शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मुंडणाद्वारे २६२ जणांनी केला निषेध

By admin | Updated: June 9, 2017 00:52 IST

दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने वर्धा- चंद्रपूर- यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त

दिंदोडा बॅरेज प्रकल्प : जमिनी परत देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कव्वरोरा : दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने वर्धा- चंद्रपूर- यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वर्धा- वणा नदींच्या संगमस्थळी विठ्ठल रुखमाई देवस्थान परिसरात महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर सामूहिक मुंडण सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली. या सत्याग्रहात २७२ शेतकऱ्यांनी आपले केस मुंडण करुन ते नदीपात्रात अर्पण केले.महाराष्ट्रात सर्वत्र शेतकऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यात दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहीक मुंडण आंदोलनाची भर पडली. शेतकऱ्यांचे संपावर जाणे म्हणजे राज्यकर्त्यांनी वाटीत पाणी घेऊन बुडून मरण्यासारखे आहे. जर या संपाला सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर आज ज्या शेकडोंच्या संख्येने शेतकरी स्वत:चे केश मुंडण करुन आपले चेहरे विद्रूप करतायेत. तेच शेतकरी २०१९ ला मतदानरुपी वस्तऱ्याने राज्यकर्त्यांचे मुंडण केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ. मनोज तेलंग यांनी व्यक्त केली.१९९९ पासून निप्पॉन डेन्ड्रो या वीज प्रकल्पाकरिता पाण्याची गरज असल्याचे भासवून चंद्रपूर - वर्धा - यवतमाळ या तीन जिल्ह्यांमधील ३२ गावांतील सुमारे १ हजार ५४० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. १५ वर्षापासून या वीज प्रकल्पाचा पत्ता नाही. आता अचानक २०१६ मध्ये शासनाने याच अधिग्रहित जमिनी जलसंपदा विभागाला परस्पर हस्तांतरित केल्या. याबाबत बाधीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात आली नाही. भूमी अधिग्रहण कायदा २०१३-१४ नुसार पाच वर्षांत संपादित जमिनीवर प्रस्तावित प्रकल्प झाला नाही, तर त्या जमिनी शेतमालकाला परत करण्याची तरतूद आहे. परंतु १५ वर्षांपासून न झालेल्या प्रकल्पाच्या जमिनीवरचे भूमी अधिग्रहण रद्द करुन त्या सन्मानाने शासनाने परत कराव्या किंवा जो भूमी अधिग्रहण कायदा-१८९४ शासनाने रद्द केला, ते भूसंपादन रद्द करावे. या आंदोलनात महिला-पुरुष, मुले-मुली असे संपूर्ण कुटुंबींयासह शेकडोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त आणि शेतमजूर, कारागीर आदी या सत्याग्रहात सहभागी झाले होते. दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे यांच्यापासून मुंडणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपाध्यक्ष अभिजित मांडेकर, सचिव चंपत साळवे आणि सुजल तिजारे, अंकुश ठाकरे, प्रथमेश मांडेकर, कृष्णा मांडेकर, स्नेहल साळवे या पाच ते दहा वर्षांच्या अल्पवयीन मुला-मुलींसह सायंकाळी पाच वाजेपर्यंत २७२ प्रकल्पग्रस्तांनी आपले केश मुंडण केले. यापुढे हे आंदोलन अतिशय उग्र रुप धारण करणार आहे.या आंदोलनाला मार्गदर्शक म्हणून विलास भोंगाडे, छोटू ठाकरे, प्रवीण इंगोले, मनोज कोसूरकर यांनी मार्गदर्शन केले. आंदोलन बेदखल केल्याने मुंडण सत्याग्रहनवीन भूमी संपादनातील योग्य नुकसान भरपाईचा अधिकार आणि स्थानांतर, वाजवी भरपाई व पुनर्वसन, पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१४ नुसार नव्याने भूमी अधिग्रहित करुन सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंबांना प्रकल्पग्रस्ताचा लाभ म्हणून शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आणि जमिनीला योग्य मोबदला द्यावा, या मागणीकरिता चंद्रपूर- वर्धा- यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. शासनस्तरावरुन या आंदोलनाची दखल घेतली गेली न गेल्यामुळे सामूहिक मुंडण सत्याग्रह करण्यात आला.