शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

२५ टक्के ग्रामीण नागरिक निरक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:22 IST

राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करीत आहे. अशिक्षित नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी चंद्रपूर जिल्हा अद्यापही पूर्णत: साक्षर झालेला नाही. २०११ च्या जनगणनेनुसार २५ टक्के नागरिक निरक्षर असून १५ तालुक्यांपैकी चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर आहे. या तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ८७.०५ आहे. तर जिवती तालुक्याची टक्केवारी ६५़.०४ एवढी आहे.

ठळक मुद्देस्त्री साक्षरतेची टक्केवारी घसरली : निरक्षरतेत जिवती तालुक्याची आघाडी

मंगेश भांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करीत आहे. अशिक्षित नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी चंद्रपूर जिल्हा अद्यापही पूर्णत: साक्षर झालेला नाही. २०११ च्या जनगणनेनुसार २५ टक्के नागरिक निरक्षर असून १५ तालुक्यांपैकी चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर आहे. या तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ८७.०५ आहे. तर जिवती तालुक्याची टक्केवारी ६५़.०४ एवढी आहे.२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्याचा साक्षरतेचा दर एकूण ८० टक्के आहे. यामध्ये पुरूष आघाडीवर असून पुरूषांच्या साक्षरतेची टक्केवारी ८६.०८ आहे. तर महिला साक्षरतेची टक्केवारी ७३ आहे. अशिक्षितांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने निरंतर शिक्षण विभाग सुरू केले आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी लाखो रूपये आतापर्यंत खर्च करण्यात आले. मात्र खर्चाचा विचार केला तर जिल्हा १०० टक्के साक्षर व्हायला पाहिजे होता. मात्र जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व नियोजन शुन्यतेमुळे साक्षरतेच्या बाबतीत जिल्हा मागे पडल्याचे दिसून येते. यात महिलांचा आकडा सर्वाधिक आहे.२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाख २८ हजार ९२९ आहे. यात महिला ७ लाख दोन हजार ८२३ तर पुरुष ७ लाख २६ हजार १०६ एवढे आहेत. लोकसंख्येच्या तुुलनेत साक्षरतेचा विचार केल्यास २५ टक्के ग्रामीण क्षेत्रातील आणि नागरी क्षेत्रातील १२ टक्के नागरिक अशिक्षीत आहेत. यात पुरुषांची तालुकानिहाय साक्षरता चंद्रपूर तालुका ९१.०८ टक्के, वरोरा तालुका ८९.०८ टक्के, चिमूर ८४.०४, नागभीड ८५.०४, ब्रह्मपुरी ८६.०३, सावली ८०.०४, सिंदेवाही ८६.०२, भद्रावती ९०, मूल ७९.०८, पोंभुर्णा ७८.०८, बल्लारपूर ९०.०५, कोरपना ८७.०१, राजुरा ८५.०१, गोंडपिंपरी ८०.०८ व जीवती तालुक्यात ७५.०२ टक्के पुरुष साक्षर आहेत.७३ टक्के महिला साक्षरचंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक निरक्षरतेचे प्रमाण महिलांमध्ये आहेत. चंद्रपूर तालुक्यातील ८३ टक्के महिला साक्षर असून वरोरा तालुका ७८ टक्के, चिमूर ७०.०३, नागभीड ६७.०६, ब्रह्मपुरी ७०, सावली ५९.६, सिंदेवाही ६७.०२, भद्रावती ७८, मूल ६३.०९, पोंभुर्णा ६२, बल्लारपूर ७७.०८, कोरपना ७४.०७, राजुरा ७२.०४, गोंडपिंपरी ६२.०९ व जिवती तालुक्यात केवळ ५५.०२ टक्के महिला साक्षर आहेत.