापड विक्रेत्यांनीसुद्धा महिलांकडून कापडी मास्क खरेदी केली.-राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या