शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

२७ हजार १८१ नागरिक ‘होम क्वारंटाईन’मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहेत. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावांतील नागरिक प्रशासनाचे कान व डोळे झाले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अशा पद्धतीच्या तक्रारी वाढल्या.

ठळक मुद्देखबरदारी घेण्याच्या सूचना। सीमावर्ती शेकडो गावे स्वसंरक्षणार्थ झाली सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रूग्ण जिल्ह्यात आढळला नाही. मात्र नागपूर व यवतमाळ येथून येणाऱ्या नागरिकांबद्दल कसून चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार १८१ नागरीकांचे ‘होम क्वारंटाईन’ पूर्ण झाले असून त्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनापासून अलिप्त राहण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तेलंगणा राज्याला लागून असलेल्या सीमांवर प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहेत. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावांतील नागरिक प्रशासनाचे कान व डोळे झाले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अशा पद्धतीच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे जिल्ह्यात येणाºया नागरिकांनी घरातच क्वारंटाईन करून घ्यावे व आरोग्य विभागाला माहिती द्यावी, असा सूचना प्रशासनाने दिल्या.कुणी बाहेरून आल्यास माहिती द्याजिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये ५९५ ग्रामसेवक, २ हजार ५६३ अंगणवाडीसेविका, २ हजार ३९२ मदतनीस १ हजार ९०७ आशावर्कर १ हजार ३०० ग्राम कर्मचारी कार्यरत आहेत. यांच्या सोबतीला गावातील तरूणांनी मंडळ बनवून गावामध्ये बाहेर गावावरून येणाºया प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवणे सुरू केले आहे. बाहेरून येणाºया प्रत्येक नागरिकाने तपासणी करणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.१० लाख ६७ हजारांचा दंड वसूलसंचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया १७९ प्रकरणांत १० लाखांवर दंड वसूल, ६८७ वाहने जप्त तर ४७ नागरिकांना अटक करण्यात आली.68 नमुने निगेटिव्हशनिवारी कोरोना संशयित म्हणून ८२ नागरिकांची नोंद झाली. एकून ७४ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ६८ नमुने निगेटिव्ह निघाले. ६ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हाबाहेरून २९ हजार १३ नागरिक आले. यापैकी १ हजार ८३२ नागरिक निगराणीखाली आहेत. २७ हजार १८१ नागरिकांनी १४ दिवसांचे होम क्वांरटाईन पूर्ण केले. ७२ व्यक्तींना इन्स्टिट्युशनल क्वारंन्टाईन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या