शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात ३०० सर्पदंश

By admin | Updated: July 19, 2014 23:49 IST

पावसाळा लागला की साप, विंचूंचा उपद्रव वाढतो, हे सर्वज्ञात आहे. मात्र अलीकडे उपद्रवाचा हा आलेख वाढत चालला आहे. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ पर्यंत तब्बल ३०० जणांना सापाने दंश केला आहे.

उपद्रव वाढला : दोन हजार व्यक्तींना कुत्र्यांचा चावाचंद्रपूर : पावसाळा लागला की साप, विंचूंचा उपद्रव वाढतो, हे सर्वज्ञात आहे. मात्र अलीकडे उपद्रवाचा हा आलेख वाढत चालला आहे. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ पर्यंत तब्बल ३०० जणांना सापाने दंश केला आहे. यातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर ८५ लोकांना विंचूने चावा घेतला. यासोबतच बेवारस कुत्र्यांचाही सुळसुळाट वाढला असून तब्बल दोन हजार लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला. यातील एकाचा बळी गेला.चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश भाग जंगलव्याप्त आहे. घनदाट जंगलाला लागूनच ही गावे वसली आहेत. त्यामुळे सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरसह या रुग्णालयाच्या अंतर्गत येत असलेल्या क्षेत्रात एप्रिल २०१३ ते २०१४ या कालावधीत ३०० लोकांना सापाने दंश केला आहे. सर्पदंशानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील २९४ लोकांना वाचविण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले. मात्र सहा लोकांचा अंगात विष भिनल्याने मृत्यू झाला. सापासोबतच विंचूचाही उपद्रव मागील वर्षी वाढलेलाच दिसून येत आहे. ८५ लोकांना विंचूने चावा घेतला. त्यांच्यावर वेळेत उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना घडत असल्यातरी ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णालयात यावर उपचार उपलब्ध नसतो. दुर्गम भागातच घटना अधिक घडतात. त्यामुळे याठिकाणी सर्पदंशावरील उपाय उपलब्ध असणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)