शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे २८०० हेक्टरचे नुकसान

By admin | Updated: March 11, 2017 00:43 IST

जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, पोंभुर्णा, चिमूर आदी तालुक्यांमध्ये मंगळवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २ हजार ८७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.

रबीमध्ये पीक विम्याकडे पाठ : बल्लारपूर व राजुऱ्यात ५१ गावे बाधितचंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, पोंभुर्णा, चिमूर आदी तालुक्यांमध्ये मंगळवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २ हजार ८७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. राजुरा तालुक्यातील रामपूर येथील एका शेत तलावातील शेकडो मासोळ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. कृषी विभागाच्या अंदाजानुसार बल्लारपूर आणि राजुरा या दोन तालुक्यातील ५१ गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून रबी हंगामाध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविली आहे. परिणामी अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता नसून त्यांना केवळ शासकीय मदतीवर अवलंबून राहावे लागणार आहे.वादळी पावसाने गारांसह हजेरी लावल्याने बल्लारपूर तालुक्यात अनेक झाडे उन्मळून पडली आणि विद्युत तारा तुटल्या. पहिल्या वादळी व गारपीटीच्या तीव्र पावसानंतर परत एक तासाने गारांसह पाऊस बरसला. या वादळी पावसामुळे वीज खंडीत झाली. अवकाळी पावसामुळे तालुक्यात गहू, हरभरा, मिरची, कापूस व भाजीपाल्याचे नुकसान झाले. बल्लारपूर, विसापूर, भिवकुंड, काटवली, कोठारी, पळसगाव, कवडजई, बामणी, मानोली, इटोली, आमडी, कळमना, परसोडी, कुडेसावली आदी गावांमध्ये नुकसान झाले आहे. राजुरा तालुक्यातील नदीपट्यातील मानोली, बाबापूर, कालगाव, कढोली परिसराला पाऊस व गारपिटीचा फटका बसला. याशिवाय चंद्रपूर आणि चिमूर तालुक्यातील अनेक गावातही वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. राजुरा तालुक्यातील सास्ती येथून दोन किलोमीटर अंतरावर रामनगर येथे गारपिटीमुळे शेततळ्याचे पाणी थंडगार झाले. मासोळ्यात ते तापमान सहन करू न शकल्याने मरण पावल्या. गेल्या ३-४ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी रबी हंगामामध्ये राष्ट्रीय पीक विमा योजनेत पिकांचा विमा काढलेला नाही. गेल्या वर्षीच्या हंगामात नागपूर विभागाला २२ लाखांची नुकसान भरपाई मिळाली असताना चंद्रपूर जिल्ह्यात विमा काढला नसल्याने कोणालाही लाभ मिळाला नाही. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी त्याचा विमा नसल्याने त्याची नुकसान भरपाई मिळणार नाही. (प्रतिनिधी)सर्वेक्षण अडकणार सुट्यांमध्येपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, कृषी विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहेत. दोन दिवसांपासून सर्वेक्षण सुरू आहे. परंतु महिन्याचा दुसरा शनिवार, त्यानंतर रविवार आणि सोमवारी रंगपंचमीची शासकीय सुटी आली आहे. परिणामी सर्वेक्षण लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासकीय सुट्या असल्या तरीे सर्वेक्षणासाठी शेतकरी बाधित पीक शेतात तसेच ठेवणार नाहीत. पंचनामा करताना ते पीक दिसले नाही तर त्याची गणना नुकसानीमध्ये होणार नाही.दोन व्यक्ती जखमी, दोन जनावरे दगावलीमहसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, अवकाळी पावसादरम्यान चिमूर तालुक्यात वीज पडून ज्ञानबा निळकंठ अलोणे आणि त्यांचा मुलगा घनशाम ज्ञानबा अलोणे जखमी झाले आहेत. तसेच बल्लारपूर तालुक्यात दोन जनावरे मरण पावली आहेत. पोंभुर्णा तालुक्यात दोन घरे बाधित झाली आहेत. कृषी विभागाने शासनाला २ हजार ८७४ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कळविला आहे. बल्लारपूर तालुक्यात नुकसान झालेले ७०० हेक्टर क्षेत्र आहे.आज कृषिभवनाचे उद्घाटनवरोरा नाका येथे नवीन कृषिभवनाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ११ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर राहणार आहेत. यावेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित राहणार आहेत.