शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

२७ हजार १८१ नागरिक ‘होम क्वारंटाईन’मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहेत. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावांतील नागरिक प्रशासनाचे कान व डोळे झाले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अशा पद्धतीच्या तक्रारी वाढल्या.

ठळक मुद्देखबरदारी घेण्याच्या सूचना। सीमावर्ती शेकडो गावे स्वसंरक्षणार्थ झाली सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रूग्ण जिल्ह्यात आढळला नाही. मात्र नागपूर व यवतमाळ येथून येणाऱ्या नागरिकांबद्दल कसून चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार १८१ नागरीकांचे ‘होम क्वारंटाईन’ पूर्ण झाले असून त्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनापासून अलिप्त राहण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तेलंगणा राज्याला लागून असलेल्या सीमांवर प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहेत. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावांतील नागरिक प्रशासनाचे कान व डोळे झाले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अशा पद्धतीच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे जिल्ह्यात येणाºया नागरिकांनी घरातच क्वारंटाईन करून घ्यावे व आरोग्य विभागाला माहिती द्यावी, असा सूचना प्रशासनाने दिल्या.कुणी बाहेरून आल्यास माहिती द्याजिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये ५९५ ग्रामसेवक, २ हजार ५६३ अंगणवाडीसेविका, २ हजार ३९२ मदतनीस १ हजार ९०७ आशावर्कर १ हजार ३०० ग्राम कर्मचारी कार्यरत आहेत. यांच्या सोबतीला गावातील तरूणांनी मंडळ बनवून गावामध्ये बाहेर गावावरून येणाºया प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवणे सुरू केले आहे. बाहेरून येणाºया प्रत्येक नागरिकाने तपासणी करणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.१० लाख ६७ हजारांचा दंड वसूलसंचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया १७९ प्रकरणांत १० लाखांवर दंड वसूल, ६८७ वाहने जप्त तर ४७ नागरिकांना अटक करण्यात आली.68 नमुने निगेटिव्हशनिवारी कोरोना संशयित म्हणून ८२ नागरिकांची नोंद झाली. एकून ७४ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ६८ नमुने निगेटिव्ह निघाले. ६ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हाबाहेरून २९ हजार १३ नागरिक आले. यापैकी १ हजार ८३२ नागरिक निगराणीखाली आहेत. २७ हजार १८१ नागरिकांनी १४ दिवसांचे होम क्वांरटाईन पूर्ण केले. ७२ व्यक्तींना इन्स्टिट्युशनल क्वारंन्टाईन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या