शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

उमेद समूहाकडून ३.२५ लाख ‘मास्क’ उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

मार्च महिन्यात कोविड १९ चा प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणत असताना मास्कचा तुडवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कापडी मास्क तयार करण्याबाबत विचार समोर ठेवला होता. त्यामुळे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने कापडी मास्क निर्मितीचे नियोजन केले.

ठळक मुद्देमहिला समूहांची कामगिरी : दोन महिन्यात ५४ लाखांची आर्थिक उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उमेद महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानतील स्वयंसहायता समूहाने सुमारे ३.२५ लाख कापडी मास्क उत्पादन करून ५४ लाखांची आर्थिक उलाढाल केली आहे. टाळेबंदीच्या काळात केवळ मास्क विक्रीतून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करणारा एकमेव स्वयंसहायता समूह आहे.मार्च महिन्यात कोविड १९ चा प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणत असताना मास्कचा तुडवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कापडी मास्क तयार करण्याबाबत विचार समोर ठेवला होता. त्यामुळे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने कापडी मास्क निर्मितीचे नियोजन केले. मास्क तयार करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने तज्ज्ञ मंडळीकडून कापडाचा दर्जा आणि रचना याविषयी माहिती घेऊन मास्कचे उत्पादन करण्यात आले. विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रतिबंधक उपाय योजना असताना क्षेत्रकार्य करीत असल्याने विविध विभागांनी उमेद अभियानाच्या स्वयंसहायता समूहांकडे मागणी केली. आजमितीस मास्क उत्पादनातून ५४ लाखांची उलाढाल झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्वयंसहायता समूहाच्या या कार्याला प्रोत्साहन दिले. दर्जाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. या सर्व नियोजनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा अभियान सहसंचालक शंकर किरवे, जिल्हा व्यवस्थापक गजानन ताजने तसेच तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी मोलाची भूमिका बजावली.८०० महिलांना रोजगारमागणीनुसार दुहेरी आणि तिहेरी कापड असलेले मास्क तयार करण्याचे काम सुरू झाले. मार्च ते एप्रिल या महिन्यात मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने जिल्हाभरातील सुमारे २५० हून स्वयंसहायता समूहांनी दिवसरात्र एक करून मास्कची गरज पूर्ण केली. या माध्यमातून सुमारे ८०० हून अधिक महिलांना रोजगार मिळाला. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील समूहांनी यात हिरिरीने सहभाग नोंदवून मास्क तयार केले.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगर परिषद, आरोग्य विभाग या शासकीय कार्यालयासोबतच स्थानिक स्तरावर ग्रामपंचायतीने नोंदवलेल्या मागणीनुसार समूहांनी मास्क पुरविले. त्याचबरोबर चंद्रपूरनजीक असलेल्या खासगी विविध उद्योग कंपन्या, औषध दुकाने तसेच कापड विक्रेत्यांनीसुद्धा महिलांकडून कापडी मास्क खरेदी केली.-राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या