शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२९३ मुख्याध्यापक बनले सहायक शिक्षक

By admin | Updated: August 5, 2014 23:41 IST

आरटीई अ‍ॅक्टनुसार जिल्ह्यातील ५२८ मुख्याध्यापकांपैकी २३५ मुख्याध्यापकांचे समायोजन यापूर्वीच झाले. मात्र उर्वरित तब्बल २९३ मुख्याध्यापकांना पदवीधर, विशेष तसेच सहायक शिक्षण

मनस्ताप : तीन टप्प्यात झाले अपात्र समायोजनचंद्रपूर : आरटीई अ‍ॅक्टनुसार जिल्ह्यातील ५२८ मुख्याध्यापकांपैकी २३५ मुख्याध्यापकांचे समायोजन यापूर्वीच झाले. मात्र उर्वरित तब्बल २९३ मुख्याध्यापकांना पदवीधर, विशेष तसेच सहायक शिक्षण म्हणून काम करावे लागत आहे. यामुळे मुख्याध्यापकांमध्ये संतापाचे वातावरण असून अनेकांना नामुष्कीची वेळ आली आहे. काही शिक्षकांना तर ज्या शाळेत पूर्वी मुख्याध्यापक होते त्याच शाळेत सहायक म्हणून काम करावे लागत आहे.जिल्हा परिषदेंंतर्गंत मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात आले. यात प्रथम २३६ शिक्षकांचा समावेश करण्यात आला. यापैकी ८७ मुख्याध्यापकांना ते गावामध्ये कार्यरत होते. त्याच गावात ठेवण्यात आले. ८५ शिक्षकांना त्याच तालुक्यात पण दुसऱ्या गावात बदली करण्यात आली. तर, ६२ शिक्षकांचा तालुका बदल करण्यात आला. या प्रक्रियेमुळे काही शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असले तरी तालुका बदल झालेल्या शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उर्वरित २९३ मुख्याध्यापकांचे समायोजन तीन टप्प्यात करण्यात आले. या समायोजनामध्ये काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शासकीय अध्यादेशाचा आधार घेतला. विशेष म्हणजे, पदवीधर शिक्षण आणि डीएड शिक्षकांचे समायोजन करताना संभ्रम निर्माण झाल्याने त्यांनी शासनाकडून माहिती मागितली. यापूर्वी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून जे शिक्षक काम करत होते. अशा मुख्याध्यापकांना आता विशेष शिक्षक, पदवीधर शिक्षक, सहायक शिक्षक म्हणून काम करण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे अध्यापनाच्या कार्यात त्यांचे दुर्लक्ष होतील, असे मत शिक्षक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांचे समायोजन करायचे होते तर किमान जुन किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करणे अपेक्षित होते. मात्र आॅगस्ट महिना आला असतानाही समायोजनाची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे अनेक शिक्षकांचे नियोजन बिघडले आहे. काही शिक्षकांनी आपल्या पाल्यांना सोयीच्या शाळेत टाकले आहे. त्यामुळे सत्राच्या मधातच आता त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)