शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

२५ टक्के ग्रामीण नागरिक निरक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:22 IST

राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करीत आहे. अशिक्षित नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी चंद्रपूर जिल्हा अद्यापही पूर्णत: साक्षर झालेला नाही. २०११ च्या जनगणनेनुसार २५ टक्के नागरिक निरक्षर असून १५ तालुक्यांपैकी चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर आहे. या तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ८७.०५ आहे. तर जिवती तालुक्याची टक्केवारी ६५़.०४ एवढी आहे.

ठळक मुद्देस्त्री साक्षरतेची टक्केवारी घसरली : निरक्षरतेत जिवती तालुक्याची आघाडी

मंगेश भांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करीत आहे. अशिक्षित नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी चंद्रपूर जिल्हा अद्यापही पूर्णत: साक्षर झालेला नाही. २०११ च्या जनगणनेनुसार २५ टक्के नागरिक निरक्षर असून १५ तालुक्यांपैकी चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर आहे. या तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ८७.०५ आहे. तर जिवती तालुक्याची टक्केवारी ६५़.०४ एवढी आहे.२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्याचा साक्षरतेचा दर एकूण ८० टक्के आहे. यामध्ये पुरूष आघाडीवर असून पुरूषांच्या साक्षरतेची टक्केवारी ८६.०८ आहे. तर महिला साक्षरतेची टक्केवारी ७३ आहे. अशिक्षितांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने निरंतर शिक्षण विभाग सुरू केले आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी लाखो रूपये आतापर्यंत खर्च करण्यात आले. मात्र खर्चाचा विचार केला तर जिल्हा १०० टक्के साक्षर व्हायला पाहिजे होता. मात्र जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व नियोजन शुन्यतेमुळे साक्षरतेच्या बाबतीत जिल्हा मागे पडल्याचे दिसून येते. यात महिलांचा आकडा सर्वाधिक आहे.२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाख २८ हजार ९२९ आहे. यात महिला ७ लाख दोन हजार ८२३ तर पुरुष ७ लाख २६ हजार १०६ एवढे आहेत. लोकसंख्येच्या तुुलनेत साक्षरतेचा विचार केल्यास २५ टक्के ग्रामीण क्षेत्रातील आणि नागरी क्षेत्रातील १२ टक्के नागरिक अशिक्षीत आहेत. यात पुरुषांची तालुकानिहाय साक्षरता चंद्रपूर तालुका ९१.०८ टक्के, वरोरा तालुका ८९.०८ टक्के, चिमूर ८४.०४, नागभीड ८५.०४, ब्रह्मपुरी ८६.०३, सावली ८०.०४, सिंदेवाही ८६.०२, भद्रावती ९०, मूल ७९.०८, पोंभुर्णा ७८.०८, बल्लारपूर ९०.०५, कोरपना ८७.०१, राजुरा ८५.०१, गोंडपिंपरी ८०.०८ व जीवती तालुक्यात ७५.०२ टक्के पुरुष साक्षर आहेत.७३ टक्के महिला साक्षरचंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक निरक्षरतेचे प्रमाण महिलांमध्ये आहेत. चंद्रपूर तालुक्यातील ८३ टक्के महिला साक्षर असून वरोरा तालुका ७८ टक्के, चिमूर ७०.०३, नागभीड ६७.०६, ब्रह्मपुरी ७०, सावली ५९.६, सिंदेवाही ६७.०२, भद्रावती ७८, मूल ६३.०९, पोंभुर्णा ६२, बल्लारपूर ७७.०८, कोरपना ७४.०७, राजुरा ७२.०४, गोंडपिंपरी ६२.०९ व जिवती तालुक्यात केवळ ५५.०२ टक्के महिला साक्षर आहेत.