शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

२५ वर्षांपासून बसस्थानक कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:25 IST

तालुक्याची निर्मिती होऊन २५ पूर्ण झाले. या कालावधीमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बसस्थानक उभारु, असे गाजर दाखविले. मात्र, सर्वांनीच या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देतालुकावासीयांमध्ये संताप : मुख्य मार्गावरील अनेक गावांत नाही प्रवाशी निवारा

मनोज गोरे ।ऑनलाईन लोकमतकोरपना: तालुक्याची निर्मिती होऊन २५ पूर्ण झाले. या कालावधीमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बसस्थानक उभारु, असे गाजर दाखविले. मात्र, सर्वांनीच या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ऊन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता प्रवाशांना नाईलाजास्त रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली आहे़कोरपना तालुक्यातील निर्मिती झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. हा तालुका आदिवासी बहुल आहे. पहाडावर भ् आदिवासी भटक्या जमातीची संख्या अधिक असून विकासाच्या प्रवाहात या जमाती मागे पडल्या आहेत़ प्रशासकीय रचना आणि विकासाची कामे यामध्ये संतुलन ठेऊन मूलभूत समस्या सुटतील, अशी अपेक्षा होती मात्र, २५ वर्षांनंतरही या समस्या जैसे- थे आहेत. पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि विविध विभागांचे कार्यालय थाटण्यात आले, पण प्रत्यक्षात विकास कोसो दूर आहे. तेलंगण व आंध्र प्रदेशाला जवळ असलेला हा तालुका मानसिकदृष्ट्या महाराष्ट्रात आणण्यासाठी ठोस विकास कामांची गरज आहे. दळणवळणाची साधन आज गतिमान झाली आहेत़चंद्रपूर बसस्थानकातून अनेक गाड्या कोरपना, जिवती तालुक्यात सोडली जातात. त्यानंतर या दोन्ही तालुक्यातून तेलगंणा व आंध्र प्रदेशात सहजपणे संचार करता येते. परंतु कोरपना शहरात तात्पुरता प्रवाशी निवारा उभारुन राज्य परिवहन महामंडळाने नागरिकांच्या अपेक्षांवर बोळा फिरविला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेतेदेखील बसस्थानकाच्या प्रश्नावरुन कधी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले नाही. त्यामुळे बसस्थानकाचा प्रश्न २५ वर्षांपासून रेंगाळला आहे. बसस्थानकच नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.रस्त्यावरच करावी लागते बसची प्रतीक्षातालुक्यातील अनेक गावांमध्ये महामंडळाच्या बसेस सोडल्या जातात़ परंतु प्रवाशी निवारा उभारण्यात आला नाही. परसोडा, गोविंदपूर, दुर्गाळी, महेंदी, पारडी, कन्हाळगाव, चोपण, रुपापेठ, नारडा, सोनुर्ली, आसन, धामनगाव, इचापूर येथे प्रवाशी निवारा नसल्याने नागरिकांना रस्त्यावर उभे राहावे लागत आहे़ पावसाळ्यात झाडांचा आश्रय घ्यावा लागतो़सरकारविरुद्ध रोषकोरपना शहरात सुसज्ज बसस्थान बांधण्याचे स्वप्न हवेत विरले. हा प्रश्न केव्हा सुटेल हे कुणीही ठामपणे सांगत नाही. तर दुसरीकडे ज्या तात्पुरत्या निवाºयात प्रवाशी थांबत होते़ तो देखील पाडण्यात आला. नागरिकांचा अपेक्षाभंग झाल्याने सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे़