शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

२९ हजार ८८५ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:49 IST

राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा गुरूवारपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २० मार्चपर्यंत चालेल. दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील २९ हजार ८८५ विद्यार्थ्यी बारावीची परीक्षा देणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा गुरूवारपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २० मार्चपर्यंत चालेल. दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील २९ हजार ८८५ विद्यार्थ्यी बारावीची परीक्षा देणार आहेत.जिल्ह्यात ८० केंद्रावरून बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २९ हजार ८८५ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेकरिता अर्ज भरले होते. दहावीच्या परीक्षा ३२ हजार १४३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहे. बारावीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे. परीक्षेसाठी सहा भरारी पथक गठित करण्यात आले. पथकामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षणाधिकारी (निरंतर) महिला विशेष पथक, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डाएट आदींचा समावेश आहे.परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू२१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ दरम्यान होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व १ मार्च ते २२ मार्च २०१९ रोजी होणाºया माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा परिसरात जिल्हादंडाधिकारी यांनी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कलम १४४ लागू केली आहे. केंद्राच्या परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्राच्या शंभर मीटर क्षेत्राअंतर्गत नियमित व रोजच्या वाहतुकीव्यतिरिक्त इतर हालचालीना प्रतिबंध राहील, उपरोक्त कालावधीत परीक्षा दिनी परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर क्षेत्रात झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, मोबाईल फोन, इंटरनेट सेवांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.