शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

३२३ सिंचन विहिरी खोदल्या; पण वीजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:57 IST

राजुरा तालुक्यातील ३२३ शेतकऱ्यांनी सिंचन विहीर धडक कार्यक्रमांतर्गत शेतात विहीर खोदून बांधकाम पूर्ण केले. त्यात भरपूर पाणीसाठा आहे. विद्युत मंडळाकडे सन २०१६ पासून वीज पुरवठ्यासाठी डिपॉझिट रकमेचा नियमानुसार भरणा केला आहे. परंतु अद्यापही वीज पुरवठा न दिल्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. निसर्गाच्या पावसावर शेतपिक घेतले जात आहे. त्यामुळे विद्युत मंडळाच्या निष्क्रियतेमुळे शासनाच्या सिंचन विहीर धडक योजनेचा बट्याबोळ झाला आहे.

ठळक मुद्देसिंचनापासून वंचित : क्षमता नसताना डिपॉझिट रक्कम घेणे नियमबाह्य

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा तालुक्यातील ३२३ शेतकऱ्यांनी सिंचन विहीर धडक कार्यक्रमांतर्गत शेतात विहीर खोदून बांधकाम पूर्ण केले. त्यात भरपूर पाणीसाठा आहे. विद्युत मंडळाकडे सन २०१६ पासून वीज पुरवठ्यासाठी डिपॉझिट रकमेचा नियमानुसार भरणा केला आहे. परंतु अद्यापही वीज पुरवठा न दिल्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. निसर्गाच्या पावसावर शेतपिक घेतले जात आहे. त्यामुळे विद्युत मंडळाच्या निष्क्रियतेमुळे शासनाच्या सिंचन विहीर धडक योजनेचा बट्याबोळ झाला आहे.राजुरा तालुक्यात सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे या परिसरातील शेतकरी निसर्गाच्या पावसावर अवलूंबन असतात. कधी अतिवृष्टी तर कधी अपुºया पावसामुळे त्रस्त होते. त्यामुळे नापिकीचा सामना करावा लागत होता.शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था व उपाय म्हणून शासनाने सिंचन विहीर धडक कार्यक्रम राबवून तालुक्यातील ३२३ शेतकºयांना विहिरीचा लाभ दिला. शेतकºयांनी वीज पुरवठ्यासाठी नियमानुसार सन २०१६ पासून डिपाझीट रकमेचा भरणा केला. परंतु अद्याप वीज पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकºयांचे हरित क्रांतीचे स्वप्नभंग झाले आहे.शासनाची सिंचन विहीर धडक कार्यक्रम व विद्युत मंडळ हे दोन्ही शासनाचे भंग आहे. शासन सिंचनासाठी विहीर बांधून दिल्या आहे. परंतु विद्युत मंडळ वीज पुरवठा देण्यास सक्षम नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनावर झाला आहे.सुमारे तीन वर्षांपासून शेतकरी विद्युत कार्यालयात चकरा मारत आहे व आजही वीज पुरवठा केव्हा होणार, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही, ही शोकांतिका आहे. ही बाब शेतकºयांना खटकणारी असून वीज पुरवठा देण्यास असमर्थ असताना डिपॉझिट रक्कम का घेण्यात आली, याचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित झाले असून त्यांना अतिशय त्रास होत आहे.याला महाराष्टÑ राज्य विद्युत महामंडळ जबाबदार असून शेतकऱ्यांना त्वरित वीज पुरवठा देण्याची व्यवस्था करण्याची मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे. असे न झाल्यास याविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.तीन वर्षांपासून ताटकळतनियमानुसार विद्युत मंडळाने डिपॉझिट रक्कम स्वीकारल्यानंतर एका महिन्याच्या आत वीज पुरवठा देणे त्यांचे कर्तव्य आहे. विद्युत मंडळाकडे विद्युत पुरवठा साहित्य व क्षमता उपलब्ध असल्यावरच डिपॉझिट रक्कम स्वीकारली जाते. परंतु येथे मात्र तीन वर्षांपासून ताटकळत ठेवले आहे. त्याचा परिणाम विहिरीत पाणी असूनसुद्धा सिंचन करु शकत नाही व पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती करावी लागत आहे.