शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

२५० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये चालू सत्रापासून ‘बायोमेट्रिक’ हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:09 IST

चालू सत्रापासून जिल्ह्यातील तब्बल २५० विद्यालयांमध्ये इयत्ता ११ व १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. यासाठी विविध विद्यालयांमध्ये मशीनही बसविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना येता-जाता या मशीनवर हजेरी लावावी लागणार आहे. परिणामी तासिका बुडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता अंकुश लागणार आहे.

ठळक मुद्देइयत्ता ११ व १२ वी विद्यार्थ्यांच्या हजेरीवर नजर : शिष्यवृत्ती व प्रात्यक्षिक गुणांवरही परिणाम

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चालू सत्रापासून जिल्ह्यातील तब्बल २५० विद्यालयांमध्ये इयत्ता ११ व १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. यासाठी विविध विद्यालयांमध्ये मशीनही बसविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना येता-जाता या मशीनवर हजेरी लावावी लागणार आहे. परिणामी तासिका बुडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता अंकुश लागणार आहे. उपस्थिती कमी असेल तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसारख्या विविध सुविधांचा लाभही मिळणे कठीण होणार आहे. विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग आणि विद्यालयामध्ये उपस्थित राहण्याचा टाईमिंग जुळवताना कसरत करावी लागणार आहे.दहावी आणि बारावी परीक्षांकडे आयुष्याचा टर्निंग पार्इंट म्हणून बघितले जाते. त्यामुळे प्रत्येकजण या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे, आपल्या पाल्याने बारावीमध्ये जास्तीत जास्त गुण घ्यावे, यासाठी पालकांची धडपड असते. यासाठी कितीही खर्च करण्याच्या तयारीत ते असतात. त्यामुळे ते विविध महागडे खासगी शिकवणी वर्गही लावतात. या सर्वामध्ये मात्र विद्यार्थ्यांची दमछाक होत असून अनेक विद्यार्थी विद्यालयामध्ये जाण्याचे टाळतात. परिणामी विद्यालयांमध्ये ११ व १२ वीचे वर्र्ग केवळ नावापूरते दिसून येतात. विद्यार्थीच वर्गात येत नसल्याने शिक्षकांचीही जबाबदारी कमी झाली आहे. चार, दोन विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कष्ट ते घेण्याच्या मानसिकतेत नसतात. परिणामी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत आहेत. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी शासनाने विद्यालयांतील बारावी विज्ञान वर्गांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना विद्यालयामध्ये जावून हजेरी लावावी लागणार आहे. सदर हजेरी आॅनलाईन प्रणालीमध्ये जोडण्यात येणार असून यावर थेट शिक्षणाधिकारी लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे कोणता विद्यार्थी विद्यालयात उपस्थित आहे किंवा नाही. कोणाची किती दिवसांची बुट्टी आहे, हे सर्व त्यांना कळणार आहे. विद्यार्थ्यांच्या विद्यालयातील उपस्थितीवर प्रात्याक्षिक मार्क आणि शिष्यवृत्तीही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे खासगी कोचिंग क्लास करायचे की विद्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहून अभ्यास करायचा, अशा पेचात विद्यार्थी व पालक वर्ग सापडले आहेत.गरीब विद्यार्थ्यांना सोईचे१२ वी विज्ञानमध्ये बहुतांश विद्यार्थी शिकवणी वर्ग लावतात. कनिष्ठ महाविद्यालयात नावापुरताच प्रवेश असतो. विद्यार्थ्यांच्या अनुस्थितीमुळे शिक्षकही वर्ग घेण्यासाठी उत्सुक नसतात. गरीबीमुळे जे विद्यार्थी शिकवणी वर्ग लावत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. आता बायोमेट्रिक प्रणालीमुळे शिकवणी वर्गाला जाणाºया विद्यार्थ्यांची मोठी पंचाईत होणार आहे.शिकवणी वर्ग संचालकांची कोंडीविद्यालयांतील वर्गांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात येणार असल्यामुळे शिकवणी वर्ग संचालकांची मोठी कोंडी होणार आहे. बहुतांश विद्यालयात १२ वीचे वर्ग दुपारी भरविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णवेळ विद्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. यामुळे कोचिंग क्लास केवळ सकाळी आणि सायंकाळीच घ्यावे लागणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांसह शिकवणी वर्ग संचालकांनाही वेळेचे नियोजन करावे लागणार आहे.इयत्ता ११ व १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी चालू सत्रापासून बायोमेट्रिक प्रणाली येत आहे. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये हजेरी लावावी लागणार आहे. कोणता विद्यार्थी कितीवेळ वर्गामध्ये उपस्थित होता. हे कळणार असून शिक्षकांनाही पूर्णवेळ वर्ग घ्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील २५० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही प्रणाली लावण्याचे काम सुरू आहे.- संजय डोर्लीकरशिक्षणाधिकारी(माध्य.) जि.प.चंद्रपूर