शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

२५ टक्के ग्रामीण नागरिक निरक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:22 IST

राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करीत आहे. अशिक्षित नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी चंद्रपूर जिल्हा अद्यापही पूर्णत: साक्षर झालेला नाही. २०११ च्या जनगणनेनुसार २५ टक्के नागरिक निरक्षर असून १५ तालुक्यांपैकी चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर आहे. या तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ८७.०५ आहे. तर जिवती तालुक्याची टक्केवारी ६५़.०४ एवढी आहे.

ठळक मुद्देस्त्री साक्षरतेची टक्केवारी घसरली : निरक्षरतेत जिवती तालुक्याची आघाडी

मंगेश भांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करीत आहे. अशिक्षित नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी चंद्रपूर जिल्हा अद्यापही पूर्णत: साक्षर झालेला नाही. २०११ च्या जनगणनेनुसार २५ टक्के नागरिक निरक्षर असून १५ तालुक्यांपैकी चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर आहे. या तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ८७.०५ आहे. तर जिवती तालुक्याची टक्केवारी ६५़.०४ एवढी आहे.२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्याचा साक्षरतेचा दर एकूण ८० टक्के आहे. यामध्ये पुरूष आघाडीवर असून पुरूषांच्या साक्षरतेची टक्केवारी ८६.०८ आहे. तर महिला साक्षरतेची टक्केवारी ७३ आहे. अशिक्षितांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने निरंतर शिक्षण विभाग सुरू केले आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी लाखो रूपये आतापर्यंत खर्च करण्यात आले. मात्र खर्चाचा विचार केला तर जिल्हा १०० टक्के साक्षर व्हायला पाहिजे होता. मात्र जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व नियोजन शुन्यतेमुळे साक्षरतेच्या बाबतीत जिल्हा मागे पडल्याचे दिसून येते. यात महिलांचा आकडा सर्वाधिक आहे.२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाख २८ हजार ९२९ आहे. यात महिला ७ लाख दोन हजार ८२३ तर पुरुष ७ लाख २६ हजार १०६ एवढे आहेत. लोकसंख्येच्या तुुलनेत साक्षरतेचा विचार केल्यास २५ टक्के ग्रामीण क्षेत्रातील आणि नागरी क्षेत्रातील १२ टक्के नागरिक अशिक्षीत आहेत. यात पुरुषांची तालुकानिहाय साक्षरता चंद्रपूर तालुका ९१.०८ टक्के, वरोरा तालुका ८९.०८ टक्के, चिमूर ८४.०४, नागभीड ८५.०४, ब्रह्मपुरी ८६.०३, सावली ८०.०४, सिंदेवाही ८६.०२, भद्रावती ९०, मूल ७९.०८, पोंभुर्णा ७८.०८, बल्लारपूर ९०.०५, कोरपना ८७.०१, राजुरा ८५.०१, गोंडपिंपरी ८०.०८ व जीवती तालुक्यात ७५.०२ टक्के पुरुष साक्षर आहेत.७३ टक्के महिला साक्षरचंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक निरक्षरतेचे प्रमाण महिलांमध्ये आहेत. चंद्रपूर तालुक्यातील ८३ टक्के महिला साक्षर असून वरोरा तालुका ७८ टक्के, चिमूर ७०.०३, नागभीड ६७.०६, ब्रह्मपुरी ७०, सावली ५९.६, सिंदेवाही ६७.०२, भद्रावती ७८, मूल ६३.०९, पोंभुर्णा ६२, बल्लारपूर ७७.०८, कोरपना ७४.०७, राजुरा ७२.०४, गोंडपिंपरी ६२.०९ व जिवती तालुक्यात केवळ ५५.०२ टक्के महिला साक्षर आहेत.