शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुंडणाद्वारे २६२ जणांनी केला निषेध

By admin | Updated: June 9, 2017 00:52 IST

दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने वर्धा- चंद्रपूर- यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त

दिंदोडा बॅरेज प्रकल्प : जमिनी परत देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कव्वरोरा : दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने वर्धा- चंद्रपूर- यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वर्धा- वणा नदींच्या संगमस्थळी विठ्ठल रुखमाई देवस्थान परिसरात महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर सामूहिक मुंडण सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली. या सत्याग्रहात २७२ शेतकऱ्यांनी आपले केस मुंडण करुन ते नदीपात्रात अर्पण केले.महाराष्ट्रात सर्वत्र शेतकऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यात दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहीक मुंडण आंदोलनाची भर पडली. शेतकऱ्यांचे संपावर जाणे म्हणजे राज्यकर्त्यांनी वाटीत पाणी घेऊन बुडून मरण्यासारखे आहे. जर या संपाला सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर आज ज्या शेकडोंच्या संख्येने शेतकरी स्वत:चे केश मुंडण करुन आपले चेहरे विद्रूप करतायेत. तेच शेतकरी २०१९ ला मतदानरुपी वस्तऱ्याने राज्यकर्त्यांचे मुंडण केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ. मनोज तेलंग यांनी व्यक्त केली.१९९९ पासून निप्पॉन डेन्ड्रो या वीज प्रकल्पाकरिता पाण्याची गरज असल्याचे भासवून चंद्रपूर - वर्धा - यवतमाळ या तीन जिल्ह्यांमधील ३२ गावांतील सुमारे १ हजार ५४० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. १५ वर्षापासून या वीज प्रकल्पाचा पत्ता नाही. आता अचानक २०१६ मध्ये शासनाने याच अधिग्रहित जमिनी जलसंपदा विभागाला परस्पर हस्तांतरित केल्या. याबाबत बाधीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात आली नाही. भूमी अधिग्रहण कायदा २०१३-१४ नुसार पाच वर्षांत संपादित जमिनीवर प्रस्तावित प्रकल्प झाला नाही, तर त्या जमिनी शेतमालकाला परत करण्याची तरतूद आहे. परंतु १५ वर्षांपासून न झालेल्या प्रकल्पाच्या जमिनीवरचे भूमी अधिग्रहण रद्द करुन त्या सन्मानाने शासनाने परत कराव्या किंवा जो भूमी अधिग्रहण कायदा-१८९४ शासनाने रद्द केला, ते भूसंपादन रद्द करावे. या आंदोलनात महिला-पुरुष, मुले-मुली असे संपूर्ण कुटुंबींयासह शेकडोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त आणि शेतमजूर, कारागीर आदी या सत्याग्रहात सहभागी झाले होते. दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे यांच्यापासून मुंडणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपाध्यक्ष अभिजित मांडेकर, सचिव चंपत साळवे आणि सुजल तिजारे, अंकुश ठाकरे, प्रथमेश मांडेकर, कृष्णा मांडेकर, स्नेहल साळवे या पाच ते दहा वर्षांच्या अल्पवयीन मुला-मुलींसह सायंकाळी पाच वाजेपर्यंत २७२ प्रकल्पग्रस्तांनी आपले केश मुंडण केले. यापुढे हे आंदोलन अतिशय उग्र रुप धारण करणार आहे.या आंदोलनाला मार्गदर्शक म्हणून विलास भोंगाडे, छोटू ठाकरे, प्रवीण इंगोले, मनोज कोसूरकर यांनी मार्गदर्शन केले. आंदोलन बेदखल केल्याने मुंडण सत्याग्रहनवीन भूमी संपादनातील योग्य नुकसान भरपाईचा अधिकार आणि स्थानांतर, वाजवी भरपाई व पुनर्वसन, पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१४ नुसार नव्याने भूमी अधिग्रहित करुन सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंबांना प्रकल्पग्रस्ताचा लाभ म्हणून शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आणि जमिनीला योग्य मोबदला द्यावा, या मागणीकरिता चंद्रपूर- वर्धा- यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. शासनस्तरावरुन या आंदोलनाची दखल घेतली गेली न गेल्यामुळे सामूहिक मुंडण सत्याग्रह करण्यात आला.