शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

जिल्ह्यात ३० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली, टीव्ही, फ्रीज, बाईक तरी मोफत रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:27 IST

चंद्रपूर : शासनाने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी काही निकष ठरवून दिले आहेत. यानुसारच त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, जिल्ह्यातील ...

चंद्रपूर : शासनाने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी काही निकष ठरवून दिले आहेत. यानुसारच त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, जिल्ह्यातील काही नागरिक शासकीय निकषांना बगल देत सुविधा प्राप्त करून घेत आहेत. असाच प्रकार रेशन उचलण्यामध्येही होत असून, घरात टीव्ही, फ्रीज, दुचाकी एवढेच काय चार चाकी वाहन असतानाही अनेक जण रेशन दुकानातून धान्य उचलत आहेत. सद्यस्थितीत पुरवठा विभागाकडील आकडेवारीनुसार १ लाख ३७ हजार १९५ नागरिक दारिद्र्यरेषेखाली आहेत. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना त्रास होऊ नये, इतर नागरिकांच्या तुलनेमध्ये त्यांनाही सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी शासनाने काही निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार त्यांना धान्य तसेच इतर सुविधा प्राप्त करून दिल्या जातात. मात्र, याकडेही काही श्रीमंतांची नजर असून, त्यांच्या वाट्यातील लाभ हेच लोक घेत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने दारिद्र्यरेषेखाली असलेले नागरिक वंचित राहात आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने दारिद्र्यरेषेखालील विशेषत: अंत्योदय लाभार्थ्यांची यादी तयार करून खऱ्या लाभार्थ्यांना रेशन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

बाॅक्स

जिल्ह्यातील लोकसंख्या- २२,०४,३०७

एकूण रेशनकार्डधारक- ४,५८,८५०

दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक- १,३७,१९५

बाॅक्स

कोणत्या तालुक्यात किती दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक

बल्लारपूर ७,४१९

भद्रावती ८,५२३

ब्रह्मपुरी १०,१४१

चंद्रपूर ५,६१९

चंद्रपूर शहर ७,३३७

चिमूर १०,२७२

गोंडपिपरी ९,०८७

जिवती १३,०३३

कोरपना ६,९४१

मूल ८,१७०

नागभीड ९,३३२

पोंभुर्णा ७,२२६

राजुरा ९,४७४

सावली ६,४४६

सिंदेवाही ८,२९२

वरोरा ९,८८३

एकूण १,३७,१९५

बाॅक्स

दारिद्र्यरेषेसाठीचे निकष काय?

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. अशांचा दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी म्हणून उल्लेख केला जातो.

कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय कर, विक्रीकर किंवा आयकर भरत नसावी किंवा भरण्यास पात्र नसावी. कुटुंबाकडे निवासी दूरध्वनी नसावा, कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे, दोन हेक्टर जिरायत जमीन नसावी.

बाॅक्स

यादीत गोंधळ कारण......

जेव्हा-जेव्हा तपासणी कार्यक्रम आखला जातो. तेव्हा कधी शासकीय, तर कधी स्थानिक कारणांमुळे अडथळा येतो. त्यामुळे या कार्डची प्रत्यक्षरित्या शहानिशा होत नाही. परिणामी निकषात बसत नसतानाही अनेकांना लाभ मिळत आहे.

बाॅक्स

दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावाच घेतला गेला नाही

जिल्ह्यात ३० टक्के नागरिक दारिद्र्यरेषेखालील असल्याचे अंत्योदय कार्डवरून दिसून येते. मात्र, अनेकांकडे निकष सोडून टीव्ही, फ्रीज एवढेच काय तर चारचाकी वाहनेसुद्धा आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने दारिद्र्यरेषेखालील लोकांना लाभ न मिळता दुसरेच लाभ घेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बाॅक्स

कोण गरीब, कोण श्रीमंत, तीन लाखांवर लोकांना मोफत रेशन

जिल्ह्यात १ लाख ३७ हजार १९५ नागरिकांना अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य दिले जाते. मात्र, यातील अनेकांकडे सोयी-सुविधा आहेत. प्राधान्य गटातील २ लाख ६२ हजार ३०० लाभार्थ्यांना धान्य दिले जाते. त्यामुळे आता कोण गरीब, कोण श्रीमंत हा भेदभाव राहिला नाही. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील प्रत्येकजण धान्य उचल करीत आहे.