शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

२७ हजार १८१ नागरिक ‘होम क्वारंटाईन’मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहेत. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावांतील नागरिक प्रशासनाचे कान व डोळे झाले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अशा पद्धतीच्या तक्रारी वाढल्या.

ठळक मुद्देखबरदारी घेण्याच्या सूचना। सीमावर्ती शेकडो गावे स्वसंरक्षणार्थ झाली सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रूग्ण जिल्ह्यात आढळला नाही. मात्र नागपूर व यवतमाळ येथून येणाऱ्या नागरिकांबद्दल कसून चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार १८१ नागरीकांचे ‘होम क्वारंटाईन’ पूर्ण झाले असून त्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनापासून अलिप्त राहण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तेलंगणा राज्याला लागून असलेल्या सीमांवर प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहेत. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावांतील नागरिक प्रशासनाचे कान व डोळे झाले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अशा पद्धतीच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे जिल्ह्यात येणाºया नागरिकांनी घरातच क्वारंटाईन करून घ्यावे व आरोग्य विभागाला माहिती द्यावी, असा सूचना प्रशासनाने दिल्या.कुणी बाहेरून आल्यास माहिती द्याजिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये ५९५ ग्रामसेवक, २ हजार ५६३ अंगणवाडीसेविका, २ हजार ३९२ मदतनीस १ हजार ९०७ आशावर्कर १ हजार ३०० ग्राम कर्मचारी कार्यरत आहेत. यांच्या सोबतीला गावातील तरूणांनी मंडळ बनवून गावामध्ये बाहेर गावावरून येणाºया प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवणे सुरू केले आहे. बाहेरून येणाºया प्रत्येक नागरिकाने तपासणी करणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.१० लाख ६७ हजारांचा दंड वसूलसंचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया १७९ प्रकरणांत १० लाखांवर दंड वसूल, ६८७ वाहने जप्त तर ४७ नागरिकांना अटक करण्यात आली.68 नमुने निगेटिव्हशनिवारी कोरोना संशयित म्हणून ८२ नागरिकांची नोंद झाली. एकून ७४ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ६८ नमुने निगेटिव्ह निघाले. ६ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हाबाहेरून २९ हजार १३ नागरिक आले. यापैकी १ हजार ८३२ नागरिक निगराणीखाली आहेत. २७ हजार १८१ नागरिकांनी १४ दिवसांचे होम क्वांरटाईन पूर्ण केले. ७२ व्यक्तींना इन्स्टिट्युशनल क्वारंन्टाईन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या