शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

१८ गावांमधील ३० महिलांनी दिली कृषी विकासाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 11:33 IST

Chandrapur News मूल तालुक्यातील १८ गावातील काही महिला शेती करीत आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून शेती कसत आहेत.

ठळक मुद्देशेतात राबत घेतले भरघोस उत्पादन १८ गावातील ३० महिलांचा सन्मान

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तालुक्यात सिंचनाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे शेतकरी शेती कसायला मागे पुढे पाहतो, त्यातच युवापिढीला शेती करण्यात रस नाही. असे असताना काही महिलांनी शेती व्यवसायात गुंतत कृषी विकासाला चालना दिली आहे. योग्य नियोजन करून शेती केल्यास शेतीतून चांगल्या पध्दतीने उत्पन्न घेता येऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. १८ गावातील या ३० शेतकरी महिलांचा कृषी विभागामार्फत महिला किसान दिनी सन्मानही करण्यात आला.

मूल तालुक्यातील १८ गावातील काही महिला शेती करीत आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून शेती कसत आहेत. अपुरे सिंचन सुविधेमुळे काही शेतकरी शेती विक्री करीत असतानाच काही महिला त्यास विरोध करून मिळून शेती करण्यास पुढाकार घेत आहेत. ठिंबक सिंचनाचा माध्यमातून धानशेती करण्याकडे तालुक्यातील शेतकरयांचा विशेष कल आहे. काही महिला मोग?्याच्या फुलबाग तयार करून त्यापासून उत्पन्न घेत आहेत. नविन तंत्रज्ञानाचा वापर करून काही महिला शेतकयांनी भाजीपाला लागवड केली आहे.घरीच असलेल्या गाय, बैल, म्हशीच्या शेणापासून शेणखत तयार करून त्या खतापासून सेंद्रीय भाजीपालाचे उत्पादन घेत आहेत. घरी असलेल्या खुल्या जागेत काही महिला परसबाग तयार करून त्यापासूनही घरघुती लागणारा भाजीपाल्याचे उत्पन्न घेत आहेत. या शेतकरी महिलांसह शेतमजूर महिला व कृषी उत्पादनात विशेष आवड असलेल्या ३० महिलांचा कृषी विभागानेही दखल घेतली असून कृषी दिनानिमित्स या महिलांचा सन्मान केलेला आहे. या महिलांकडून प्रेरित होऊन इतर महिलांनी व शेतकऱ्यांनी शेतीत तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे.या शेतकरी महिलांनी केली किमयामूल तालुक्यातील मनिषा घोडमारे, योगीता कस्तुरे, संध्या कुंभरे, सुनंदा चलाख, मिना नाहगमकर, खामादेवी पेटीवार, भावना जुमनाके, अश्विनी बोलीवार, अल्का कोहपरे, मंगला बोरकुटे, बाली रायपूरे, जयश्री सोनूने, रेवता सोनूने, लिलाबाई देवतळे, उषा सिडाम, कांता मुनगटीवार, संगिता गणवीर, शालिनी लेनगुरे, भाग्यश्री ओदलवार, शिला जनबंधु, सुवर्णा दहिवले, वर्षा भुरसे, स्नेहा चलाख, सुनिता मानकर, वर्षा मानकर, सुरेखा चुनारकर, खुशी लाकडे, नंदा शेंडे, आशा गेडाम या महिलांनी शेतात राबत भरघोस उत्पादन घेत किमया साधली आहे१८ गावातील सुमारे ३० महिलांनी कृषी विकासाला चालना दिली आहे. आम्ही त्यांचा सन्मान केला आहे. यामुळे इतर महिलांना कृषीवर आधारित काम करण्यास प्रोत्साहन मिळू शकते.-आर.एस. उईके,कृषी पर्यवेक्षक,मूल.

 

टॅग्स :agricultureशेती