शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

२५० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये चालू सत्रापासून ‘बायोमेट्रिक’ हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:09 IST

चालू सत्रापासून जिल्ह्यातील तब्बल २५० विद्यालयांमध्ये इयत्ता ११ व १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. यासाठी विविध विद्यालयांमध्ये मशीनही बसविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना येता-जाता या मशीनवर हजेरी लावावी लागणार आहे. परिणामी तासिका बुडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता अंकुश लागणार आहे.

ठळक मुद्देइयत्ता ११ व १२ वी विद्यार्थ्यांच्या हजेरीवर नजर : शिष्यवृत्ती व प्रात्यक्षिक गुणांवरही परिणाम

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चालू सत्रापासून जिल्ह्यातील तब्बल २५० विद्यालयांमध्ये इयत्ता ११ व १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. यासाठी विविध विद्यालयांमध्ये मशीनही बसविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना येता-जाता या मशीनवर हजेरी लावावी लागणार आहे. परिणामी तासिका बुडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता अंकुश लागणार आहे. उपस्थिती कमी असेल तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसारख्या विविध सुविधांचा लाभही मिळणे कठीण होणार आहे. विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग आणि विद्यालयामध्ये उपस्थित राहण्याचा टाईमिंग जुळवताना कसरत करावी लागणार आहे.दहावी आणि बारावी परीक्षांकडे आयुष्याचा टर्निंग पार्इंट म्हणून बघितले जाते. त्यामुळे प्रत्येकजण या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे, आपल्या पाल्याने बारावीमध्ये जास्तीत जास्त गुण घ्यावे, यासाठी पालकांची धडपड असते. यासाठी कितीही खर्च करण्याच्या तयारीत ते असतात. त्यामुळे ते विविध महागडे खासगी शिकवणी वर्गही लावतात. या सर्वामध्ये मात्र विद्यार्थ्यांची दमछाक होत असून अनेक विद्यार्थी विद्यालयामध्ये जाण्याचे टाळतात. परिणामी विद्यालयांमध्ये ११ व १२ वीचे वर्र्ग केवळ नावापूरते दिसून येतात. विद्यार्थीच वर्गात येत नसल्याने शिक्षकांचीही जबाबदारी कमी झाली आहे. चार, दोन विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कष्ट ते घेण्याच्या मानसिकतेत नसतात. परिणामी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत आहेत. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी शासनाने विद्यालयांतील बारावी विज्ञान वर्गांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना विद्यालयामध्ये जावून हजेरी लावावी लागणार आहे. सदर हजेरी आॅनलाईन प्रणालीमध्ये जोडण्यात येणार असून यावर थेट शिक्षणाधिकारी लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे कोणता विद्यार्थी विद्यालयात उपस्थित आहे किंवा नाही. कोणाची किती दिवसांची बुट्टी आहे, हे सर्व त्यांना कळणार आहे. विद्यार्थ्यांच्या विद्यालयातील उपस्थितीवर प्रात्याक्षिक मार्क आणि शिष्यवृत्तीही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे खासगी कोचिंग क्लास करायचे की विद्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहून अभ्यास करायचा, अशा पेचात विद्यार्थी व पालक वर्ग सापडले आहेत.गरीब विद्यार्थ्यांना सोईचे१२ वी विज्ञानमध्ये बहुतांश विद्यार्थी शिकवणी वर्ग लावतात. कनिष्ठ महाविद्यालयात नावापुरताच प्रवेश असतो. विद्यार्थ्यांच्या अनुस्थितीमुळे शिक्षकही वर्ग घेण्यासाठी उत्सुक नसतात. गरीबीमुळे जे विद्यार्थी शिकवणी वर्ग लावत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. आता बायोमेट्रिक प्रणालीमुळे शिकवणी वर्गाला जाणाºया विद्यार्थ्यांची मोठी पंचाईत होणार आहे.शिकवणी वर्ग संचालकांची कोंडीविद्यालयांतील वर्गांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात येणार असल्यामुळे शिकवणी वर्ग संचालकांची मोठी कोंडी होणार आहे. बहुतांश विद्यालयात १२ वीचे वर्ग दुपारी भरविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णवेळ विद्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. यामुळे कोचिंग क्लास केवळ सकाळी आणि सायंकाळीच घ्यावे लागणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांसह शिकवणी वर्ग संचालकांनाही वेळेचे नियोजन करावे लागणार आहे.इयत्ता ११ व १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी चालू सत्रापासून बायोमेट्रिक प्रणाली येत आहे. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये हजेरी लावावी लागणार आहे. कोणता विद्यार्थी कितीवेळ वर्गामध्ये उपस्थित होता. हे कळणार असून शिक्षकांनाही पूर्णवेळ वर्ग घ्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील २५० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही प्रणाली लावण्याचे काम सुरू आहे.- संजय डोर्लीकरशिक्षणाधिकारी(माध्य.) जि.प.चंद्रपूर