शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

१८ गावांमधील ३० महिलांनी दिली कृषी विकासाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 11:33 IST

Chandrapur News मूल तालुक्यातील १८ गावातील काही महिला शेती करीत आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून शेती कसत आहेत.

ठळक मुद्देशेतात राबत घेतले भरघोस उत्पादन १८ गावातील ३० महिलांचा सन्मान

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तालुक्यात सिंचनाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे शेतकरी शेती कसायला मागे पुढे पाहतो, त्यातच युवापिढीला शेती करण्यात रस नाही. असे असताना काही महिलांनी शेती व्यवसायात गुंतत कृषी विकासाला चालना दिली आहे. योग्य नियोजन करून शेती केल्यास शेतीतून चांगल्या पध्दतीने उत्पन्न घेता येऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. १८ गावातील या ३० शेतकरी महिलांचा कृषी विभागामार्फत महिला किसान दिनी सन्मानही करण्यात आला.

मूल तालुक्यातील १८ गावातील काही महिला शेती करीत आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून शेती कसत आहेत. अपुरे सिंचन सुविधेमुळे काही शेतकरी शेती विक्री करीत असतानाच काही महिला त्यास विरोध करून मिळून शेती करण्यास पुढाकार घेत आहेत. ठिंबक सिंचनाचा माध्यमातून धानशेती करण्याकडे तालुक्यातील शेतकरयांचा विशेष कल आहे. काही महिला मोग?्याच्या फुलबाग तयार करून त्यापासून उत्पन्न घेत आहेत. नविन तंत्रज्ञानाचा वापर करून काही महिला शेतकयांनी भाजीपाला लागवड केली आहे.घरीच असलेल्या गाय, बैल, म्हशीच्या शेणापासून शेणखत तयार करून त्या खतापासून सेंद्रीय भाजीपालाचे उत्पादन घेत आहेत. घरी असलेल्या खुल्या जागेत काही महिला परसबाग तयार करून त्यापासूनही घरघुती लागणारा भाजीपाल्याचे उत्पन्न घेत आहेत. या शेतकरी महिलांसह शेतमजूर महिला व कृषी उत्पादनात विशेष आवड असलेल्या ३० महिलांचा कृषी विभागानेही दखल घेतली असून कृषी दिनानिमित्स या महिलांचा सन्मान केलेला आहे. या महिलांकडून प्रेरित होऊन इतर महिलांनी व शेतकऱ्यांनी शेतीत तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे.या शेतकरी महिलांनी केली किमयामूल तालुक्यातील मनिषा घोडमारे, योगीता कस्तुरे, संध्या कुंभरे, सुनंदा चलाख, मिना नाहगमकर, खामादेवी पेटीवार, भावना जुमनाके, अश्विनी बोलीवार, अल्का कोहपरे, मंगला बोरकुटे, बाली रायपूरे, जयश्री सोनूने, रेवता सोनूने, लिलाबाई देवतळे, उषा सिडाम, कांता मुनगटीवार, संगिता गणवीर, शालिनी लेनगुरे, भाग्यश्री ओदलवार, शिला जनबंधु, सुवर्णा दहिवले, वर्षा भुरसे, स्नेहा चलाख, सुनिता मानकर, वर्षा मानकर, सुरेखा चुनारकर, खुशी लाकडे, नंदा शेंडे, आशा गेडाम या महिलांनी शेतात राबत भरघोस उत्पादन घेत किमया साधली आहे१८ गावातील सुमारे ३० महिलांनी कृषी विकासाला चालना दिली आहे. आम्ही त्यांचा सन्मान केला आहे. यामुळे इतर महिलांना कृषीवर आधारित काम करण्यास प्रोत्साहन मिळू शकते.-आर.एस. उईके,कृषी पर्यवेक्षक,मूल.

 

टॅग्स :agricultureशेती